शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाच्या माध्यमातून विकासाचा मार्ग दाखवावा

By admin | Updated: December 24, 2014 00:44 IST

उपेक्षित असलेल्या आदिवासी समाजातील तरु णांना मूळ प्रवाहात आणून शिक्षणाच्या माध्यमातून विकासाचे मार्ग दाखविणे आवश्यक आहे. यासाठी निधी आणि लाखो रु पयांच्या योजना असाव्या लागतातच असे नाही,

आंदोलनकर्त्या राजश्रीचे मत : मानसिकताही बदलणे गरजेचेनागपूर : उपेक्षित असलेल्या आदिवासी समाजातील तरु णांना मूळ प्रवाहात आणून शिक्षणाच्या माध्यमातून विकासाचे मार्ग दाखविणे आवश्यक आहे. यासाठी निधी आणि लाखो रु पयांच्या योजना असाव्या लागतातच असे नाही, त्यासाठीची मानसिकता असावी लागते, असे परखड मत राजश्री इवनाते या विद्यार्थिनीने मांडले. कायद्याचा अभ्यास करीत असलेली राजश्री आज आदिवासी विद्यार्थ्यांचा हक्क निर्धार मोर्चात सहभागी झाली होती. या मोर्चात विविध मागण्यांसाठी ती नारे देत असतानाच सहभागी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्वही समजावून सांगत होती. राजश्रीला बोलते केले असता ती म्हणाली, एकेकाळी भारतभूचा राजा असलेला मूळ मालक मूळनिवासी आदिवासी आज अन्न, वस्त्र, निवाऱ्यासाठी दाहीदिशा भटकत आहे. शिक्षण आणि विकासापासून आदिवासी समाज अद्याप दूरच आहे. आमच्यापैकी अनेक जणांना दहावीच्या पुढे मजल मारता येत नाही. परिस्थितीमुळे सर्वांचेच शिक्षण अर्धवट राहत आहे. मोलमजुरी करून आयुष्य घालवणे इतकाच त्यांच्यापुढे पर्याय आहे. यावर उपाय शोधणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत पदवीचे शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्याने आपल्यासोबत असलेल्या मित्रांना शिक्षणाची आणि हक्कांची साद घालणे आवश्यक आहे. शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे महत्त्वाचे झाले आहे. याचमुळे चित्र बदलेल. केंद्र आणि राज्य सरकारकडून या समाजाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांच्या अनेक योजना राबविल्या जात असल्या तरी त्या खऱ्या अर्थाने पोहोचतच नाहीत; ही जबाबदारी प्रामुख्याने सरकारची आहे. परंतु याकडे डोळसपणे पाहण्याचीही जबाबदारी आम्हा युवकांवर आली आहे. पूर्वी सह्याद्री पर्वतरांगांपासून मध्य भारतापर्यंत आदिवासींचे स्वतंत्र, संपन्न, समृद्ध राज्ये होती. आदिवासी लोक राजे, सरदार, जहागीरदार, किल्लेदार, जमीनदार, संस्थानिक होते. आदिवासी स्त्रिया पुरु षवेश परिधान करून लढणाऱ्या रणरागिणी होत्या, ही आठवणही आजच्या युवकांना करून देण्याची आणि त्यांना त्यासाठी जागृत करण्याची गरज आहे, अशीही ती म्हणाली. (प्रतिनिधी)