शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
2
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
3
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
4
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
5
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
6
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
7
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
8
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
9
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
10
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
11
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
12
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
13
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
14
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
15
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
16
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
17
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
18
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
19
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
20
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच

सहा जणांना पाच वर्षांची शिक्षा

By admin | Updated: February 26, 2016 03:08 IST

कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरीनगर एलआयजी कॉलनी येथील एका कुटुंबावरील खुनी हल्लाप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने ...

१९ वर्षांनंतर न्याय :भाजप नगरसेवकाच्या भावाचा समावेशनागपूर : कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरीनगर एलआयजी कॉलनी येथील एका कुटुंबावरील खुनी हल्लाप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने हंसापुरी येथील भाजपचे नगरसेवक आणि मनपाच्या विधी समितीचे सभापती संजयकुमार बालपांडे यांच्या सख्ख्या भावासह सहा जणांना पाच वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी ५ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर अन्य एका आरोपीची निर्दोष सुटका केली. हल्ल्याची ही थरारक घटना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी १० नोव्हेंबर १९९६ रोजी घडली होती. न्यायालयाने गुरुवारी या खटल्याचा निकाल सुनावला आणि तब्बल १९ वर्षानंतर एका भयग्रस्त कुटुंबाला न्याय मिळाला. अरुणकुमार कृष्णराव बालपांडे (५३), भागवत गोपाळराव गुरव (६५), आशा भागवत गुरव (५६), रामदास गोपाळराव गुरव (६८), बबन ऊर्फ नारायण सुखलाल चौधरी (४५) आणि महेश गजानन वाडीभस्मे (३७), अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. संतोष उत्तमराव सूर्यवंशी (४६), असे निर्दोष सुटका झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात एकूण १० आरोपी होते. त्यापैकी रामचंद्र चौधरी आणि नीळकंठ उडावले हे दोघे खटला सुरू असताना मरण पावले. मोहम्मद शफी मोहम्मद करीम आलम नावाचा आरोपी न्यायालयातून जामीन मिळाल्यापासून फरार झाला. अद्यापही तो गवसला नाही. या प्रकरणातील फिर्यादी ललिता रामदास मासूरकर, त्यांच्या दोन बहिणी ममता व कुंदा, भाऊ प्रशांत आणि आई शांताबाई रामदास मासूरकर, अशी त्यावेळी गंभीररीत्या जखमी झालेल्यांची नावे होती. या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अरुणकुमार बालपांडे हा मयूर समाचार साप्ताहिकाचा संपादक असून त्याने नुकतीच वकिलीही सुरू केली होती. घटनेच्या वेळी म्हाडाची हिवरीनगर एलआयजी कॉलनी अस्तित्वात आली होती. त्यामुळे अनेक क्वॉर्टर रिकामे होते. रिकाम्या क्वार्टरपैकी ६/३ चा कब्जा अरुणकुमार बालपांडे याने करून या ठिकाणाहून मयूर समाचार हे साप्ताहिक सुरू केले होते. आरोपींपैकी भागवत गुरव आणि त्याची पत्नी आशा गुरव या दोघांनी ६/४ क्रमांकाच्या क्वॉर्टरचा ताबा घेऊन अनधिकृतपणे बालवाडी सुरू केली होती. ६/१ क्रमांकाच्या क्वॉर्टरमध्ये रामचंद्र चौधरीने दवाखाना सुरू केला होता. काही रिकाम्या क्वॉर्टचा वापर जुगार अड्डा भरवण्यासाठी केला जात होता. मासूरकर कुटुंबाकडून या अवैध प्रकारांबाबत म्हाडा आणि पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या जात होत्या. मासूरकर कुटुंब आरोपींच्या कृत्यांमुळे त्रस्त झाले होते. आरोपींना ‘त्या’ कुटुंबाला क्वॉर्टरमधून हाकलायचे होतेया आरोपींना हिवरीनगर एलआयजी कॉलनी येथे राहणाऱ्या मासूरकर कुटुंबाला हुसकावून लावायचे होते. मासूरकर कुटुंबामध्ये फिर्यादी ललिता मासूरकर यांचे वडील रामदास मासूरकर, दोन भाऊ राजेश आणि प्रशांत मासूरकर, बहिणी ममता व कुंदा आणि आई शांताबाई , असे एकूण सात जण राहत होते. आरोपींनी या कुटुंबाला त्रस्त करून सोडले होते. घटनेच्या एक दिवस आधी आरोपींनी त्यांना मारहाणही केली होती. परंतु पोलिसांनी दोन्ही पक्षांकडील लोकांविरुद्ध कारवाई केली होती. दिवाळीच्या दिवशी सर्वत्र लक्ष्मीपूजन आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. रामदास मासूरकर आणि त्यांचा मुलगा राजेश हे दोघे वगळता इतर सर्व जण घरी होते. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास आरोपींनी मासूरकर यांच्या खिडकीपुढे मोठमोठ्या आवाजांचे फटाके फोडणे सुरू केले होते. ‘या साल्यांना दिवाळी करू देऊ नाही, पाहून घेऊ’, असे ते म्हणत होते. आरोपींनी हातात लोखंडी रॉड, काठ्या आणि विटांचे तुकडे घेऊन मासूरकर यांच्या क्वॉर्टरमध्ये घुसून दिसेल त्याच्यावर हल्ला करायला सुरुवात केली होती. त्यांच्या या हल्ल्यात ललिता, भाऊ प्रशांत, दोन बहिणी ममता व कुंदा आणि आई शांताबाई मासूरकर गंभीररीत्या जखमी झाले होते. ललिताच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक पी. डी. पाडवी यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील गिरीश दुबे, फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. प्रशांत मासूरकर यांनी तर आरोपींच्या वतीने अ‍ॅड. आर. एच. रावलानी, अ‍ॅड. एस. आर. सोनी, अ‍ॅड. एन. व्ही. रुडे आणि अ‍ॅड. आर. के. तिवारी यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल मोहन चांदेकर आणि रमेश ठाकरे यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)