शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

तर परत मराठा समाजातर्फे मूक आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शासनाने मराठा आरक्षण मुद्द्यावर सकारात्मकता दाखविल्यामुळे आम्ही संयम राखला होता. परंतु सरकारने दिलेली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य शासनाने मराठा आरक्षण मुद्द्यावर सकारात्मकता दाखविल्यामुळे आम्ही संयम राखला होता. परंतु सरकारने दिलेली महिन्याभराची मुदत संपत असून शब्द पाळण्यात आला नाही तर परत समाजातर्फे मूक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खा. संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी दिला. राज्यव्यापी जनसंपर्क यात्रेदरम्यान नागपुरात आले असता नागपूर पत्रकार क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून आमचे मुद्दे नेत्यांनी तेथे मांडावे. ज्या गोष्टी राज्य शासनाच्या हाती आहे त्यावर त्यांनी त्वरित पावले उचलली पाहिजेत. शासनाने मराठा आरक्षण मुद्द्यावर पुनर्विचार याचिका दाखल करावी. जर ते जमले नाही तर मागासवर्ग आयोग स्थापन करून मराठा समाज कसा मागास आहे याचे सर्वेक्षण करावे. राज्यपालांकडे सखोल अहवाल सादर करावा. केंद्र शासनालादेखील आरक्षणासाठी वटहुकूम काढावा लागेल. केवळ घटनादुरुस्ती झाली तरी आरक्षण मिळाले असे होत नाही. मराठा आरक्षणाची प्रक्रिया सुरू करावी. लोकसभेतील सर्व खासदारांनी या मुद्यावर एकत्रित येत पंतप्रधानांची भेट घेतली पाहिजे, असे प्रतिपादन संभाजीराजे छत्रपती यांनी केले.

आंदोलनातून जनतेला वेठीस धरू नये

कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. आक्रोश मोर्चा काढणे हा समाजातील प्रतिनिधींचा अधिकार आहे. लाखोंच्या संख्येने रस्त्यावरदेखील उतरता येईल. मात्र सध्या परिस्थिती तशी नाही. शिवाय आंदोलनातून जनतेला वेठीस धरणे योग्य नाही. नेत्यांनी समाजाला दिशा द्यावी, दिशाहीन करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

एमपीएससीच्या परीक्षा घेताच का?

स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर एमपीएससीच्या कारभारातील संथपणा समोर आला आहे. कष्टाने परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरदेखील नियुक्ती मिळत नसेल तर मग एमपीएससीच्या परीक्षाच का घेता, असा सवाल खा. संभाजीराजे छत्रपती यांनी केला. अगोदरचे सरकार तसेच आताचे सरकार या मुद्द्यावर अपयशी ठरले आहे. यातून लवकरात लवकर मार्ग काढला पाहिजे, असे ते म्हणाले.

नक्षल्यांनी कायद्याचे पालन करावे, मगच शिवरायांचे नाव घ्यावे

नक्षलवाद्यांनी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक असल्याचा दावा केला आहे. कायदा हातात घेऊन काम करा असे शिवरायांनी कधीच सांगितले नव्हते. नक्षलवाद्यांनी कायद्याचे पालन करावे, मगच शिवरायांचे नाव घ्यावे. त्यांनी मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले.