शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
3
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
4
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
5
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
6
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
7
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
8
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
9
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
10
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
11
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
12
Test Cricket: कसोटी कारकिर्दीत १० षटकारही मारले नाहीत असे ५ क्रिकेटपटू, यादीत एक भारतीय!
13
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
14
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
15
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
16
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
17
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
18
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
19
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
20
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा

सरसंघचालकांचे शेतकरी आंदोलनावर मौन

By admin | Updated: June 9, 2017 02:28 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हे नेहमीच समाजातील विविध विषयांवर भाष्य करीत असतात.

विरोधकांना काढले चिमटे, ट्रम्पवरदेखील केली टीका : शेतकरी हितासाठी ‘बौद्धिक’ मात्र नाही लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हे नेहमीच समाजातील विविध विषयांवर भाष्य करीत असतात. कधी ते गोहत्याबंदीचे समर्थन करतात, तर कधी आरक्षण बदलाची आवश्यकता असल्याचे ठामपणे सांगतात. संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोपप्रसंगी त्यांनी देशातील विरोधकांवर टीका केली. अगदी सातासमुद्रापार असलेल्या अमेरिकेच्या पर्यावरणविषयक धोरणांवरदेखील आसूड ओढले. मात्र आपल्या हक्कांसाठी बालबच्च्यांसह रस्त्यांवर उतरलेल्या महाराष्ट्राच्या मातीतील शेतकऱ्याच्या आंदोलनाबाबत मात्र त्यांनी ‘ब्र’ देखील उच्चारला नाही. कोट्यवधींचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या हितासाठी त्यांनी शासनाला ‘बौद्धिक’ का दिले नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.महाराष्ट्रासोबतच मध्यप्रदेशातदेखील शेतकरी आंदोलनाचे लोण पसरले आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात शेतकरी ‘शहीद’ झाले. इतकेच नव्हे तर राज्यातील एका भूमिपुत्राला कर्जाच्या ओझ्यामुळे स्वत:च्या प्राणांचा त्याग करावा लागला. संघाचे कार्य प्रत्येक क्षेत्रात चालते व कृषी क्षेत्रातदेखील काही प्रकल्प चालतात. अनेक शेतकरी संघाचे स्वयंसेवक आहेत व त्यांनी आपल्या कष्टाने संघवाढीत हातभार लावला आहे. अगदी तृतीय वर्ष वर्गातदेखील अनेक शेतकरी स्वयंसेवक म्हणून सहभागी झाले होते. त्यामुळे संघाला शेतकऱ्यांना ‘सुलतानी’ कारभारामुळे जी झळ लागते, त्याची चांगल्याने कल्पना आहे. देशविदेशातील मुद्यांवर भाष्य करत असताना सरसंघचालक मरणपंथाला लागलेल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारचे कान टोचतील किंवा उद्बोधनात्मक सल्ला तरी देतील, अशी स्वयंसेवक तसेच उपस्थितांना आशा होती. मात्र देशहितासाठी सदैव ‘दक्ष’ असलेल्या सरसंघचालकांनी शेतकरी आंदोलनावर मौन राखले आणि या आशांवर पाणी फेरल्या गेले.कोणत्याही राज्यात एखादी समस्या निर्माण झाली की तेथील भाजपाचे प्रमुख नेते संघस्थानी येऊन मार्गदर्शन घेतात. महाराष्ट्र, मध्यप्रदेश या दोन भाजपशासित राज्यात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोपाचे निमित्त साधत सरसंघचालकांनी भाजप नेत्यांना मार्गदर्शन केले नाही, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रविवारी नागपुरातील एका कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांचे भाषण सुरू असताना एका शेतकऱ्याने मध्येच उभे राहून भाषणबाजी बंद करा, आधी सातबारा कोरा करा, असे सुनावले होते. त्या शेतकऱ्याची लसाधी दखलही केंद्रीय कृषी मंत्र्यांनी घेतली नव्हती. यावर बरीच टीका झाली. आता सरसंघचालकांनीही मौन पाळल्याने शेतकरी दुर्लक्षितच राहील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.