शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

गायन आणि सतारवादनाने झंकारला महोत्सव

By admin | Updated: August 25, 2014 01:13 IST

सप्तक आणि महाराष्ट्र ललित कला निधी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणिजान संगीत महोत्सवाचे समापन गौरी पाठारे यांच्या सुमधुर गायनाने आणि प्रतीक चौधरी यांच्या सुरेल सतारवादनाने झाले.

नागपूर : सप्तक आणि महाराष्ट्र ललित कला निधी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणिजान संगीत महोत्सवाचे समापन गौरी पाठारे यांच्या सुमधुर गायनाने आणि प्रतीक चौधरी यांच्या सुरेल सतारवादनाने झाले. गायन आणि सुरेल सतारवादनाने हा महोत्सव झंकारला. सुरमणी गौरी पाठारे यांच्या गायनासह महोत्सवाचे आजचे प्रथम पुष्प गुंफण्यात आले. जयपूर-ग्वाल्हेर घराण्याची गायकी प्रतिध्वनीत करणाऱ्या या गायिकेच्या गायनाची विशेष प्रतीक्षा व अपेक्षा उपस्थित रसिकांना होती. अनेक गणमान्य महोत्सव आणि मराठी चित्रपटात पार्श्वगायन करणाऱ्या या गायिकेचे हे एकूणच प्रशंसनीय गायन होते. गौरी यांनी राग ललितगौरीने गायनाला प्रारंभ केला. विलंबित ‘दरस दिखा जा...’ व द्रुत लयीत ‘काहू समझाऊ मानत नाही...’ या बंदिशीने त्यांनी रागाचा हळुवार विस्तार केला. निकोप सुरेल स्वर, लयकारीचे मोहक विभ्रम, बोलबंदिशींचे लाघव्यपूर्ण उच्चारणामुळे त्यांचे गायन रसिकांची दाद घेणारे ठरले. यानंतर त्यांनी राग दुर्गा तसेच उपशास्त्रीय रसिला दादरा ‘कैसे जिया तरसत पियाबीन...’ सादर करून गायनाचा समारोप केला. त्यांना तबल्यावर संदेश पोपटकर आणि संवादिनीवर श्रीकांत पिसे यांनी साथ केली. मानसी देशपांडे आणि अर्चना सायगावकर यांनी तानपुऱ्यावर साथ केली. त्यानंतर दिल्ली येथील युवा आणि प्रतिभाशाली कलावंत प्रतीक चौधरी यांचे श्रुतीमधुर सतारवादन सादर करण्यात आले. पं. तानसेन यांच्या सेनिया घराण्याची पूर्वपरंपरा लाभलेल्या या वादकाने राग मारुबिहाग स्वरांकित करून आपल्या चतुरस्र वादनक्षमतेचा परिचय दिला. प्रारंभी ध्रुपद अंगाची सुरेल आलापी व नंतर त्रिताल निबद्ध मसिदखानी गत असे त्यांचे वादन आनंददायी होते. घराणेदार तालीम, रागाची शुद्धता, लयकारीवरील पकड आणि ताल अंगाचे उत्तम संचालन या वैशिष्ट्यांसह त्यांनी रसिकांना प्रभावित केले. विलक्षण दाणेदार स्वरांची बोलकी आंस, मींडची जोरदार अनुभूती व वादनातील माधुर्य यामुळे त्यांनी आपल्या वादनाने या महोत्सवावर आपली मुद्रा टंकित केली. त्यांना तबल्यावर ओजस अडिया यांनी अनुरूप साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन रेणुका देशकर यांनी केले. कलावंतांचे स्वागत पं. सतीश व्यास व प्रकाश दीक्षित यांनी केले. डॉ. उदय गुप्ते, उदय पाटणकर, विलास मानेकर आणि सहकाऱ्यांनी हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)