शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

... तर मंगल कार्यालय संचालकांनी खर्च भागवायचा कसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:08 IST

नागपूर : गेल्या वर्षी काेराेनाचा प्रकाेप सुरू झाल्यापासून मंगल कार्यालय, लाॅन्स बंद पडले हाेते. जवळपास ११ महिने व्यवसाय ठप्प ...

नागपूर : गेल्या वर्षी काेराेनाचा प्रकाेप सुरू झाल्यापासून मंगल कार्यालय, लाॅन्स बंद पडले हाेते. जवळपास ११ महिने व्यवसाय ठप्प हाेता. आता कुठे व्यवसाय सुरू झाला असताना पुन्हा दुसरी लाट आल्याचे कारण देत पुन्हा मंगल कार्यालयांवर बंदी घालण्यात आली. एक तर लाॅकडाऊनच्या काळात व्यवसाय बंद असताना कर्मचाऱ्यांचे पगार, मनपाचे टॅक्स, वीज बिल आणि कर्जाचे हप्ते संचालकांना भरावेच लागत असल्याने कंबरडे माेडले आहे. अशावेळी व्यवसायावर पुन्हा बंदी आणल्यास खर्च भागवायचा कसा, हा सवाल नागपूर मंगल कार्यालय व लाॅन्स असाेसिएशनने उपस्थित केला आहे.

मंगळवारी पत्रपरिषदेत असाेसिएशनचे सहसचिव संजय काळे म्हणाले, प्रवासी वाहने, विमाने, रेस्टाॅरंट पूर्ण क्षमतेने सुरू असताना मंगल कार्यालयांवर बंदी लादण्याचे कारण काय. जागेचा अभाव राहत असताना नागरिकांना त्यांच्या घरी कमी उपस्थितीत मंगलकार्य करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण गर्दी टाळण्याची व्यवस्था असताना मंगल कार्यालयांना का नाही. बाजारात हाेणारी अनियंत्रित गर्दी मंगल कार्यालयात येणाऱ्यांपेक्षा किती तरी अधिक असते, त्यावर काय नियंत्रण ठेवता, असा सवाल त्यांनी केला. केंद्र सरकारने सभागृहांच्या क्षमतेच्या ५० टक्के किंवा २०० लाेकांच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्याची परवानगी दिली असून, पुण्यात या नियमानेच व्यवसाय सुरू आहे. मग नागपुरातच बंदी का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी असाेसिएशनचे सचिव विजय तलमले, आशिष देशमुख, संदीप व्हाेरा, सुधाकर बैतुले आदी उपस्थित हाेते.

असाेसिएशनच्या मागण्या

- मंगल कार्यालये नियमाचे पालन करून व्यवसाय करण्यास तयार आहेत. त्यांना क्षमतेच्या ५० टक्के किंवा २०० व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रम करू देण्याची परवानगी द्यावी.

- संसर्ग वाढण्यासाठी केवळ मंगल कार्यालयांना जबाबदार धरता येणार नाही.

- व्यवसाय बंद पाडणे हा पर्याय ठरू शकत नाही. अन्यथा सरकारने पगार व मेंटेनन्सचा खर्च भागविण्याची मदत करावी.

- व्यवसाय बंद करीत आहात तर वीज बिल व मनपाचे टॅक्स माफ करावे. कर्जाचे हप्ते फेडण्यात सवलत द्यावी.

- नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई केल्यास आमची हरकत नाही.