शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

तर परत मराठा समाजातर्फे मूक आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शासनाने मराठा आरक्षण मुद्द्यावर सकारात्मकता दाखविल्यामुळे आम्ही संयम राखला होता. परंतु सरकारने दिलेली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य शासनाने मराठा आरक्षण मुद्द्यावर सकारात्मकता दाखविल्यामुळे आम्ही संयम राखला होता. परंतु सरकारने दिलेली महिन्याभराची मुदत संपत असून शब्द पाळण्यात आला नाही तर परत समाजातर्फे मूक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खा. संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी दिला. राज्यव्यापी जनसंपर्क यात्रेदरम्यान नागपुरात आले असता नागपूर पत्रकार क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून आमचे मुद्दे नेत्यांनी तेथे मांडावे. ज्या गोष्टी राज्य शासनाच्या हाती आहे त्यावर त्यांनी त्वरित पावले उचलली पाहिजेत. शासनाने मराठा आरक्षण मुद्द्यावर पुनर्विचार याचिका दाखल करावी. जर ते जमले नाही तर मागासवर्ग आयोग स्थापन करून मराठा समाज कसा मागास आहे याचे सर्वेक्षण करावे. राज्यपालांकडे सखोल अहवाल सादर करावा. केंद्र शासनालादेखील आरक्षणासाठी वटहुकूम काढावा लागेल. केवळ घटनादुरुस्ती झाली तरी आरक्षण मिळाले असे होत नाही. मराठा आरक्षणाची प्रक्रिया सुरू करावी. लोकसभेतील सर्व खासदारांनी या मुद्यावर एकत्रित येत पंतप्रधानांची भेट घेतली पाहिजे, असे प्रतिपादन संभाजीराजे छत्रपती यांनी केले.

आंदोलनातून जनतेला वेठीस धरू नये

कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. आक्रोश मोर्चा काढणे हा समाजातील प्रतिनिधींचा अधिकार आहे. लाखोंच्या संख्येने रस्त्यावरदेखील उतरता येईल. मात्र सध्या परिस्थिती तशी नाही. शिवाय आंदोलनातून जनतेला वेठीस धरणे योग्य नाही. नेत्यांनी समाजाला दिशा द्यावी, दिशाहीन करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

एमपीएससीच्या परीक्षा घेताच का?

स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर एमपीएससीच्या कारभारातील संथपणा समोर आला आहे. कष्टाने परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरदेखील नियुक्ती मिळत नसेल तर मग एमपीएससीच्या परीक्षाच का घेता, असा सवाल खा. संभाजीराजे छत्रपती यांनी केला. अगोदरचे सरकार तसेच आताचे सरकार या मुद्द्यावर अपयशी ठरले आहे. यातून लवकरात लवकर मार्ग काढला पाहिजे, असे ते म्हणाले.

नक्षल्यांनी कायद्याचे पालन करावे, मगच शिवरायांचे नाव घ्यावे

नक्षलवाद्यांनी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक असल्याचा दावा केला आहे. कायदा हातात घेऊन काम करा असे शिवरायांनी कधीच सांगितले नव्हते. नक्षलवाद्यांनी कायद्याचे पालन करावे, मगच शिवरायांचे नाव घ्यावे. त्यांनी मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले.