शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरिजायवर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा आवाज कातरलेला...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

अनलॉक होताच अपघात विभागात वाढली गर्दी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:12 IST

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताच जून महिन्यापासून निर्बंध शिथिल करण्यात आले. परिणामी वाहतुकीचे प्रमाण वाढून अपघातातही ...

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताच जून महिन्यापासून निर्बंध शिथिल करण्यात आले. परिणामी वाहतुकीचे प्रमाण वाढून अपघातातही वाढ झाली. निर्बंध असताना मेडिकलमध्ये दिवसाकाठी रस्ता अपघातातील एक किंवा दोन जखमी यायचे. आता किरकोळसह गंभीर जखमींची संख्या १०च्या घरात गेली आहे.

कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारीपासून तीव्र होऊ लागताच शासनाने कठोर निर्बंध लावले. एप्रिल महिन्यात या लाटेतील सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची नोंद झाली. परंतु मे महिन्यापासून लाट ओसरू लागताच जून महिन्यात काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले. जुलै महिन्यात यात आणखी शिथिलता आणून ऑगस्ट महिन्यात रात्री १० वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याला परवानगी देण्यात आली. परिणामी, जून महिन्यात ७४ तर जुलै महिन्यात ९३ अपघात झाले. ऑगस्ट महिन्यात याच्या दुप्पट अपघाताची नोंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

-मागील दोन महिन्यात अपघातामुळे ५१ मृत्यू

जानेवारी महिन्यात ७९ अपघातात २३ जणांचा बळी गेला. फेब्रुवारी महिन्यात अपघातांची संख्या वाढून ९६ झाली. यात २३ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मार्च महिन्यात कठोर निर्बंध लावण्यात आले. यामुळे अपघाताची संख्या आणखी कमी होऊन ६९ झाली, १९ मृत्यूची नोंद झाली. एप्रिल महिन्यात कोरोनाची लाट तीव्र होती. त्यानंतरही ५५ अपघात झाले व १७ मृत्यूची भर पडली. मे महिन्यात ५१ अपघातात २० मृत्यू तर जून महिन्यात निर्बंध शिथिल होताच अपघाताची संख्या वाढून ७४ झाली. यात २५ जणांना आपल्या जीवाला मुकावे लागले तर जुलै महिन्यात ९३ अपघात व २६ मृत्यूची नोंद झाली.

-मेडिकलमध्ये वाढली अपघातातील जखमींची संख्या

अपघातातील जखमींना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार देऊन जीव वाचविण्यासाठी ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले. परंतु कोरोनामुळे या सेंटरला कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतरित केले. या दरम्यान अपघातांची संख्याही कमी होती. परंतु आता रस्ता अपघातातील जखमींची संख्या वाढल्याने ‘ट्रॉमा’ सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे. सध्या मेडिकलमध्ये रोज जवळपास १०च्यावर अपघातातील जखमी येत असल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

-८० टक्के अपघात मानवी चुकांमुळे

निर्बंध असतानाही अपघात व मृत्यूसत्र सुरूच होते. जानेवारी ते जुलै या दरम्यान ५१७ अपघात व १५३ जणांचे बळी गेले. ५२७ जण जखमी झाले. ही संख्या कोणत्याही प्रकाराच्या आजाराने किंवा नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या जीवहानीपेक्षाही मोठी आहे. यातील ८० टक्के अपघात मानवी चुकांमुळे झाले आहेत. हे निश्चितच टाळता येण्यासारखे आहे. यामुळे वाहतुक नियमांना घेऊन व्यापक जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे.

-राजू वाघ, सदस्य, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषद

-अपघाताची आकडेवारी

महिना : अपघातांची संख्या : मृत्यू

जानेवारी : ७९ : २३

फेब्रुवारी : ९६ : २३

मार्च : ६९ : १९

एप्रिल : ५५ : १७

मे : ५१ : २०

जून : ७४:२५

जुलै : ९३ : २६