शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

- तर यंदा जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 01:16 IST

आॅगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा सुरूआहे. परंतु अजूनही अपवाद वगळता जलाशयांची स्थिती चांगली नाही.

ठळक मुद्देगोसेखुर्द भरले, तोतलाडोहमध्ये अत्यल्प साठा : मोठ्या प्रकल्पात २८ टक्के, मध्यम प्रकल्पात केवळ ३३ टक्के साठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आॅगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा सुरूआहे. परंतु अजूनही अपवाद वगळता जलाशयांची स्थिती चांगली नाही. गोसेखुर्द प्रकल्प १०० टक्के भरला. परंतु तोतलाडोहमध्ये अजूनही अत्यल्प साठा आहे. त्यात केवळ ११ टक्के साठा आहे. उर्वरित प्रकल्पांचीही अशीच अवस्था असून बहुतांश जलाशये अजूनही कोरडी आहेत. एकूण प्रकल्पांचा विचार केला तर आजच्या घडीला मोठ्या प्रकल्पात केवळ २८ टक्के तर मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ३३ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. त्यांची एकूण पाणीसाठ्याची क्षमता ही २९६४.४ दलघमी इतकी आहे.जलसंपदा विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार २६ आॅगस्ट रोजी या मोठ्या प्रकल्पांमध्ये आतापर्यंत एकूण ८१६ दलघमी इतका म्हणजे केवळ २८ टक्के पाणीसाठा आहे. या १८ पैकी केवळ कामठी खैरी (५२ टक्के), लोवर नांद (८५ टक्के), वडगाव (७६ टक्के), दिना (५२ टक्के), पोथरा ५१ टक्के, आणि गोसेखुर्द १०० टक्के भरले आहेत. उर्वरित १२ प्रकल्पांना अजूनही पावसाची प्रतीक्षाच आहे.तोतलाडोह प्रकल्पात केवळ ११ टक्के, रामटेक २१ टक्के, इटियाडोह २९ टक्के, सिरपूर ४ टक्के, पुजारीटोला ३ टक्के, कालिसरार ६ टक्के, असोलामेंढा ३३ टक्के, बोर ३० टक्के, धाम ४६ टक्के, लोवर वर्धा टप्पा-१ (२७ टक्के)आणि धापेवाडा बॅरेज टप्पा १ (३२ टक्के) इतका पाणीसाठा आहे.मध्यम प्रकल्पांची स्थितीही भयावह आहे. नागपूर विभागात एकूण ४० मध्यम प्रकल्प आहेत. याची एकूण पाणीसाठ्याची क्षमता ही ५३७.५८ दलघमी इतकी आहे. आजच्या तारखेत (२६ आॅगस्ट) केवळ १७६.४८ दलघमी म्हणजेच ३३ टक्के इतका पाणीसाठा आहे.