शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लघु उद्योजकांनो, येणारा काळ तुमचाच!

By admin | Updated: August 23, 2015 03:00 IST

आपल्या देशाच्या विकासात लघु उद्योगांनी मौलिक योगदान दिले आहे. येणारा काळ हा लघु उद्योगांचाच असून यातूनच देश महासत्ता होईल.

देवेंद्र फडणवीस : लघु उद्योग भारतीच्या राष्ट्रीय परिषदेची सुरुवातनागपूर : आपल्या देशाच्या विकासात लघु उद्योगांनी मौलिक योगदान दिले आहे. येणारा काळ हा लघु उद्योगांचाच असून यातूनच देश महासत्ता होईल. समोरील मोठ्या संधी लक्षात घेऊन युवाशक्तीच्या कौशल्य विकासावर गुंतवणूक व्हावी, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. लघु उद्योग भारतीतर्फे रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात लघु व मध्यम उद्योजकांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेदरम्यान ते बोलत होते.यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योगमंत्री कलराज मिश्रा, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, अर्थतज्ज्ञ बजरंगीलाल गुप्ता हे प्रामुख्याने उपस्थित होते. देशात सर्वात जास्त रोजगारांची निर्मिती ही लघु उद्योगातूनच होते. देशात उद्योगक्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय २०२० साली भारत हा देशातील सर्वात तरुण देश असेल. त्यामुळे लघु उद्योगांसाठीदेखील अनेक संधी आहेत. ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न प्रत्यक्षात आणताना युवाशक्तीला कुशल मनुष्यबळात परावर्तित करण्याची गरज आहे. यातूनच सशक्त अर्थव्यवस्था निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. देशाच्या आर्थिक स्थितीसमोर आव्हाने असतानादेखील आज स्थिती बदलते आहे. उद्योगजगताच्या विकासासाठी देशात चांगली वाहतूक व्यवस्था व रस्ते असणे आवश्यक आहे. लघु उद्योगांचे महत्त्व लक्षात घेता विविध सुविधा वाढविण्याची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे लघु उद्योजकांसाठी व्याजदरात कपात व्हायला हवी, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले. उत्पादन शुल्क कमी करून दर्जा वाढविण्याची क्षमता लघु उद्योगांमध्येच आहे, असेदेखील ते म्हणाले. राज्यातील लघु उद्योगांना लागणारी वीज कमी दरात उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच विदर्भ-मराठवाड्याशी संबंधित ‘क्रॉस-सबसिडी’ हटविण्याचा निर्णय हिवाळी अधिवेशनापर्यंत घेण्यात येईल, असे सांगत विजेचे दर वाढणार नाहीत, असे आश्वासन त्यांनी दिले. राज्यात मोठे उद्योग आणणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. एक मोठा उद्योग आला की लहान उद्योगदेखील सुरू होतात.उद्योग सुरू करण्यासाठी आता ७६ ऐवजी केवळ २५ परवानग्या घ्याव्या लागतात.लघु उद्योगांना पुनरुज्जीवित करण्यासाठी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुणांचा उपयोग करायला हवा, असा सल्ला सुभाष देसाई यांनी दिला. या परिषदेला देशभरातून ६७२ प्रतिनिधी उपस्थित झाले आहेत. यावेळी आ.कृष्णा खोपडे, आ.विकास कुंभारे, लघुभारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष एच.व्ही.एस.एस.कृष्णा, राष्ट्रीय सचिव ओमप्रकाश मित्तल, भूषण वैद्य, शरद बागची, हेमंत अंबासेलकर प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)नेहरूंमुळे देशातील गरिबी वाढलीदेशातील गरिबी वाढण्यासाठी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे, अशी टीका यावेळी नितीन गडकरी यांनी केली. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन सरकारने अर्थव्यवस्थेचे ‘लेफ्टिस्ट मॉडेल’ स्वीकारले. यामुळे उद्योगांचा विकास झालाच नाही व परिणामी देशात गरिबीचे प्रमाण वाढले. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या ‘मॉडेल’वर सर्व राजकीय मतभेद विसरून विचार होणे आवश्यक असल्याचे मत गडकरी यांनी व्यक्त केले.विदर्भाच्या विकासासाठी पाच ‘क्लस्टर’केंद्रीय मंत्री कलराज मिश्रा यांनी लघुउद्योगांच्या विकासात तंत्रज्ञानाच्या भूमिकेचे महत्त्व विषद केले. लघुउद्योगांना चालना देऊन त्यांच्या विस्ताराची आवश्यकता आहे. विदर्भात तर उद्योग क्षेत्राच्या विकासाला प्रचंड वाव आहे. हीच बाब लक्षात घेऊन येथे पाच ‘क्लस्टर’ विकसित करण्यात येत आहे. यात दालमिल क्लस्टर, आॅटो इंजिनिअरींग क्लस्टर, गारमेन्ट क्लस्टर, फ्लाय अ‍ॅश क्लस्टर व राईस मिल क्लस्टर यांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.लघु उद्योगांमुळेच टिकली देशाची अर्थव्यवस्थादेशाच्या अर्थव्यवस्थेत लघु उद्योगांचे मोठे महत्त्व आहे. देशाची अर्थव्यवस्था अनेक संकटे झेलूनदेखील केवळ यामुळेच टिकली आहे. स्वदेशी, स्वावलंबी व विकेंद्रित अर्थतंत्रातूनच विकास शक्य आहे. लघु उद्योगांकडे पाहण्याची दृष्टी बदलायला हवी, असे मत बजरंगीलाल गुप्ता यांनी व्यक्त केले.