शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

‘अखंड भारत’ चुकीचे वक्तव्य

By admin | Updated: December 28, 2015 03:26 IST

पाकिस्तान आणि बांगलादेश ही आज दोन स्वतंत्र राष्ट्र आहेत. ही वस्तुस्थिती आहे. अशा वेळी अखंड भारताची गोष्ट करणे चुकीचे आहे.

तारिक अन्वर : भारतविरोधी शक्तींना मिळणार बळनागपूर : पाकिस्तान आणि बांगलादेश ही आज दोन स्वतंत्र राष्ट्र आहेत. ही वस्तुस्थिती आहे. अशा वेळी अखंड भारताची गोष्ट करणे चुकीचे आहे. ही गोष्ट करण्याची ही वेळसुद्धा नाही, अशा वक्तव्याने भारतविरोधी शक्तींना बळ मिळेल, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार तारिक अन्वर यांनी येथे व्यक्त केले.खा. अन्वर हे एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता पत्रकार भवनात पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिलेल्या आकस्मिक भेटीमुळे सध्या देशात वादळ उठले आहे. विरोधक त्यांच्यावर टीका करीत आहेत. परंतु तारिक अन्वर यांनी मात्र पंतप्रधानांच्या पाकिस्तान भेटीचे स्वागत केले आहे. मोदी यांची पाकिस्तान भेट ही चांगली सुरुवात आहे. परराष्ट्रीय धोरण हे राजकारणाच्या नजरेतून पाहिले जाऊ नये. पाकिस्तानशी संबंध चांगले राहावेत, यासाठी भारताने पहिल्यांदा पुढाकार घेतला असे नाही. यापूर्वी असे प्रयत्न अनेकदा झाले आहेत. अटलबिहारी वाजपेयी हे बस घेऊन लाहोरला गेले होते. राजीव गांधी अनेकदा पाकिस्तानात जाऊन आले. इंदिरा गांधी यांनीही प्रयत्न केले होते, असेही अन्वर यांनी स्पष्ट केले. यातच भाजपचे ज्येष्ठ नेते राम माधव यांनी पाकिस्तान आणि बांगलादेश यांना मिळून अखंड भारताबाबतचे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरून सुद्धा देशात वादळे उठले आहे. या वक्तव्याबाबत खा. अन्वर यांना विचारले असता त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र आहेत. त्यांचे फेडरेशन होऊ शकले. तसेच सार्क देशांमधील संबंध चांगले राहावेत, एकमेकांच्या देशातील व्यापार, ये-जा सहज सुलभ व्हावी म्हणून नेहमीच प्रयत्न होत असतात. नेपाळमध्ये जायला आपल्याला व्हिजा लागत नाही. तसेच सार्क देशांमध्ये व्हावे, परंतु त्यासाठी तसे संबंध असणे आवश्यक आहे. हे संबंध चांगले राहावेत, यासाठी वारंवार प्रयत्न सुरू असतात, असेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री रमेश बंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुनाफ हकीम, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, ज्येष्ठ पत्रकार महेश उपदेव उपस्थित होते. (प्रतिनिधी)