शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

-तर १३०० वर गावात सुरू होऊ शकतात शाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ४२ हजारावर पोहचली आहे. २३०० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ४२ हजारावर पोहचली आहे. २३०० वर मृत्यू झाले आहेत. पण मे महिन्याच्या पंधरवड्यानंतर जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत गेली. गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात दोन आकड्यातच पॉझिटिव्ह आढळत आहेत. कोरोना कमी होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करता येईल का, याचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागपूर जिल्ह्यात १६६ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले होते तर आतापर्यंत जिल्ह्यातील १३०४ वर गावातून कोरोना परतला आहे. त्यामुळे या गावांमधील शाळा सुरू होऊ शकतात.

कोरोनामुळे मार्च २०२० पासून शाळा बंद आहेत. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये कोरोना शिथिल झाला असताना, शासनाने नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न केला. डिसेंबर महिन्यात त्याला सुरुवात झाली होती. पण कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढला आणि शाळा बंद कराव्या लागल्या. आता तर तिसऱ्या लाटेचा धोका वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविला आहे. शासनाने कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याने शिक्षण वगळता सर्वच क्षेत्र अनलॉक केले आहे. गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्हची संख्या ८ ते १० च्या दरम्यान आहे. २२ लाख लोकसंख्येच्या जिल्ह्यात हा आकडा अत्यल्प आहे. त्यामुळे शासनानेही शाळा सुरू करता येईल का, या दृष्टिकोनातून एक आढावा घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. जिल्ह्यात १९०४ गावे आहेत. मार्च, एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच कहर केला असतानाही जिल्ह्यातील १६६ गावात कोरोना पोहचू शकला नाही. मे महिन्याच्या पंधरवड्यापासून जिल्ह्यातील कोरोनाचे संक्रमण हळूहळू ओसरत आहे. आतापर्यंत १३०४ गावे कोरोनातून मुक्त झाली आहेत.

- जिल्ह्यातील शाळा

जिल्हा परिषदेच्या शाळा - १५३०

नगर परिषदेच्या शाळा - ६८

अनुदानित शाळा - ६९२

विना अनुदानित शाळा - ४३८

- एकूण विद्यार्थी संख्या - ४,५१,२९०

- दृष्टिक्षेपात

- जिल्ह्यातील एकूण गावे - १९०४

- सध्या कोरोनामुक्त असलेली गावे - १३०४

- शासनाच्या निर्देशानुसारच शाळा सुरू होईल

कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात ओसरत असले तरी, तिसऱ्या लाटेचा इशारासुद्धा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. अनेक गावे जरी कोरोनातून मुक्त झाली असलेही पण शासनाचे आदेश आल्याशिवाय शाळेतील वर्ग आम्ही सुरू करणार नसल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.

- कोरोनाचे संक्रमण वेगात असतानाही आमचे गाव कोरोनापासून दूर राहिले. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. पण तिसऱ्या लाटेचासुद्धा धोका आहे. त्यात लहान मुले बाधित होतील, असे तज्ज्ञांचे भाकीत आहे. त्यामुळे शाळा सुरू करणे आव्हानात्मक आहे.

-सुधीर गोतमारे, सरपंच, खुर्सापार, ता. काटोल