शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
5
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
6
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
7
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
8
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
9
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
10
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
11
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
12
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
13
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
14
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
15
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
16
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
17
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
18
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
19
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
20
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात स्थिती बिघडतेय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:15 IST

कळमेश्वर/हिंगणा/काटोल/कामठी/नरखेड/उमरेड/रामटेक : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे ग्रामीण भागात चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शहराप्रमाणे ग्रामीण भागात लॉकडाऊन झाल्यास यास ...

कळमेश्वर/हिंगणा/काटोल/कामठी/नरखेड/उमरेड/रामटेक : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे ग्रामीण भागात चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शहराप्रमाणे ग्रामीण भागात लॉकडाऊन झाल्यास यास जबाबदार कोण राहील, असा प्रश्न विचारल्या जात आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्यात शुक्रवारी ३१७ रुग्णांची नोंद झाली. यातील ७४ रुग्ण सावनेर तर ६० रुग्ण कळमेश्वर तालुक्यातील आहेत. सावनेर शहरात १८ तर ग्रामीणमध्ये ५६ रुग्णांची नोंद झाली.

कळमेश्वर शहरात १६ तर ग्रामीण भागात धापेवाडा येथे १२, वरोडा (९), पान उबाळी (६), सोनपूर (५), सुसंद्री, तिडंगी आणि गौंडखैरी येथे प्रत्येकी दोन तर मोहपा, सवंद्री, मडासावंगी, निळगाव, झुनकी, बोरगाव येथे प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाली.

उमरेड तालुक्यात शुक्रवारी ११ रुग्णांची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १,३२८ इतकी झाली आहे. यापैकी १,१८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही शहरात ५६ तसेच ग्रामीण भागात ४५ असे एकूण १०१ रुग्ण उपचार घेत आहेत.

गतवर्षी बाधितांचा टक्का अधिक असलेल्या कामठी तालुक्यातही आता रुग्णसंख्या वाढत आहे. शुक्रवारी येथे २४ रुग्णांची नोंद झाली. यात येरखेडा येथे ५, बजरंग पार्क (४), रनाळा (३), फुटाना ओळी, नया गोदाम, कोराडी, महादुला येथे प्रत्येकी दोन तर कवठा, भाजीमंडी परिसर, लोधीपुरा, नांदा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.

नरखेड तालुक्यात १२ रुग्णांची भर पडली आहे. यात शहरातील २ तर ग्रामीण भागातील १० रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या २७२ तर शहरात ६५ इतकी झाली आहे. शुक्रवारी जलालखेडा, थाटूरवाडा, भिष्णूर येथे प्रत्येकी २ तर खापाघुडन, भारसिंगी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.

रामटेक तालुक्यात २८ रुग्णांची भर पडली आहे. यात शहरात राजाजी वार्ड येथे ३ तर ग्रामीणमध्ये खडकी येथे ७, हिवरा बेंडे (६), वडांबा (५), करवाई, शिरपूर व शीतलवाडी येथे प्रत्येकी दोन आणि कांद्री येथे एका रुग्णाची नोंद झाल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिली.

काटोल ग्रामीणमध्ये धोका वाढला

काटोल शहरासोबत आता ग्रामीण भागात बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. तालुक्यात शुक्रवारी ४२ रुग्णांची भर पडली. यात काटोल शहरातील १२ रुग्ण तर ग्रामीण भागातील ३० रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागामध्ये कोंढाळी येथे चार, कारला, वाढोना, गोंडीमोहगाव, मसली, खामली, रिधोरा येथे प्रत्येकी दोन तर येरला, शिरसावाडी, येनवा, गोंडीदिग्रस, ढिवरवाडी, हरणखुरी, मुकणी, तांदुळवाडी, डोरली (भिंगारे), कचारी सावंगा, सबकुंड, चिखली (माळोदे), ढवळापूर, कामठी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.

हिंगण्यात आणखी २५ रुग्ण

हिंगणा तालुक्यात शुक्रवारी ५६० नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह झाले. यात वानाडोंगरी येथे १२, निलडोह (४), इसासनी व टाकळघाट येथे प्रत्येकी २, रायपूर, आमगाव, गिरोला, भारकस व कान्होलीबारा येथे प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत तालुक्यातील बाधितांची संख्या ४५३७ इतकी झाली आहे. यातील ४०१३ रुग्ण बरे झाले आहेत, तर १०४ जणांचा मृत्यू झाला आहे.