शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

‘सिंगल फेज लाईन’ ठरताहेत निरुपयोगी?

By admin | Updated: December 5, 2014 00:40 IST

भारनियमनावर उपाय म्हणून राज्य शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून गावागावांत ‘सिंगल फेज’ वीजपुरवठा दिला. भारनियमनाच्या काळात ‘थ्री फेज’ वीजपुरवठा खंडित करून ‘सिंगल फेज’ वीजपुरवठा

आठ तासांचे भारनियमन : विद्युत देयकांत अवाजवी वाढहिवराबाजार : भारनियमनावर उपाय म्हणून राज्य शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून गावागावांत ‘सिंगल फेज’ वीजपुरवठा दिला. भारनियमनाच्या काळात ‘थ्री फेज’ वीजपुरवठा खंडित करून ‘सिंगल फेज’ वीजपुरवठा सुरू असायचा. मात्र, हल्ली ‘सिंगल फेज’ लाईनवरही रोज किमान सहा ते आठ तास भारनियमन केले जात असल्याने ही लाईन निरुपयोगी ठरत आहे.रामटेक तालुक्यातील हिवराबाजार हा परिसर आदिवासीबहुल आहे. देवलापार व हिवराबाजार परिसरातील प्रत्येक गावात ‘सिंगल फेज’ लाईन टाकण्यात आली. सुरुवातीला काही दिवस ‘सिंगल फेज’ विद्युुत पुरवठा नियमित केला जायचा. ‘थ्री फेज’ वीजपुरवठा खंडित असलेल्या काळातही ‘सिंगल फेज’ वीजपुरवठा सुरळीत असायचा. हल्ली भारनियमनाच्या नावाखाली ‘थ्री फेज’सोबतच ‘सिंगल फेज’ वीजपुरवठादेखील खंडित केला जातो. रोज किमान सहा ते आठ तास ‘सिंगल फेज’ वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे ‘सिंगल फेज’ लाईन टाकण्यासाठी तसेच स्वतंत्र ट्रॉन्सफार्मर लावण्यासाठी करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च व्यर्थ गेल्याची प्रतिक्रिया जाणकारांनी व्यक्त केली आहे. रोज सहा ते आठ तास ‘सिंगल फेज’ व ‘थ्री फेज’ वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने या परिसरात राईस मील, पीठ गिरणी, फेब्रिकेशन वर्कशॉप यासह झेरॉक्स मशीन, कम्प्युटर इन्स्टिट्यूट यासह अन्य महत्त्वाचे व्यवसाय भारनियमनाच्या काळात बंद असतात. आठवड्यातील बहुतांश दिवस दिवसा भारनियमन करण्यात येत असल्याने स्थानिक व्यावसायिकांची मोठी अडचण होत आहे. शिवाय, पिठाची गिरणी बंद राहात असल्याने नागरिकांनाही त्रास सहन कारावा लागतो. या भारनियमनामुळे काही गावांमधील पाणीपुरवठा योजना प्रभावित झाली असून, तेथील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. हा संपूर्ण परिसर देवलापार येथील महावितरणच्या कनिष्ठ अभियंता कार्यालयाला जोडण्यात आला आहे. सदर कार्यालय देवलापार येथील आठवडी बाजाराच्या दिवशी उघडले जाते. एरवी ते आठवडाभर बंदच असते. त्यामुळे वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अधिकारीच त्यांच्या कार्यालयात कधीकाळी हजर राहात असल्याने गाव पातळीवर काम करणाऱ्या लाईनमनवर कुणाचाही वचक राहिला नाही. (वार्ताहर)