शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

...तर तालिबानमुळे भारताला माेठे नुकसान ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:12 IST

नागपूर : भारतासाठी भाैगाेलिकदृष्ट्या अफगाणिस्तानचे महत्त्व माेठे आहे. येथूनच मध्य आशियातील देशांशी व्यापाराचा रस्ता खुला हाेताे. भारताने अफगाणिस्तानमध्ये ३ ...

नागपूर : भारतासाठी भाैगाेलिकदृष्ट्या अफगाणिस्तानचे महत्त्व माेठे आहे. येथूनच मध्य आशियातील देशांशी व्यापाराचा रस्ता खुला हाेताे. भारताने अफगाणिस्तानमध्ये ३ अब्ज डाॅलरची आणि जाेडून असलेल्या चाव्हार प्रकल्पात ५ अब्ज डाॅलरची गुंतवणूक केली आहे. अफगाणिस्तानमधून येणाऱ्या तेलाच्या पाइपलाइनचे महत्त्व तालिबानवर अवलंबून आहे. त्यामुळे भारताला सावधपणे तालिबानबाबत भूमिका घ्यावी लागेल, अन्यथा माेठे नुकसान हाेईल, असे स्पष्ट मत ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूर तसेच विदर्भ गाैरव प्रतिष्ठान व प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अफगाणिस्तानातील सद्य:स्थिती व त्याचे भारतावर हाेणारे परिणाम’ विषयावर जतीन देसाई यांचे व्याख्यान आयाेजित करण्यात आले. ते म्हणाले, तालिबानींशी वाटाघाटी केल्या तरी आणि नाही केल्या तरी समस्या आहेच. भारताने सावधपणे तालिबानशी संवाद चालविला आहे; पण त्याची फलश्रुती काय निघेल, हे काळच सांगेल. पाकिस्तानसह सउदी अरब व इराणने तालिबानला मान्यता दिली आहे. चीन आणि रशियानेही समर्थनाची भूमिका घेतली आहे. अफगाणिस्तान हा कित्येक वर्षांपासून भारताचा मित्र राहिला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत आशियाई देशांनी भारताला अलिप्त पाडून महत्त्व कमी केले आहे. रशिया हा भारताचा पारंपरिक मित्र मानला जाताे; पण ११ ऑगस्टला रशियाने अफगाणिस्तानमध्ये तालिबानबाबत बाेलाविलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत भारताला निमंत्रण दिले नाही. हे भारतासाठी चांगले संकेत नाहीत, असे मत देसाई यांनी व्यक्त केले.

तालिबानने कब्जा करताच भारताने घाईघाईत आपले दुतावास अफगाणिस्तानमधून बंद करणे चुकीचा निर्णय असल्याची टीका देसाई यांनी केली. एकतर सर्व भारतीय परत येईपर्यंत दूतावास बंद करायला नकाे. तेथील हालचालींकडे लक्ष ठेवून इतर देशांच्या भूमिका समजण्यासाठी दूतावास सुरू ठेवणे आवश्यक हाेते, असे ते म्हणाले. अफगाणिस्तानातील महिला व नागरिकांना आश्रय घेण्यासाठी भारताएवढा याेग्य पर्याय नाही. तेथे अनेक संघटनांची माणसे आहेत, ज्यांना भारताने कायम मदत केली व तेही भारताबाबत सकारात्मक आहेत. अशांसाठी भारताने मदतीचे दरवाजे खुले करावे, अशी भावना देसाई यांनी व्यक्त केली.

अध्यक्ष म्हणून प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनीही मनाेगत व्यक्त केले. यावेळी प्रेस क्लबचे प्रदीप मैत्र, विदर्भ गाैरव प्रतिष्ठानच्या सचिव प्रगती पाटील, समीर सराफ आदी उपस्थित हाेते. संचालन बाळ कुळकर्णी यांनी केले.