शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकार विदर्भ विकासाबाबत नेहमीच उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:06 IST

नागपूर : नवीन विदर्भ विकास मंडळाची स्थापना रखडली असून, राज्य सरकार या मुद्यावर भूमिका स्पष्ट करण्यास विलंब करीत आहे. ...

नागपूर : नवीन विदर्भ विकास मंडळाची स्थापना रखडली असून, राज्य सरकार या मुद्यावर भूमिका स्पष्ट करण्यास विलंब करीत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ही बाब लक्षात घेता राज्य सरकार विदर्भ विकासाबाबत नेहमीच उदासीन असते, असे मौखिक निरीक्षण नोंदविले.

यासंदर्भात स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थक नितीन रोंघे आणि विदर्भ विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. कपिल चंद्रायण यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, वरिष्ठ वकील ॲड. श्रीहरी अणे यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडताना, या प्रकरणात न्यायालयाने राज्य सरकारला गेल्या १ एप्रिल रोजी नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते; पण राज्य सरकारने अद्याप उत्तर सादर केले नाही, याकडे लक्ष वेधले. त्यानंतर न्यायालयाने सरकारवर नाराजी व्यक्त करून सदर परखड निरीक्षण नोंदविले.

यावेळी मुख्य सरकारी वकील ॲड. केतकी जोशी यांनी नियोजन विभागाच्या उपसचिवांनी पाठविलेल्या पत्राची न्यायालयाला माहिती देऊन या प्रकरणात राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता ॲड. आशुतोष कुंभकोणी बाजू मांडणार असल्याचे सांगितले, तसेच उत्तर सादर करण्यासाठी दाेन आठवडे वेळ वाढवून देण्याची विनंती केली. न्यायालयाने ही विनंती मंजूर केली; पण उत्तर पुढील सुनावणीच्या तीन-चार दिवसांपूर्वी सादर करण्याचे व उत्तराची प्रत याचिकाकर्त्यांनाही देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. ॲड. अणे यांना ॲड. अक्षय सुदामे यांनी सहकार्य केले.

-----------------

मुदत एप्रिल-२०२० रोजी संपली

विदर्भ विकास मंडळाची सर्वप्रथम ९ मार्च १९९४ रोजी स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत पाच वेळा विदर्भ विकास मंडळ स्थापन करण्यात आले. गेल्या मंडळाची मुदत एप्रिल-२०२० रोजी संपली. त्यानंतर नवीन मंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले नाही. यासंदर्भात ७ सप्टेंबर २०२० व २३ फेब्रुवारी २०२१ रोजी राज्यपालांना निवेदन सादर केले; पण त्याची दखल घेण्यात आली नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.