शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

आधी निगेटिव्ह रिपोर्ट दाखवा, मगच आमच्या जिल्ह्यात या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:08 IST

नागपूर जिल्हा पोलीस कडक : कारवाईचाही धडाका लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात मृत्यूचे तांडव करणाऱ्या कोरोनाने ग्रामीण भागातही ...

नागपूर जिल्हा पोलीस कडक : कारवाईचाही धडाका

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरात मृत्यूचे तांडव करणाऱ्या कोरोनाने ग्रामीण भागातही थैमान घालणे सुरू केले आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण प्रचंड वाढला आहे. तो आणखी वाढू नये म्हणून नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काही विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार परजिल्ह्यातून नागपूर जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोनाबाधित नसल्याचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणाऱ्या व्यतिरिक्त इतर सर्वांना ‘आधी कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवा, नंतरच आमच्या जिल्ह्यात या’, असे सांगितले जात आहे.

शहराच्या तुलनेत नागपूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गेल्या वर्षीही बंदोबस्ताचे आणि उपाययोजनांचे प्रशंसनीय नियोजन केले होते. त्यामुळे शहराच्या तुलनेत नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीय कमी होती. या वर्षी मात्र शहराबरोबरच नागपूर जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वाढली आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात इस्पितळ आणि आरोग्याच्या उपायोजना तोकड्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील बाधित मोठ्या प्रमाणात उपचारासाठी नागपुरात धाव घेत आहेत. परिणामी नागपुरातील आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण आला आहे. तो आणखी वाढू नये म्हणून नागपूर जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याला जोडणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पोलिसांनी नाकेबंदी केली असून बाहेर जिल्ह्यातील व्यक्ती जिल्ह्यात (सार्वजनिक प्रवासी सेवेचा अपवाद वगळता) दाखल होत असेल तर त्याला कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे असे प्रमाणपत्र नाही त्यांना जिल्ह्याच्या सीमेवरूनच परत केले जात आहे. नागपूर जिल्ह्याला लागून देवलापार आणि केळवद नंतर छिंदवाडा आणि शिवनी हे मध्य प्रदेशातील जिल्हे आहेत. त्यामुळे या सीमांवरची नाकाबंदी अधिकच कडक आहे. जीवनावश्यक वस्तू आणि आरोग्याशी संबंधित सेवा वगळता अन्य कशाचीही ने-आण करू पाहणाऱ्या वाहनांच्या चालकापासून तो वाहनात बसलेल्या प्रत्येकाला कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवल्याशिवाय नागपूर जिल्ह्यात प्रवेश दिले जात नाही.

---

नो मास्कच्या १३ हजार कारवाया

जिल्ह्यातील गावागावात पोलिसांनी समुपदेशन चालवले आहे. गर्दी होऊ नये, यासाठी सर्वच प्रकारच्या दुकानात, खासकरून भाजीबाजारात दुकानदारांना गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्यांच्याकडून आदेशाचे उल्लंघन केले जाते, अशांवर कारवाई होत आहे. बेशिस्त नागरिकांवर ही पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला असून गेल्या महिनाभरात जिल्ह्यात १३,२५१ नागरिकांवर ‘नो मास्क’ची कारवाई केली आहे. ५ मंगल कार्यालये आणि २० हॉटेल्सवरही कारवाई करण्यात आली आहे.

---