शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

...तर तालिबानमुळे भारताला माेठे नुकसान ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:12 IST

नागपूर : भारतासाठी भाैगाेलिकदृष्ट्या अफगाणिस्तानचे महत्त्व माेठे आहे. येथूनच मध्य आशियातील देशांशी व्यापाराचा रस्ता खुला हाेताे. भारताने अफगाणिस्तानमध्ये ३ ...

नागपूर : भारतासाठी भाैगाेलिकदृष्ट्या अफगाणिस्तानचे महत्त्व माेठे आहे. येथूनच मध्य आशियातील देशांशी व्यापाराचा रस्ता खुला हाेताे. भारताने अफगाणिस्तानमध्ये ३ अब्ज डाॅलरची आणि जाेडून असलेल्या चाव्हार प्रकल्पात ५ अब्ज डाॅलरची गुंतवणूक केली आहे. अफगाणिस्तानमधून येणाऱ्या तेलाच्या पाइपलाइनचे महत्त्व तालिबानवर अवलंबून आहे. त्यामुळे भारताला सावधपणे तालिबानबाबत भूमिका घ्यावी लागेल, अन्यथा माेठे नुकसान हाेईल, असे स्पष्ट मत ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूर तसेच विदर्भ गाैरव प्रतिष्ठान व प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अफगाणिस्तानातील सद्य:स्थिती व त्याचे भारतावर हाेणारे परिणाम’ विषयावर जतीन देसाई यांचे व्याख्यान आयाेजित करण्यात आले. ते म्हणाले, तालिबानींशी वाटाघाटी केल्या तरी आणि नाही केल्या तरी समस्या आहेच. भारताने सावधपणे तालिबानशी संवाद चालविला आहे; पण त्याची फलश्रुती काय निघेल, हे काळच सांगेल. पाकिस्तानसह सउदी अरब व इराणने तालिबानला मान्यता दिली आहे. चीन आणि रशियानेही समर्थनाची भूमिका घेतली आहे. अफगाणिस्तान हा कित्येक वर्षांपासून भारताचा मित्र राहिला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत आशियाई देशांनी भारताला अलिप्त पाडून महत्त्व कमी केले आहे. रशिया हा भारताचा पारंपरिक मित्र मानला जाताे; पण ११ ऑगस्टला रशियाने अफगाणिस्तानमध्ये तालिबानबाबत बाेलाविलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत भारताला निमंत्रण दिले नाही. हे भारतासाठी चांगले संकेत नाहीत, असे मत देसाई यांनी व्यक्त केले.

तालिबानने कब्जा करताच भारताने घाईघाईत आपले दुतावास अफगाणिस्तानमधून बंद करणे चुकीचा निर्णय असल्याची टीका देसाई यांनी केली. एकतर सर्व भारतीय परत येईपर्यंत दूतावास बंद करायला नकाे. तेथील हालचालींकडे लक्ष ठेवून इतर देशांच्या भूमिका समजण्यासाठी दूतावास सुरू ठेवणे आवश्यक हाेते, असे ते म्हणाले. अफगाणिस्तानातील महिला व नागरिकांना आश्रय घेण्यासाठी भारताएवढा याेग्य पर्याय नाही. तेथे अनेक संघटनांची माणसे आहेत, ज्यांना भारताने कायम मदत केली व तेही भारताबाबत सकारात्मक आहेत. अशांसाठी भारताने मदतीचे दरवाजे खुले करावे, अशी भावना देसाई यांनी व्यक्त केली.

अध्यक्ष म्हणून प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनीही मनाेगत व्यक्त केले. यावेळी प्रेस क्लबचे प्रदीप मैत्र, विदर्भ गाैरव प्रतिष्ठानच्या सचिव प्रगती पाटील, समीर सराफ आदी उपस्थित हाेते. संचालन बाळ कुळकर्णी यांनी केले.