शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

काही मंत्री स्वत:ला ‘सुपर सीएम’ समजतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या घोषणेनंतर राज्यात झालेल्या गोंधळावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या घोषणेनंतर राज्यात झालेल्या गोंधळावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. महाविकास आघाडी शासनातील काही मंत्री स्वत:ला सुपर सीएम समजतात. हे मंत्री कुठलीही घोषणा करतात व मुख्यमंत्री त्यावर काहीच बोलत नाहीत, असा आरोप फडणवीस यांनी केला. नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

धोरणात्मक निर्णयांची घोषणा सर्वसाधारणत: मुख्यमंत्रीच करतात. जर त्यांना शक्य नसेल तर त्यासाठी कुठल्या तरी मंत्र्याला जबाबदारी दिली जाते. संबंधित मंत्री शासनाच्या अनुषंगाने वक्तव्य देतात. मात्र महाराष्ट्रात एकाच विषयावर पाच पाच मंत्री वक्तव्य देत आहेत. घोषणा करून देतात व त्यानंतर यावर मुख्यमंत्री बोलतील असेदेखील सांगतात. हा सर्व प्रकार श्रेय घेण्यासाठी होत आहे. परंतु मंत्र्यांनी श्रेय घेण्याअगोदर काही कामदेखील केले पाहिजे. लहान व मध्यम व्यापारी निर्बंधांमुळे नाराज आहेत, अशा स्थितीत सरकार संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न करत आहे, असेदेखील फडणवीस म्हणाले.

संभाजीराजेंवर टीका करण्याची गरज नाही

खा.संभाजीराजेंवर भाजपच्या नेत्यांकडून टीका होत असल्याच्या मुद्द्यावर फडणवीस यांनी भाष्य केले. संभाजीराजेंवर टीका करण्याचे कुठलेही कारण नाही. त्यांनी सातत्याने मराठा आरक्षणाच्या बाजूची भूमिका मांडली आहे. सगळ्यांनी एकत्रित यावे ही त्यांची भूमिका अजिबात चुकीची नाही. आम्ही तर तयार आहोत, मात्र समोरच्यांनी राजकारण करू नये. संभाजी राजेंबाबत जाणीपूर्वक काही गोष्टी पसरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. नारायण राणे नेमके काय बोलले याची कल्पना नाही. पण त्यांच्याशी निश्चित चर्चा करू, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सरकार कारणे देत आहे

स्थानिक स्वराज्य संस्थांत ओबीसी व मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या मुद्द्यावर फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला. राज्य शासन केवळ कारणे देत आहे. १३ डिसेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर आता राज्य शासनाने मागासवर्गीय आयोग गठित केला आहे. लेटलतिफीमुळे आरक्षण संपले. सरकारला मराठा आरक्षण देण्याची कुठलीच इच्छा नाही, असेदेखील फडणवीस म्हणाले.