शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

‘अखंड भारत’ चुकीचे वक्तव्य

By admin | Updated: December 28, 2015 03:26 IST

पाकिस्तान आणि बांगलादेश ही आज दोन स्वतंत्र राष्ट्र आहेत. ही वस्तुस्थिती आहे. अशा वेळी अखंड भारताची गोष्ट करणे चुकीचे आहे.

तारिक अन्वर : भारतविरोधी शक्तींना मिळणार बळनागपूर : पाकिस्तान आणि बांगलादेश ही आज दोन स्वतंत्र राष्ट्र आहेत. ही वस्तुस्थिती आहे. अशा वेळी अखंड भारताची गोष्ट करणे चुकीचे आहे. ही गोष्ट करण्याची ही वेळसुद्धा नाही, अशा वक्तव्याने भारतविरोधी शक्तींना बळ मिळेल, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार तारिक अन्वर यांनी येथे व्यक्त केले.खा. अन्वर हे एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता पत्रकार भवनात पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिलेल्या आकस्मिक भेटीमुळे सध्या देशात वादळ उठले आहे. विरोधक त्यांच्यावर टीका करीत आहेत. परंतु तारिक अन्वर यांनी मात्र पंतप्रधानांच्या पाकिस्तान भेटीचे स्वागत केले आहे. मोदी यांची पाकिस्तान भेट ही चांगली सुरुवात आहे. परराष्ट्रीय धोरण हे राजकारणाच्या नजरेतून पाहिले जाऊ नये. पाकिस्तानशी संबंध चांगले राहावेत, यासाठी भारताने पहिल्यांदा पुढाकार घेतला असे नाही. यापूर्वी असे प्रयत्न अनेकदा झाले आहेत. अटलबिहारी वाजपेयी हे बस घेऊन लाहोरला गेले होते. राजीव गांधी अनेकदा पाकिस्तानात जाऊन आले. इंदिरा गांधी यांनीही प्रयत्न केले होते, असेही अन्वर यांनी स्पष्ट केले. यातच भाजपचे ज्येष्ठ नेते राम माधव यांनी पाकिस्तान आणि बांगलादेश यांना मिळून अखंड भारताबाबतचे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरून सुद्धा देशात वादळे उठले आहे. या वक्तव्याबाबत खा. अन्वर यांना विचारले असता त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र आहेत. त्यांचे फेडरेशन होऊ शकले. तसेच सार्क देशांमधील संबंध चांगले राहावेत, एकमेकांच्या देशातील व्यापार, ये-जा सहज सुलभ व्हावी म्हणून नेहमीच प्रयत्न होत असतात. नेपाळमध्ये जायला आपल्याला व्हिजा लागत नाही. तसेच सार्क देशांमध्ये व्हावे, परंतु त्यासाठी तसे संबंध असणे आवश्यक आहे. हे संबंध चांगले राहावेत, यासाठी वारंवार प्रयत्न सुरू असतात, असेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री रमेश बंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुनाफ हकीम, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, ज्येष्ठ पत्रकार महेश उपदेव उपस्थित होते. (प्रतिनिधी)