शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

सरसंघचालकांचे शेतकरी आंदोलनावर मौन

By admin | Updated: June 9, 2017 02:28 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हे नेहमीच समाजातील विविध विषयांवर भाष्य करीत असतात.

विरोधकांना काढले चिमटे, ट्रम्पवरदेखील केली टीका : शेतकरी हितासाठी ‘बौद्धिक’ मात्र नाही लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हे नेहमीच समाजातील विविध विषयांवर भाष्य करीत असतात. कधी ते गोहत्याबंदीचे समर्थन करतात, तर कधी आरक्षण बदलाची आवश्यकता असल्याचे ठामपणे सांगतात. संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोपप्रसंगी त्यांनी देशातील विरोधकांवर टीका केली. अगदी सातासमुद्रापार असलेल्या अमेरिकेच्या पर्यावरणविषयक धोरणांवरदेखील आसूड ओढले. मात्र आपल्या हक्कांसाठी बालबच्च्यांसह रस्त्यांवर उतरलेल्या महाराष्ट्राच्या मातीतील शेतकऱ्याच्या आंदोलनाबाबत मात्र त्यांनी ‘ब्र’ देखील उच्चारला नाही. कोट्यवधींचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या हितासाठी त्यांनी शासनाला ‘बौद्धिक’ का दिले नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.महाराष्ट्रासोबतच मध्यप्रदेशातदेखील शेतकरी आंदोलनाचे लोण पसरले आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात शेतकरी ‘शहीद’ झाले. इतकेच नव्हे तर राज्यातील एका भूमिपुत्राला कर्जाच्या ओझ्यामुळे स्वत:च्या प्राणांचा त्याग करावा लागला. संघाचे कार्य प्रत्येक क्षेत्रात चालते व कृषी क्षेत्रातदेखील काही प्रकल्प चालतात. अनेक शेतकरी संघाचे स्वयंसेवक आहेत व त्यांनी आपल्या कष्टाने संघवाढीत हातभार लावला आहे. अगदी तृतीय वर्ष वर्गातदेखील अनेक शेतकरी स्वयंसेवक म्हणून सहभागी झाले होते. त्यामुळे संघाला शेतकऱ्यांना ‘सुलतानी’ कारभारामुळे जी झळ लागते, त्याची चांगल्याने कल्पना आहे. देशविदेशातील मुद्यांवर भाष्य करत असताना सरसंघचालक मरणपंथाला लागलेल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारचे कान टोचतील किंवा उद्बोधनात्मक सल्ला तरी देतील, अशी स्वयंसेवक तसेच उपस्थितांना आशा होती. मात्र देशहितासाठी सदैव ‘दक्ष’ असलेल्या सरसंघचालकांनी शेतकरी आंदोलनावर मौन राखले आणि या आशांवर पाणी फेरल्या गेले.कोणत्याही राज्यात एखादी समस्या निर्माण झाली की तेथील भाजपाचे प्रमुख नेते संघस्थानी येऊन मार्गदर्शन घेतात. महाराष्ट्र, मध्यप्रदेश या दोन भाजपशासित राज्यात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोपाचे निमित्त साधत सरसंघचालकांनी भाजप नेत्यांना मार्गदर्शन केले नाही, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रविवारी नागपुरातील एका कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांचे भाषण सुरू असताना एका शेतकऱ्याने मध्येच उभे राहून भाषणबाजी बंद करा, आधी सातबारा कोरा करा, असे सुनावले होते. त्या शेतकऱ्याची लसाधी दखलही केंद्रीय कृषी मंत्र्यांनी घेतली नव्हती. यावर बरीच टीका झाली. आता सरसंघचालकांनीही मौन पाळल्याने शेतकरी दुर्लक्षितच राहील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.