शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

आभाळ हेच आमचे छप्पर अन् जमीन हेच अंथरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:08 IST

नागपूर : अन्न, वस्त्र, निवारा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असल्याच्या कितीही बाता मारत असलो तरी वास्तविकता हीच आहे की स्वातंत्र्याचे ...

नागपूर : अन्न, वस्त्र, निवारा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असल्याच्या कितीही बाता मारत असलो तरी वास्तविकता हीच आहे की स्वातंत्र्याचे ७३ उन्हाळे-पावसाळे उलटून गेल्यावरही कोट्यवधी जनसंख्या उघड्यावर आहे. काहींना अन्न आहे तर वस्त्र नाही अन् वस्त्र आहे तर निवारा नाही. आभासी माध्यमांवर असमानतेच्या उद्विग्न व्यथा व्यक्त होत असल्या तरी चार भिंतीच्या आड दुलई ओढून बिनधास्त निद्रादेवीला शरण जात असणाऱ्यांना ही रिॲलिटी कळणार का, असा प्रश्न आहे.

वाढत्या गारठ्याने तापमानाचा पारा प्रचंड घसरत आहे. अन्न, वस्त्र, निवाऱ्याची व्यवस्था असणारेही कुडकुडत आहेत. अशा स्थितीत रोजगारासाठी एका अर्थाने अन्नासाठी मारामार करत शेकडो-हजारो मैल पायपीट करणाऱ्या बेघरांना वस्त्र आणि निवाऱ्याचा ठाव नाही. शहराच्या प्रमुख रस्त्यांवर हाताला असलेले काम शोधत, करत तेथेच कुणबा थाटणे हेच त्यांच्या नशिबी आहे. अशा एक दोन कुटुंबाच्या छोट्या वस्त्या दीक्षाभूमी, आयटीआय, कस्तूरचंद पार्क, महाराज बाग,यशवंत स्टेडियम, फुटाळा आणि अन्य ठिकाणी दिसून येतात. असेही नाही की त्यांची ही विवंचना कुणाच्या नजरेस पडत नाही किंवा कुणी त्यांच्या हाकेला साद देत नाही. स्वयंसेवी संस्था तत्पर आहेत. ब्लँकेट्स, चिमुकल्यांसाठी, वृद्धांसाठी स्वेटर्स पुरवले जातात. निवारा कोण पुरविणार... तर हा प्रश्न अनुत्तरित आहे. आभाळाला छप्पर मानत, जमिनीला अंथरुण म्हणत उन, वारा, पावसाच्या संगतीने आलेला दिवस पुढे ढकलत आहेत. या स्थितीने लोकशाहीचे चारही खांब कधीच हलत नाहीत, हे दुर्दैव आहे.

* रोजगाराच्या विवंचनेने निवारा सुटला

प्रत्येक राज्यात येणाऱ्या सरकारांनी मतदानापूर्वी गृहराज्य, गृहनगरातच रोजगाराची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. मात्र, ना केंद्राला ना राज्याला ना स्थानिक स्वराज्य संस्थांना आपली ही आश्वासनपूर्ती कधीच पूर्ण करता आली नाही. त्यामुळेच, आपल्या गावातील निवारा सोडून या बेरोजगारांना परमुलखात प्रयाण करावे लागते आणि निवाराविहीन जीवन कंठावे लागत आहे.

* भटकणार नाही तर कोण पुसणार

दीक्षाभूमीपुढे गाडीया लोहार समाजाचे एक कुटुंब तवा, कढई विकते. भैयालाल हा आपल्या वृद्ध व अनुभवी आत्या व मामासोबत आपले दोन भाऊ, पत्नी व एका मुलासाठी आला आहे. ऊर्वरित कुटुंब राजस्थानातील बारा जिल्ह्यातील एका गावात आहे. रोजगारासाठी दिवाळी ते होळी असा त्यांचा अर्धवट कुटुंबासोबतचा प्रवास असतो. उघड्यावरच संसार थाटला जातो. पुढे आरटीआय जवळ सुनील सोबत भाऊ, त्याची पत्नी, दोन मुले, आई असे कुटुंब जोधपूर येथून आले आहे. त्यांचेही तसेच. गोरक्षणपुढे गेल्या ३० वर्षापासून केशरभाई अहमदाबाद येथून येथेच वस्ती करून राहतात. लाकडी बॅट बनवून विकतात. अख्खे आयुष्य उघड्यावर चालले आहे. भटकणार नाही तर कोण पुसणार, असा सवाल त्यांचा आहे.

.............