शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

अनलॉक होताच अपघात विभागात वाढली गर्दी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:12 IST

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताच जून महिन्यापासून निर्बंध शिथिल करण्यात आले. परिणामी वाहतुकीचे प्रमाण वाढून अपघातातही ...

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताच जून महिन्यापासून निर्बंध शिथिल करण्यात आले. परिणामी वाहतुकीचे प्रमाण वाढून अपघातातही वाढ झाली. निर्बंध असताना मेडिकलमध्ये दिवसाकाठी रस्ता अपघातातील एक किंवा दोन जखमी यायचे. आता किरकोळसह गंभीर जखमींची संख्या १०च्या घरात गेली आहे.

कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारीपासून तीव्र होऊ लागताच शासनाने कठोर निर्बंध लावले. एप्रिल महिन्यात या लाटेतील सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची नोंद झाली. परंतु मे महिन्यापासून लाट ओसरू लागताच जून महिन्यात काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले. जुलै महिन्यात यात आणखी शिथिलता आणून ऑगस्ट महिन्यात रात्री १० वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याला परवानगी देण्यात आली. परिणामी, जून महिन्यात ७४ तर जुलै महिन्यात ९३ अपघात झाले. ऑगस्ट महिन्यात याच्या दुप्पट अपघाताची नोंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

-मागील दोन महिन्यात अपघातामुळे ५१ मृत्यू

जानेवारी महिन्यात ७९ अपघातात २३ जणांचा बळी गेला. फेब्रुवारी महिन्यात अपघातांची संख्या वाढून ९६ झाली. यात २३ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मार्च महिन्यात कठोर निर्बंध लावण्यात आले. यामुळे अपघाताची संख्या आणखी कमी होऊन ६९ झाली, १९ मृत्यूची नोंद झाली. एप्रिल महिन्यात कोरोनाची लाट तीव्र होती. त्यानंतरही ५५ अपघात झाले व १७ मृत्यूची भर पडली. मे महिन्यात ५१ अपघातात २० मृत्यू तर जून महिन्यात निर्बंध शिथिल होताच अपघाताची संख्या वाढून ७४ झाली. यात २५ जणांना आपल्या जीवाला मुकावे लागले तर जुलै महिन्यात ९३ अपघात व २६ मृत्यूची नोंद झाली.

-मेडिकलमध्ये वाढली अपघातातील जखमींची संख्या

अपघातातील जखमींना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार देऊन जीव वाचविण्यासाठी ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले. परंतु कोरोनामुळे या सेंटरला कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतरित केले. या दरम्यान अपघातांची संख्याही कमी होती. परंतु आता रस्ता अपघातातील जखमींची संख्या वाढल्याने ‘ट्रॉमा’ सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे. सध्या मेडिकलमध्ये रोज जवळपास १०च्यावर अपघातातील जखमी येत असल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

-८० टक्के अपघात मानवी चुकांमुळे

निर्बंध असतानाही अपघात व मृत्यूसत्र सुरूच होते. जानेवारी ते जुलै या दरम्यान ५१७ अपघात व १५३ जणांचे बळी गेले. ५२७ जण जखमी झाले. ही संख्या कोणत्याही प्रकाराच्या आजाराने किंवा नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या जीवहानीपेक्षाही मोठी आहे. यातील ८० टक्के अपघात मानवी चुकांमुळे झाले आहेत. हे निश्चितच टाळता येण्यासारखे आहे. यामुळे वाहतुक नियमांना घेऊन व्यापक जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे.

-राजू वाघ, सदस्य, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषद

-अपघाताची आकडेवारी

महिना : अपघातांची संख्या : मृत्यू

जानेवारी : ७९ : २३

फेब्रुवारी : ९६ : २३

मार्च : ६९ : १९

एप्रिल : ५५ : १७

मे : ५१ : २०

जून : ७४:२५

जुलै : ९३ : २६