शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉक होताच अपघात विभागात वाढली गर्दी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:12 IST

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताच जून महिन्यापासून निर्बंध शिथिल करण्यात आले. परिणामी वाहतुकीचे प्रमाण वाढून अपघातातही ...

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताच जून महिन्यापासून निर्बंध शिथिल करण्यात आले. परिणामी वाहतुकीचे प्रमाण वाढून अपघातातही वाढ झाली. निर्बंध असताना मेडिकलमध्ये दिवसाकाठी रस्ता अपघातातील एक किंवा दोन जखमी यायचे. आता किरकोळसह गंभीर जखमींची संख्या १०च्या घरात गेली आहे.

कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारीपासून तीव्र होऊ लागताच शासनाने कठोर निर्बंध लावले. एप्रिल महिन्यात या लाटेतील सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची नोंद झाली. परंतु मे महिन्यापासून लाट ओसरू लागताच जून महिन्यात काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले. जुलै महिन्यात यात आणखी शिथिलता आणून ऑगस्ट महिन्यात रात्री १० वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याला परवानगी देण्यात आली. परिणामी, जून महिन्यात ७४ तर जुलै महिन्यात ९३ अपघात झाले. ऑगस्ट महिन्यात याच्या दुप्पट अपघाताची नोंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

-मागील दोन महिन्यात अपघातामुळे ५१ मृत्यू

जानेवारी महिन्यात ७९ अपघातात २३ जणांचा बळी गेला. फेब्रुवारी महिन्यात अपघातांची संख्या वाढून ९६ झाली. यात २३ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मार्च महिन्यात कठोर निर्बंध लावण्यात आले. यामुळे अपघाताची संख्या आणखी कमी होऊन ६९ झाली, १९ मृत्यूची नोंद झाली. एप्रिल महिन्यात कोरोनाची लाट तीव्र होती. त्यानंतरही ५५ अपघात झाले व १७ मृत्यूची भर पडली. मे महिन्यात ५१ अपघातात २० मृत्यू तर जून महिन्यात निर्बंध शिथिल होताच अपघाताची संख्या वाढून ७४ झाली. यात २५ जणांना आपल्या जीवाला मुकावे लागले तर जुलै महिन्यात ९३ अपघात व २६ मृत्यूची नोंद झाली.

-मेडिकलमध्ये वाढली अपघातातील जखमींची संख्या

अपघातातील जखमींना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार देऊन जीव वाचविण्यासाठी ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले. परंतु कोरोनामुळे या सेंटरला कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतरित केले. या दरम्यान अपघातांची संख्याही कमी होती. परंतु आता रस्ता अपघातातील जखमींची संख्या वाढल्याने ‘ट्रॉमा’ सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे. सध्या मेडिकलमध्ये रोज जवळपास १०च्यावर अपघातातील जखमी येत असल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

-८० टक्के अपघात मानवी चुकांमुळे

निर्बंध असतानाही अपघात व मृत्यूसत्र सुरूच होते. जानेवारी ते जुलै या दरम्यान ५१७ अपघात व १५३ जणांचे बळी गेले. ५२७ जण जखमी झाले. ही संख्या कोणत्याही प्रकाराच्या आजाराने किंवा नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या जीवहानीपेक्षाही मोठी आहे. यातील ८० टक्के अपघात मानवी चुकांमुळे झाले आहेत. हे निश्चितच टाळता येण्यासारखे आहे. यामुळे वाहतुक नियमांना घेऊन व्यापक जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे.

-राजू वाघ, सदस्य, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषद

-अपघाताची आकडेवारी

महिना : अपघातांची संख्या : मृत्यू

जानेवारी : ७९ : २३

फेब्रुवारी : ९६ : २३

मार्च : ६९ : १९

एप्रिल : ५५ : १७

मे : ५१ : २०

जून : ७४:२५

जुलै : ९३ : २६