शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

लघु उद्योजकांनो, येणारा काळ तुमचाच!

By admin | Updated: August 23, 2015 03:00 IST

आपल्या देशाच्या विकासात लघु उद्योगांनी मौलिक योगदान दिले आहे. येणारा काळ हा लघु उद्योगांचाच असून यातूनच देश महासत्ता होईल.

देवेंद्र फडणवीस : लघु उद्योग भारतीच्या राष्ट्रीय परिषदेची सुरुवातनागपूर : आपल्या देशाच्या विकासात लघु उद्योगांनी मौलिक योगदान दिले आहे. येणारा काळ हा लघु उद्योगांचाच असून यातूनच देश महासत्ता होईल. समोरील मोठ्या संधी लक्षात घेऊन युवाशक्तीच्या कौशल्य विकासावर गुंतवणूक व्हावी, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. लघु उद्योग भारतीतर्फे रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात लघु व मध्यम उद्योजकांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेदरम्यान ते बोलत होते.यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योगमंत्री कलराज मिश्रा, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, अर्थतज्ज्ञ बजरंगीलाल गुप्ता हे प्रामुख्याने उपस्थित होते. देशात सर्वात जास्त रोजगारांची निर्मिती ही लघु उद्योगातूनच होते. देशात उद्योगक्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय २०२० साली भारत हा देशातील सर्वात तरुण देश असेल. त्यामुळे लघु उद्योगांसाठीदेखील अनेक संधी आहेत. ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न प्रत्यक्षात आणताना युवाशक्तीला कुशल मनुष्यबळात परावर्तित करण्याची गरज आहे. यातूनच सशक्त अर्थव्यवस्था निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. देशाच्या आर्थिक स्थितीसमोर आव्हाने असतानादेखील आज स्थिती बदलते आहे. उद्योगजगताच्या विकासासाठी देशात चांगली वाहतूक व्यवस्था व रस्ते असणे आवश्यक आहे. लघु उद्योगांचे महत्त्व लक्षात घेता विविध सुविधा वाढविण्याची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे लघु उद्योजकांसाठी व्याजदरात कपात व्हायला हवी, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले. उत्पादन शुल्क कमी करून दर्जा वाढविण्याची क्षमता लघु उद्योगांमध्येच आहे, असेदेखील ते म्हणाले. राज्यातील लघु उद्योगांना लागणारी वीज कमी दरात उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच विदर्भ-मराठवाड्याशी संबंधित ‘क्रॉस-सबसिडी’ हटविण्याचा निर्णय हिवाळी अधिवेशनापर्यंत घेण्यात येईल, असे सांगत विजेचे दर वाढणार नाहीत, असे आश्वासन त्यांनी दिले. राज्यात मोठे उद्योग आणणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. एक मोठा उद्योग आला की लहान उद्योगदेखील सुरू होतात.उद्योग सुरू करण्यासाठी आता ७६ ऐवजी केवळ २५ परवानग्या घ्याव्या लागतात.लघु उद्योगांना पुनरुज्जीवित करण्यासाठी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुणांचा उपयोग करायला हवा, असा सल्ला सुभाष देसाई यांनी दिला. या परिषदेला देशभरातून ६७२ प्रतिनिधी उपस्थित झाले आहेत. यावेळी आ.कृष्णा खोपडे, आ.विकास कुंभारे, लघुभारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष एच.व्ही.एस.एस.कृष्णा, राष्ट्रीय सचिव ओमप्रकाश मित्तल, भूषण वैद्य, शरद बागची, हेमंत अंबासेलकर प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)नेहरूंमुळे देशातील गरिबी वाढलीदेशातील गरिबी वाढण्यासाठी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे, अशी टीका यावेळी नितीन गडकरी यांनी केली. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन सरकारने अर्थव्यवस्थेचे ‘लेफ्टिस्ट मॉडेल’ स्वीकारले. यामुळे उद्योगांचा विकास झालाच नाही व परिणामी देशात गरिबीचे प्रमाण वाढले. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या ‘मॉडेल’वर सर्व राजकीय मतभेद विसरून विचार होणे आवश्यक असल्याचे मत गडकरी यांनी व्यक्त केले.विदर्भाच्या विकासासाठी पाच ‘क्लस्टर’केंद्रीय मंत्री कलराज मिश्रा यांनी लघुउद्योगांच्या विकासात तंत्रज्ञानाच्या भूमिकेचे महत्त्व विषद केले. लघुउद्योगांना चालना देऊन त्यांच्या विस्ताराची आवश्यकता आहे. विदर्भात तर उद्योग क्षेत्राच्या विकासाला प्रचंड वाव आहे. हीच बाब लक्षात घेऊन येथे पाच ‘क्लस्टर’ विकसित करण्यात येत आहे. यात दालमिल क्लस्टर, आॅटो इंजिनिअरींग क्लस्टर, गारमेन्ट क्लस्टर, फ्लाय अ‍ॅश क्लस्टर व राईस मिल क्लस्टर यांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.लघु उद्योगांमुळेच टिकली देशाची अर्थव्यवस्थादेशाच्या अर्थव्यवस्थेत लघु उद्योगांचे मोठे महत्त्व आहे. देशाची अर्थव्यवस्था अनेक संकटे झेलूनदेखील केवळ यामुळेच टिकली आहे. स्वदेशी, स्वावलंबी व विकेंद्रित अर्थतंत्रातूनच विकास शक्य आहे. लघु उद्योगांकडे पाहण्याची दृष्टी बदलायला हवी, असे मत बजरंगीलाल गुप्ता यांनी व्यक्त केले.