शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट’ शिक्षणप्रणाली कागदावरच नको

By admin | Updated: October 30, 2015 03:01 IST

मध्य भारतातील शैक्षणिक केंद्र म्हणून नागपूरने स्वत:ची ओळख प्रस्थापित केली आहे.

नागपूर : मध्य भारतातील शैक्षणिक केंद्र म्हणून नागपूरने स्वत:ची ओळख प्रस्थापित केली आहे. गेल्या तीन वर्षांत नागपूरसाठी ‘ट्रीपल आयटी’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅप इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी या संस्थांनादेखील मंजुरी मिळाली. आता तर व्यवस्थापन शिक्षणातील अग्रणी संस्था ‘आयआयएम’देखील (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्ट) सुरू झाली आहे. उपराजधानीला ‘स्मार्ट सिटी’ करण्यासाठी या सर्व गोष्टी नक्कीच फायदेशीर होणार आहेत व जागतिक नकाशावर शहराची वेगळी ओळख निर्माण होणार आहे. परंतु यातील बहुतांश संस्था या अद्यापही कागदांवरच आहेत. शिवाय शहरातील इतर महाविद्यालयांना ‘स्मार्ट’ करण्यासाठीदेखील हालचाली करण्याची आवश्यकता आहे. बारावीनंतर हवेत ‘स्मार्ट’ पर्यायबारावीनंतर नागपुरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. २०१५ साली एकट्या नागपूर शहरातून ३४ हजार ७७१ पैकी ९३.०२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परंतु यापैकी अनेक विद्यार्थ्यांची धाव ही काही मोजक्या नामांकित महाविद्यालयांकडेच होती. तिथे प्रवेश मिळाला नाही,म्हणून इतर महाविद्यालयांत नाईलाजाने त्यांना प्रवेश घ्यावा लागला. मुळात नागपूर शहर हे मध्य भारतातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र असूनदेखील विद्यार्थ्यांना बारावीनंतर फारसे ‘स्मार्ट’ पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे अत्याधुनिक अभ्यासक्रम शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना इतर मोठी शहरे गाठावी लागतात. संशोधनावर भर कधी देणार?नागपूर शहरात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाची एकूण २३४ महाविद्यालये आहेत. परंतु अनेक पारंपरिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये काही अपवाद वगळता तंत्रज्ञानाचा म्हणावा तसा वापर करण्यात येत नाही. त्यामुळे विद्यार्थी पदवीधर तर होतात, परंतु प्रात्यक्षिक ज्ञान व कौशल्य यांच्याबाबतीत ते मागे असतात. विज्ञान महाविद्यालयांमध्ये तर संशोधनावर भर देण्याची जास्तीत जास्त आवश्यकता आहे. परंतु बोटावर मोजण्याइतपत महाविद्यालयांतच संशोधन कार्य चालते.रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची कमतरतानागपूर शहरात महाविद्यालयांची भरमार असली तरी प्रत्यक्षात पदवी शिक्षण झाल्यानंतर लगेच विद्यार्थ्यांना त्यांच्या पायावर उभे करु शकणाऱ्या अभ्यासक्रमांची कमतरताच आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये असलेल्या रोजगाराभिमुख व कौशल्याधारित अभ्यासक्रमांची गरज भासू लागली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात अगदी घरकाम करणाऱ्यांपासून आॅटोवाल्यांसाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे नागपूर विद्यापीठातदेखील कौशल्याधारित अभ्यासक्रमांची आवश्यकता आहे. विशेषत: मोबाईल रिपेअरिंग, सलून टेक्नॉलॉजी, हार्डवेअर मेन्टेनन्स, ग्राफीक डिझायनिंग मीडिया मॅनेजमेंट यासारखे प्रत्यक्ष रोजगार देणारे अभ्यासक्रम पदवीस्तरावर तयार करायला हवेत. काही खासगी संस्थांमध्ये कौशल्याधारित अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. परंतु त्यांचे शुल्क हे सामान्य विद्यार्थ्यांना परवडण्याजोगे नाही.(प्रतिनिधी)