शहरं
Join us  
Trending Stories
1
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
2
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
3
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
4
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
5
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
6
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
7
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
8
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
9
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
10
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
11
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
12
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
13
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
14
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
15
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
16
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
17
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!
18
बाजारात पुन्हा 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी 'धडाम', बाजाराच्या घसरणीमागे 'ही' आहेत ४ मोठी कारणे
19
Astro Tips: रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याबरोबरच ठेवा 'या' तीन गोष्टी; लक्ष्मी होईल कृपावंत!
20
Vastu Shastra: वास्तुसाठी फर्निचर निवडताना 'या' चुका टाळा, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष!

सर आली धावून, शेड केले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:12 IST

मंगेश तलमले लाेकमत न्यूज नेटवर्क खात : दाेन दिवस काेसळलेल्या संतत व मुसळधार पावसामुळे सूर नदीला बुधवारी (दि. १८) ...

मंगेश तलमले

लाेकमत न्यूज नेटवर्क

खात : दाेन दिवस काेसळलेल्या संतत व मुसळधार पावसामुळे सूर नदीला बुधवारी (दि. १८) पूर आला आणि या पुराने नदीकाठचे इंदाेरा (ता. माैदा) येथील स्मशानभूमीतील दहन शेड काेसळले व पुरासाेबत वाहून गेले. या प्रकारामुळे अंत्यसंस्काराची समस्या ऐरणीवर आली आहे.

इंदाेरा येथील नागरिक पूर्वीपासून अंत्यसंस्कार सूर नदीच्या तीरावर करायचे. पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यास अडचणी येत असल्याने नागरिकांनी त्यांनी याच नदीच्या काठावर शेडची निर्मिती केली. त्यासाठी सिमेंट काॅंक्रिटे काॅलम व चबुतराही तयार करण्यात आला हाेता. त्यामुळे ग्रामस्थांची साेय झाली हाेती.

या नवीन शेडची निर्मिती मागच्या वर्षी करण्यात आली असून, त्यावर पाच लाख रुपयांचा खर्च करण्यात आला हाेता, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. वर्षभरातच शेड वाहून गेल्याचे त्याचे बांधकाम निकृष्ट प्रतीचे करण्यात आले, असा आराेपही त्यांनी केला असून, कंत्राटदार व अभियंत्याकडून बांधकामाची रक्कम वसूल करण्याची मागणी केली आहे.

स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने गुरुवारी (दि. १९) सकाळी त्या काेल्हापुरी बंधाऱ्याच्या गेटमध्ये अडकलेला कचरा जेसीबीच्या मदतीने काढायला सुरुवात केली हाेती. दुसरीकडे, अंत्यसंसकराची समस्या साेडविण्यासाठी शासनाने गावात नवीन शेड तयार करून द्यावे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

...

बंधाऱ्यातील कचऱ्याने केला घात

सूर नदीवर या स्मशानभूमीपासून १५० मीटरवर काेल्हापुरी बंधारा आहे. या बंधाऱ्याच्या गेटमध्ये कचरा अडकला आणि नदीतील पाण्याच्या प्रवाहाने थाेडा मार्ग बदलला. हा प्रवाह स्मशानभूमीच्या दिशेने आला आणि त्यात नदीकाठचे जुने व नवीन असे दाेन्ही दहन शेड काेसळले व वाहून गेले. बंधाऱ्याचे गेट वेळीच साफ केले असते तर हा प्रकार घडला नसता, असेही काही जाणकार व्यक्तींनी सांगितले.

...

११ गावांमधील शेड संकटात

सूर नदीच्या काठावर माैदा तालुक्यातील अराेली, काेदामेंढी, भांडेवाडी, सावंगी, इंदाेरा, बाेरी, इजनी, माेरगाव, तांडा, पिंपळगाव व महालगाव या ११ गावांमधील स्मशानभूमी शेड आहेत. पिंपळगाव येथील शेडच्या पायव्याजवळील रेती वाहून गेली आहे. भविष्यात मुसळधार पाऊस काेसळल्यास व सूर नदीला पूर आल्यास याही गावांमधील दहन शेडला धाेका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

...

नदीला पूर आला हाेता. बंधाऱ्यात कचरा अडकल्याने पाण्याने प्रवाह बदलला. प्रवाह वेगात असल्याने स्मशानभूमीतील दाेन्ही शेड वाहून गेले. अंत्यसंस्काराची समस्या निर्माण झाल्याने शासनाने नवीन शेड तयार करून द्यावे.

- वीरेंद्रसिंग सेंगर,

उपसरपंच, इंदाेरा