शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

राज्य सरकार विदर्भ विकासाबाबत नेहमीच उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:06 IST

नागपूर : नवीन विदर्भ विकास मंडळाची स्थापना रखडली असून, राज्य सरकार या मुद्यावर भूमिका स्पष्ट करण्यास विलंब करीत आहे. ...

नागपूर : नवीन विदर्भ विकास मंडळाची स्थापना रखडली असून, राज्य सरकार या मुद्यावर भूमिका स्पष्ट करण्यास विलंब करीत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ही बाब लक्षात घेता राज्य सरकार विदर्भ विकासाबाबत नेहमीच उदासीन असते, असे मौखिक निरीक्षण नोंदविले.

यासंदर्भात स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थक नितीन रोंघे आणि विदर्भ विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. कपिल चंद्रायण यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, वरिष्ठ वकील ॲड. श्रीहरी अणे यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडताना, या प्रकरणात न्यायालयाने राज्य सरकारला गेल्या १ एप्रिल रोजी नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते; पण राज्य सरकारने अद्याप उत्तर सादर केले नाही, याकडे लक्ष वेधले. त्यानंतर न्यायालयाने सरकारवर नाराजी व्यक्त करून सदर परखड निरीक्षण नोंदविले.

यावेळी मुख्य सरकारी वकील ॲड. केतकी जोशी यांनी नियोजन विभागाच्या उपसचिवांनी पाठविलेल्या पत्राची न्यायालयाला माहिती देऊन या प्रकरणात राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता ॲड. आशुतोष कुंभकोणी बाजू मांडणार असल्याचे सांगितले, तसेच उत्तर सादर करण्यासाठी दाेन आठवडे वेळ वाढवून देण्याची विनंती केली. न्यायालयाने ही विनंती मंजूर केली; पण उत्तर पुढील सुनावणीच्या तीन-चार दिवसांपूर्वी सादर करण्याचे व उत्तराची प्रत याचिकाकर्त्यांनाही देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. ॲड. अणे यांना ॲड. अक्षय सुदामे यांनी सहकार्य केले.

-----------------

मुदत एप्रिल-२०२० रोजी संपली

विदर्भ विकास मंडळाची सर्वप्रथम ९ मार्च १९९४ रोजी स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत पाच वेळा विदर्भ विकास मंडळ स्थापन करण्यात आले. गेल्या मंडळाची मुदत एप्रिल-२०२० रोजी संपली. त्यानंतर नवीन मंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले नाही. यासंदर्भात ७ सप्टेंबर २०२० व २३ फेब्रुवारी २०२१ रोजी राज्यपालांना निवेदन सादर केले; पण त्याची दखल घेण्यात आली नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.