शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

उत्तर प्रदेशात आंबेडकरी आंदोलनाची परिस्थिती निराशाजनक

By admin | Updated: December 13, 2015 03:02 IST

उत्तर प्रदेशात आंबेडकरी आंदोलनाची परिस्थिती निराशाजनक झाली आहे, असे ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक कंवल भारती यांनी सांगितले.

कंवल भारती यांचे मत : एस. सी. एस. व्याख्यानमालानागपूर : उत्तर प्रदेशात आंबेडकरी आंदोलनाची परिस्थिती निराशाजनक झाली आहे, असे ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक कंवल भारती यांनी सांगितले. ते एस. सी. एस. व्याख्यानमालेत ‘आंबेडकरी आंदोलन आणि उत्तर प्रदेशचे वास्तव’ विषयावर बोलत होते.भारतीय रिपब्लिकन पक्षामध्ये सुरुवातीला चांगले नेते होते. सर्वत्र भारावलेले वातावरण होते. बुद्धप्रिय मौर्य व संघप्रिय गौतम हे दोन नेते आंबेडकरी आंदोलनातील शेर होते. त्यांच्या एका आवाजावर लाखो दलित एकत्र येत होते. परंतु प्रति-क्रांतीने आंबेडकरी आंदोलनाचा प्रभाव कमी केला. बुद्धप्रिय मौर्य यांना काँग्रेसने तर, संघप्रिय गौतम यांना भाजपाने ओढून घेतले. हे दोघेही आज कोठे आहेत, हे कोणालाही माहीत नाही. त्यांच्या आवाजावर १० लोकही जमण्याची परिस्थिती सध्या नाही. रिपब्लिकन पक्षाच्या या कमकुवतपणाचा लाभ कांशीराम यांच्या बहुजन समाज पक्षाने घेतला होता. परंतु सत्ता व मते मिळविण्यासाठी त्यांनीही आंबेडकरी आंदोलनाला मोठे केले नाही, अशी खंत भारती यांनी व्यक्त केली. सध्या समाजात आमुलाग्र वैचारिक परिवर्तन झाले आहे. त्यासोबतच समाजात आंबेडकरी आंदोलनाबाबत संभ्रमही निर्माण झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष इत्यादी पक्ष आपापल्या चष्म्यातून आंबेडकरी आंदोलनाकडे पाहात आहेत. यामुळे आंबेडकरी आंदोलनाचे प्रचंड नुकसान होत आहे, याकडे भारती यांनी लक्ष वेधले.कांशीराम यांनी मायावती यांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपासोबत गठबंधन केले होते. भाजपा सांप्रदायिक पक्ष नाही, असे जाहीर मतप्रदर्शन त्यांनी केले होते. याचा फटका आंबेडकरी आंदोलनाला बसला. याशिवाय मायावती जातीनिहाय संमेलने आयोजित करीत आहेत. बाबासाहेबांना जात नष्ट करायची होती, परंतु मायावती जातींना बळ देत आहेत. परिणामी प्रत्येक जातीतील नागरिक स्वत:चे भले करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांसोबत जात आहेत. त्याचा वाईट परिणाम आंबेडकरी आंदोलनावर पडलाय. शत्रूंना ओळखल्याशिवाय दलितांचा विकास होऊ शकत नाही, असे मत भारती यांनी व्यक्त केले.संत चोखामेळा समाज मुलींची शिक्षण संस्थेतर्फे पाचपावलीतील एस. सी. एस. शाळेच्या प्रांगणात ही तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. व्याख्यानमालेचा आज पहिला दिवस होता. संस्थेचे अध्यक्ष प्रा. रणजित मेश्राम अध्यक्षस्थानी तर उपाध्यक्ष व्ही. टी. चिकटे, एस. डी. सूर्यवंशी, सचिव पवन गजभिये, अधीक्षक प्रा. भाऊ लोखंडे, सदस्य श्याम कांबळे, प्राचार्या मंगला पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.(प्रतिनिधी)