शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकार विदर्भ विकासाबाबत नेहमीच उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:06 IST

नागपूर : नवीन विदर्भ विकास मंडळाची स्थापना रखडली असून, राज्य सरकार या मुद्यावर भूमिका स्पष्ट करण्यास विलंब करीत आहे. ...

नागपूर : नवीन विदर्भ विकास मंडळाची स्थापना रखडली असून, राज्य सरकार या मुद्यावर भूमिका स्पष्ट करण्यास विलंब करीत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ही बाब लक्षात घेता राज्य सरकार विदर्भ विकासाबाबत नेहमीच उदासीन असते, असे मौखिक निरीक्षण नोंदविले.

यासंदर्भात स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थक नितीन रोंघे आणि विदर्भ विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. कपिल चंद्रायण यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, वरिष्ठ वकील ॲड. श्रीहरी अणे यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडताना, या प्रकरणात न्यायालयाने राज्य सरकारला गेल्या १ एप्रिल रोजी नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते; पण राज्य सरकारने अद्याप उत्तर सादर केले नाही, याकडे लक्ष वेधले. त्यानंतर न्यायालयाने सरकारवर नाराजी व्यक्त करून सदर परखड निरीक्षण नोंदविले.

यावेळी मुख्य सरकारी वकील ॲड. केतकी जोशी यांनी नियोजन विभागाच्या उपसचिवांनी पाठविलेल्या पत्राची न्यायालयाला माहिती देऊन या प्रकरणात राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता ॲड. आशुतोष कुंभकोणी बाजू मांडणार असल्याचे सांगितले, तसेच उत्तर सादर करण्यासाठी दाेन आठवडे वेळ वाढवून देण्याची विनंती केली. न्यायालयाने ही विनंती मंजूर केली; पण उत्तर पुढील सुनावणीच्या तीन-चार दिवसांपूर्वी सादर करण्याचे व उत्तराची प्रत याचिकाकर्त्यांनाही देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. ॲड. अणे यांना ॲड. अक्षय सुदामे यांनी सहकार्य केले.

-----------------

मुदत एप्रिल-२०२० रोजी संपली

विदर्भ विकास मंडळाची सर्वप्रथम ९ मार्च १९९४ रोजी स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत पाच वेळा विदर्भ विकास मंडळ स्थापन करण्यात आले. गेल्या मंडळाची मुदत एप्रिल-२०२० रोजी संपली. त्यानंतर नवीन मंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले नाही. यासंदर्भात ७ सप्टेंबर २०२० व २३ फेब्रुवारी २०२१ रोजी राज्यपालांना निवेदन सादर केले; पण त्याची दखल घेण्यात आली नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.