शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

कोल्हापूर, सांगली, बेळगावमधील पूरनियंत्रणासाठी पावले उचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोल्हापूर, सांगली, बेळगाव जिल्ह्याच्या सीमाभागात पूर येण्याचे प्रमाण वाढले असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोल्हापूर, सांगली, बेळगाव जिल्ह्याच्या सीमाभागात पूर येण्याचे प्रमाण वाढले असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पुणे-बंगळुरू, रत्नागिरी-नागपूर यांच्यासह या जिल्ह्यांतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या भरावामुळे व नद्यांवरील पुलामुळे पुराची पाणीपातळी कमी होण्यास वेळ लागतो. त्यामुळे तातडीने या महामार्गावरील पुलांचा भराव कमी करून कमानी बांधण्यात याव्या, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांना नागपुरात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

कृष्णा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी या नद्यांवर बांधण्यात आलेल्या पुलांवर दोन्ही बाजूंना दोन-दोन किलोमीटरचा भराव आहे. पुराच्या काळात हे पूल बंधाऱ्यासारखे काम करतात व त्यामुळे नदीतील पाण्याची पातळी संथ गतीने कमी होते. केंद्र सरकारने या पुलांचे भराव कमी करून कमानी बांधकामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा व लगेच कामाला सुरुवात करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली. गडकरी यांनी यासंदर्भात १५ दिवसांततीनही जिल्ह्यांतील महामार्गाच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांचे पथक पाठविण्याच्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

राजकीय चर्चेबाबत गुप्तता

दरम्यान, विधानपरिषदेत शेट्टी यांची वर्णी लागणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. शेट्टी यांनी महापूरग्रस्तांच्या नुकसानभरपाईसाठी महाविकास आघाडी शासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर शेट्टी व गडकरी यांच्याच नेमकी काय राजकीय चर्चा झाली हा प्रश्न उपस्थित होत आहे. या मुद्द्यावर शेट्टी यांच्याकडून काहीही प्रतिक्रिया मिळाली नाही.