शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
3
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
4
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
5
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
6
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
7
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
8
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
9
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
11
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
12
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
13
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
14
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
15
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
16
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
17
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
18
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
19
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
20
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."

अजूनही बालविवाह

By admin | Updated: April 5, 2017 02:13 IST

सावित्रीबाई, जोतीबा फुले यांच्यापासून अनेक महापुरुषांनी बालविवाहासारख्या कुप्रथेला मूठमाती देण्यासाठी संघर्ष केला.

तीन वर्षात आठ गुन्हे दाखल : बालकांच्या संरक्षणाची यंत्रणा हरविली कुठे ? मंगेश व्यवहारे   नागपूर सावित्रीबाई, जोतीबा फुले यांच्यापासून अनेक महापुरुषांनी बालविवाहासारख्या कुप्रथेला मूठमाती देण्यासाठी संघर्ष केला. आज महाराष्ट्र शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात प्रगती करतो आहे. मोबाईलवर एक क्लीक करून जग जवळ आणणारा हा आधुनिक काळ, मात्र या काळात पुरोगामी महाराष्ट्रात बालविवाह होत आहेत. तेही स्मार्ट सिटीची बिरुदावली मिरवणाऱ्या नागपूर शहरात ही कुप्रथा जन्म घेत असेल तर याला सामाजिक व सांस्कृतिक अधोगती म्हणावे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. होय, नागपूर शहरात गेल्या तीन वर्षात बालविवाहाचे आठ गुन्हे दाखल झाले आहेत. हा धक्कादायक खुलासा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कार्यालयाकडून केला गेला आहे. कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षात शहरातील विविध पोलीस ठाण्यात बालविवाहाचे आठ गुन्हे दाखल झाले आहेत. यात धंतोली ठाण्यात दोन, कोतवालीमध्ये एक, नंदनवन एक, कामठी एक, जरीपटका एक व यशोधरानगर ठाण्यात दोन गुन्ह्यांची नोंद आहे. बालविवाहास गरिबी, आमिष व लहान वयात मुलांमध्ये पे्रमाबाबत वाढते आकर्षण या गोष्टी कारणीभूत ठरत आहे. परंतु बाल विवाहाच्या रोकथांबसाठी तहसीलदार, ग्रामविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित केले आहे. परंतु या यंत्रणा बालविवाह या विषयावर फारशा गंभीर दिसत नाही. त्यामुळे समाजात बालविवाह होत असतानाही बरेचदा त्या सामोर येत नाही. बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ मध्ये दंडात्मक आणि न्यायालयीन शिक्षेचीसुद्धा तरतूद आहे. आज समाज पुढारलेला आहे, शिक्षित झाला आहे. बालविवाह प्रतिबंधात्मक कायदे बनलेले आहे, असे असतानाही नागपूरसारख्या शहरात बालविवाह होणे दु:खद बाब आहे. नुकताच २५ मार्च रोजी यशोधरानगर ठाण्यात पुन्हा बालविवाहाचा गुन्हा दाखल झाला. चाईल्ड लाईन या संस्थेद्वारे जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी विजयसिंग परदेसी यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी बालविवाह झालेल्या मुलीला आरोपींच्या घरातूनच ताब्यात घेतले. तिला शासकीय मुलींचे बालगृह येथे ठेवण्यात आले आहे. बालविवाहाला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. स्लममध्ये याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. परंतु यावर रोखथांब करण्यासाठी शासनाने ज्या यंत्रणांना जबाबदारी दिली आहे, त्यांनी समन्वय साधून काम केल्यास आजही घडणाऱ्या बालविवाहासारख्या प्रकाराला आळा घालता येईल. पुढे आलेल्या या घटना केवळ जिल्हा बाल संरक्षण कक्षामुळे आल्या आहेत. - मुस्ताक पठाण, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी