शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

...तर तालिबानमुळे भारताला माेठे नुकसान ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:12 IST

नागपूर : भारतासाठी भाैगाेलिकदृष्ट्या अफगाणिस्तानचे महत्त्व माेठे आहे. येथूनच मध्य आशियातील देशांशी व्यापाराचा रस्ता खुला हाेताे. भारताने अफगाणिस्तानमध्ये ३ ...

नागपूर : भारतासाठी भाैगाेलिकदृष्ट्या अफगाणिस्तानचे महत्त्व माेठे आहे. येथूनच मध्य आशियातील देशांशी व्यापाराचा रस्ता खुला हाेताे. भारताने अफगाणिस्तानमध्ये ३ अब्ज डाॅलरची आणि जाेडून असलेल्या चाव्हार प्रकल्पात ५ अब्ज डाॅलरची गुंतवणूक केली आहे. अफगाणिस्तानमधून येणाऱ्या तेलाच्या पाइपलाइनचे महत्त्व तालिबानवर अवलंबून आहे. त्यामुळे भारताला सावधपणे तालिबानबाबत भूमिका घ्यावी लागेल, अन्यथा माेठे नुकसान हाेईल, असे स्पष्ट मत ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूर तसेच विदर्भ गाैरव प्रतिष्ठान व प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अफगाणिस्तानातील सद्य:स्थिती व त्याचे भारतावर हाेणारे परिणाम’ विषयावर जतीन देसाई यांचे व्याख्यान आयाेजित करण्यात आले. ते म्हणाले, तालिबानींशी वाटाघाटी केल्या तरी आणि नाही केल्या तरी समस्या आहेच. भारताने सावधपणे तालिबानशी संवाद चालविला आहे; पण त्याची फलश्रुती काय निघेल, हे काळच सांगेल. पाकिस्तानसह सउदी अरब व इराणने तालिबानला मान्यता दिली आहे. चीन आणि रशियानेही समर्थनाची भूमिका घेतली आहे. अफगाणिस्तान हा कित्येक वर्षांपासून भारताचा मित्र राहिला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत आशियाई देशांनी भारताला अलिप्त पाडून महत्त्व कमी केले आहे. रशिया हा भारताचा पारंपरिक मित्र मानला जाताे; पण ११ ऑगस्टला रशियाने अफगाणिस्तानमध्ये तालिबानबाबत बाेलाविलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत भारताला निमंत्रण दिले नाही. हे भारतासाठी चांगले संकेत नाहीत, असे मत देसाई यांनी व्यक्त केले.

तालिबानने कब्जा करताच भारताने घाईघाईत आपले दुतावास अफगाणिस्तानमधून बंद करणे चुकीचा निर्णय असल्याची टीका देसाई यांनी केली. एकतर सर्व भारतीय परत येईपर्यंत दूतावास बंद करायला नकाे. तेथील हालचालींकडे लक्ष ठेवून इतर देशांच्या भूमिका समजण्यासाठी दूतावास सुरू ठेवणे आवश्यक हाेते, असे ते म्हणाले. अफगाणिस्तानातील महिला व नागरिकांना आश्रय घेण्यासाठी भारताएवढा याेग्य पर्याय नाही. तेथे अनेक संघटनांची माणसे आहेत, ज्यांना भारताने कायम मदत केली व तेही भारताबाबत सकारात्मक आहेत. अशांसाठी भारताने मदतीचे दरवाजे खुले करावे, अशी भावना देसाई यांनी व्यक्त केली.

अध्यक्ष म्हणून प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनीही मनाेगत व्यक्त केले. यावेळी प्रेस क्लबचे प्रदीप मैत्र, विदर्भ गाैरव प्रतिष्ठानच्या सचिव प्रगती पाटील, समीर सराफ आदी उपस्थित हाेते. संचालन बाळ कुळकर्णी यांनी केले.