शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यांनी क्षमता विकासावर भर द्यावा

By admin | Updated: February 10, 2016 03:30 IST

विविध योजना तयार करण्याची मोठी जबाबदारी केंद्र शासनाकडेच अधिक असल्याचे दिसून येत आहे.

अर्जुन मुंडा : ‘लोकमत’ला दिली सदिच्छा भेटनागपूर : विविध योजना तयार करण्याची मोठी जबाबदारी केंद्र शासनाकडेच अधिक असल्याचे दिसून येत आहे. परंतु मोदी सरकारने हे चित्र बदलण्यास सुरुवात केली आहे व आता विविध धोरणे, योजना यात ४२ टक्के वाटा राज्यांचा राहणार आहे. येणाऱ्या निधीचा योग्य वापर व्हावा यासाठी राज्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने तयारी करून क्षमता विकासावर भर देण्याची गरज आहे, असे मत झारखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांनी व्यक्त केले. मुंडा यांनी मंगळवारी ‘लोकमत’ भवनाला सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे संचालक (परिचालन) अशोक जैन यांनी अर्जुन मुंडा यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी संपादकीय सहकाऱ्यांशी मनमोकळेपणाने चर्चा केली. आज केंद्र ७३ टक्के ध्येय धोरणे ठरवितात तर राज्याकडे २७ टक्क्यांचा वाटा आहे. परंतु आता राज्यांनी आपापल्या गरजांच्या हिशेबाने विविध योजनांचा आराखडा तयार करावा, असे केंद्राने सांगितले आहे. यातून राज्यांचा योग्य विकास होऊ शकेल, असे मुंडा म्हणाले. आज देशासमोर अनेक आव्हाने आहेत. यातील सर्वात मोठे आव्हान आर्थिक मंदीचे आहे. या स्थितीचा सामना करण्याचे केंद्र शासनाकडून पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. या संकटाचा यशस्वी सामना केल्यानंतर देश खऱ्या अर्थाने महागुरू म्हणून समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी)विकास आणि पर्यावरणाचा समतोल आवश्यकविकास ही आजच्या काळाची गरज आहे. परंतु औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणाच्या विविध समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे या दोहोंचा समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ‘इकोफ्रेंडली’ विचारसरणी तयार व्हायला हवी. यासंदर्भात आदिवासींचा आदर्श घ्यायला हवा. आदिवासी समाधानी असतात आणि निसर्गासोबत जुळलेले असतात. एखादे झाड जरी कापायचे असेल तर त्याबदल्यात आणखी झाडे तर लावतातच. शिवाय त्यांच्या मनात दु:खाची भावनादेखील येते. हेच विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असा सल्ला अर्जुन मुंडा यांनी यावेळी दिला. आदिवासी क्षेत्रातील खुंटलेला विकास ही मोठी समस्या आहे. आदिवासींना तसेच सोडून देशाला महासत्ता बनविणे शक्य नाही. आदिवासी क्षेत्रातदेखील विकास शक्य आहे. यासाठी आदिवासींना प्रत्यक्ष त्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यायला हवे. शिवाय त्यांना समान संधी दिली गेली पाहिजे. आदिवासी क्षेत्रात जास्तीत जास्त प्रमाणात सुविधा निर्माण करण्यावर भर हवा. या क्षेत्रांमध्ये काम करण्यासंदर्भात लोकांचा कल जाणून त्यादृष्टीने पावले उचलायला हवी, असे प्रतिपादन मुंडा यांनी यावेळी केले.