शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉक होताच अपघात विभागात वाढली गर्दी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:12 IST

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताच जून महिन्यापासून निर्बंध शिथिल करण्यात आले. परिणामी वाहतुकीचे प्रमाण वाढून अपघातातही ...

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताच जून महिन्यापासून निर्बंध शिथिल करण्यात आले. परिणामी वाहतुकीचे प्रमाण वाढून अपघातातही वाढ झाली. निर्बंध असताना मेडिकलमध्ये दिवसाकाठी रस्ता अपघातातील एक किंवा दोन जखमी यायचे. आता किरकोळसह गंभीर जखमींची संख्या १०च्या घरात गेली आहे.

कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारीपासून तीव्र होऊ लागताच शासनाने कठोर निर्बंध लावले. एप्रिल महिन्यात या लाटेतील सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची नोंद झाली. परंतु मे महिन्यापासून लाट ओसरू लागताच जून महिन्यात काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले. जुलै महिन्यात यात आणखी शिथिलता आणून ऑगस्ट महिन्यात रात्री १० वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याला परवानगी देण्यात आली. परिणामी, जून महिन्यात ७४ तर जुलै महिन्यात ९३ अपघात झाले. ऑगस्ट महिन्यात याच्या दुप्पट अपघाताची नोंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

-मागील दोन महिन्यात अपघातामुळे ५१ मृत्यू

जानेवारी महिन्यात ७९ अपघातात २३ जणांचा बळी गेला. फेब्रुवारी महिन्यात अपघातांची संख्या वाढून ९६ झाली. यात २३ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मार्च महिन्यात कठोर निर्बंध लावण्यात आले. यामुळे अपघाताची संख्या आणखी कमी होऊन ६९ झाली, १९ मृत्यूची नोंद झाली. एप्रिल महिन्यात कोरोनाची लाट तीव्र होती. त्यानंतरही ५५ अपघात झाले व १७ मृत्यूची भर पडली. मे महिन्यात ५१ अपघातात २० मृत्यू तर जून महिन्यात निर्बंध शिथिल होताच अपघाताची संख्या वाढून ७४ झाली. यात २५ जणांना आपल्या जीवाला मुकावे लागले तर जुलै महिन्यात ९३ अपघात व २६ मृत्यूची नोंद झाली.

-मेडिकलमध्ये वाढली अपघातातील जखमींची संख्या

अपघातातील जखमींना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार देऊन जीव वाचविण्यासाठी ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले. परंतु कोरोनामुळे या सेंटरला कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतरित केले. या दरम्यान अपघातांची संख्याही कमी होती. परंतु आता रस्ता अपघातातील जखमींची संख्या वाढल्याने ‘ट्रॉमा’ सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे. सध्या मेडिकलमध्ये रोज जवळपास १०च्यावर अपघातातील जखमी येत असल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

-८० टक्के अपघात मानवी चुकांमुळे

निर्बंध असतानाही अपघात व मृत्यूसत्र सुरूच होते. जानेवारी ते जुलै या दरम्यान ५१७ अपघात व १५३ जणांचे बळी गेले. ५२७ जण जखमी झाले. ही संख्या कोणत्याही प्रकाराच्या आजाराने किंवा नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या जीवहानीपेक्षाही मोठी आहे. यातील ८० टक्के अपघात मानवी चुकांमुळे झाले आहेत. हे निश्चितच टाळता येण्यासारखे आहे. यामुळे वाहतुक नियमांना घेऊन व्यापक जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे.

-राजू वाघ, सदस्य, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषद

-अपघाताची आकडेवारी

महिना : अपघातांची संख्या : मृत्यू

जानेवारी : ७९ : २३

फेब्रुवारी : ९६ : २३

मार्च : ६९ : १९

एप्रिल : ५५ : १७

मे : ५१ : २०

जून : ७४:२५

जुलै : ९३ : २६