शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

अजूनही बालविवाह

By admin | Updated: April 5, 2017 02:13 IST

सावित्रीबाई, जोतीबा फुले यांच्यापासून अनेक महापुरुषांनी बालविवाहासारख्या कुप्रथेला मूठमाती देण्यासाठी संघर्ष केला.

तीन वर्षात आठ गुन्हे दाखल : बालकांच्या संरक्षणाची यंत्रणा हरविली कुठे ? मंगेश व्यवहारे   नागपूर सावित्रीबाई, जोतीबा फुले यांच्यापासून अनेक महापुरुषांनी बालविवाहासारख्या कुप्रथेला मूठमाती देण्यासाठी संघर्ष केला. आज महाराष्ट्र शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात प्रगती करतो आहे. मोबाईलवर एक क्लीक करून जग जवळ आणणारा हा आधुनिक काळ, मात्र या काळात पुरोगामी महाराष्ट्रात बालविवाह होत आहेत. तेही स्मार्ट सिटीची बिरुदावली मिरवणाऱ्या नागपूर शहरात ही कुप्रथा जन्म घेत असेल तर याला सामाजिक व सांस्कृतिक अधोगती म्हणावे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. होय, नागपूर शहरात गेल्या तीन वर्षात बालविवाहाचे आठ गुन्हे दाखल झाले आहेत. हा धक्कादायक खुलासा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कार्यालयाकडून केला गेला आहे. कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षात शहरातील विविध पोलीस ठाण्यात बालविवाहाचे आठ गुन्हे दाखल झाले आहेत. यात धंतोली ठाण्यात दोन, कोतवालीमध्ये एक, नंदनवन एक, कामठी एक, जरीपटका एक व यशोधरानगर ठाण्यात दोन गुन्ह्यांची नोंद आहे. बालविवाहास गरिबी, आमिष व लहान वयात मुलांमध्ये पे्रमाबाबत वाढते आकर्षण या गोष्टी कारणीभूत ठरत आहे. परंतु बाल विवाहाच्या रोकथांबसाठी तहसीलदार, ग्रामविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित केले आहे. परंतु या यंत्रणा बालविवाह या विषयावर फारशा गंभीर दिसत नाही. त्यामुळे समाजात बालविवाह होत असतानाही बरेचदा त्या सामोर येत नाही. बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ मध्ये दंडात्मक आणि न्यायालयीन शिक्षेचीसुद्धा तरतूद आहे. आज समाज पुढारलेला आहे, शिक्षित झाला आहे. बालविवाह प्रतिबंधात्मक कायदे बनलेले आहे, असे असतानाही नागपूरसारख्या शहरात बालविवाह होणे दु:खद बाब आहे. नुकताच २५ मार्च रोजी यशोधरानगर ठाण्यात पुन्हा बालविवाहाचा गुन्हा दाखल झाला. चाईल्ड लाईन या संस्थेद्वारे जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी विजयसिंग परदेसी यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी बालविवाह झालेल्या मुलीला आरोपींच्या घरातूनच ताब्यात घेतले. तिला शासकीय मुलींचे बालगृह येथे ठेवण्यात आले आहे. बालविवाहाला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. स्लममध्ये याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. परंतु यावर रोखथांब करण्यासाठी शासनाने ज्या यंत्रणांना जबाबदारी दिली आहे, त्यांनी समन्वय साधून काम केल्यास आजही घडणाऱ्या बालविवाहासारख्या प्रकाराला आळा घालता येईल. पुढे आलेल्या या घटना केवळ जिल्हा बाल संरक्षण कक्षामुळे आल्या आहेत. - मुस्ताक पठाण, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी