शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

शिक्षणाच्या माध्यमातून विकासाचा मार्ग दाखवावा

By admin | Updated: December 24, 2014 00:44 IST

उपेक्षित असलेल्या आदिवासी समाजातील तरु णांना मूळ प्रवाहात आणून शिक्षणाच्या माध्यमातून विकासाचे मार्ग दाखविणे आवश्यक आहे. यासाठी निधी आणि लाखो रु पयांच्या योजना असाव्या लागतातच असे नाही,

आंदोलनकर्त्या राजश्रीचे मत : मानसिकताही बदलणे गरजेचेनागपूर : उपेक्षित असलेल्या आदिवासी समाजातील तरु णांना मूळ प्रवाहात आणून शिक्षणाच्या माध्यमातून विकासाचे मार्ग दाखविणे आवश्यक आहे. यासाठी निधी आणि लाखो रु पयांच्या योजना असाव्या लागतातच असे नाही, त्यासाठीची मानसिकता असावी लागते, असे परखड मत राजश्री इवनाते या विद्यार्थिनीने मांडले. कायद्याचा अभ्यास करीत असलेली राजश्री आज आदिवासी विद्यार्थ्यांचा हक्क निर्धार मोर्चात सहभागी झाली होती. या मोर्चात विविध मागण्यांसाठी ती नारे देत असतानाच सहभागी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्वही समजावून सांगत होती. राजश्रीला बोलते केले असता ती म्हणाली, एकेकाळी भारतभूचा राजा असलेला मूळ मालक मूळनिवासी आदिवासी आज अन्न, वस्त्र, निवाऱ्यासाठी दाहीदिशा भटकत आहे. शिक्षण आणि विकासापासून आदिवासी समाज अद्याप दूरच आहे. आमच्यापैकी अनेक जणांना दहावीच्या पुढे मजल मारता येत नाही. परिस्थितीमुळे सर्वांचेच शिक्षण अर्धवट राहत आहे. मोलमजुरी करून आयुष्य घालवणे इतकाच त्यांच्यापुढे पर्याय आहे. यावर उपाय शोधणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत पदवीचे शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्याने आपल्यासोबत असलेल्या मित्रांना शिक्षणाची आणि हक्कांची साद घालणे आवश्यक आहे. शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे महत्त्वाचे झाले आहे. याचमुळे चित्र बदलेल. केंद्र आणि राज्य सरकारकडून या समाजाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांच्या अनेक योजना राबविल्या जात असल्या तरी त्या खऱ्या अर्थाने पोहोचतच नाहीत; ही जबाबदारी प्रामुख्याने सरकारची आहे. परंतु याकडे डोळसपणे पाहण्याचीही जबाबदारी आम्हा युवकांवर आली आहे. पूर्वी सह्याद्री पर्वतरांगांपासून मध्य भारतापर्यंत आदिवासींचे स्वतंत्र, संपन्न, समृद्ध राज्ये होती. आदिवासी लोक राजे, सरदार, जहागीरदार, किल्लेदार, जमीनदार, संस्थानिक होते. आदिवासी स्त्रिया पुरु षवेश परिधान करून लढणाऱ्या रणरागिणी होत्या, ही आठवणही आजच्या युवकांना करून देण्याची आणि त्यांना त्यासाठी जागृत करण्याची गरज आहे, अशीही ती म्हणाली. (प्रतिनिधी)