शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

मानेतून काढली बंदुकीची गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:34 IST

मानेच्या ‘स्पायनल कॉड’मध्ये अडकून पडलेली बंदुकीची गोळी बाहेर काढायला उत्तर प्रदेशातील जिल्हा रुग्णालयासह लखनौ येथील ट्रॉमा केअर सेंटरच्या डॉक्टरांनी नकार दिला.

ठळक मुद्देशासकीय रुग्णालयाने नाकारली शस्त्रक्रिया वैरागडे यांनी केली यशस्वी : युवकाला मिळाले जीवनदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानेच्या ‘स्पायनल कॉड’मध्ये अडकून पडलेली बंदुकीची गोळी बाहेर काढायला उत्तर प्रदेशातील जिल्हा रुग्णालयासह लखनौ येथील ट्रॉमा केअर सेंटरच्या डॉक्टरांनी नकार दिला. २४ वर्षीय गोविंद पांडे याचा जीव धोक्यात आला होता. त्याच्या कंबरेखालील अवयवांची चेतना हरवली होती. जखमेतून सतत रक्त वाहत होते. कधी काहीही होऊ शकत होते. त्या अवस्थेत त्याला नागपुरात हलविले. आर्थाेपेडिक सर्जन डॉ. सुशील वैरागडे व बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. शिवाजी देशमुख यांनी शर्तीचे प्रयत्न केले. गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून गोविंदला जीवनदान दिले.उत्तर प्रदेश बहुराईच गाव येथील रहिवासी गोविंद पांडे (२४) २ आॅगस्ट रोजी आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. याच वेळी इतर मुलांसोबत वाद झाला. सायंकाळी गोविंद आपल्या घरासमोर बसून असताना अचानक त्याच्यावर गोळीबार झाला. एक गोळी गोविंदाचा मानेत शिरली. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी उपचाराला नकार देत लखनौ ट्रॉमा केअर सेंटरमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. डॉक्टरांनी प्रथमोपचार केला. परंतु गोळी काढायला सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागेल असे सांगून तीन-चार दिवस उपचार करून घरी पाठविले. ‘स्पायनल कॉड’ला भेदून गोळी गेल्याने गोविंदाच्या कंबरेखालचा भाग असंवेदनशील झाला होता. जखमेतून रक्तही वाहत होते. जीवाचा धोका निर्माण झाला होता. त्या अवस्थेत त्याला रेल्वेतून दीड दिवसांचा प्रवास करीत १३ आॅगस्ट रोजी नागपुरातील भगवाननगर रोड येथील आपुलकी वैरागडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेएमआरआरही अशक्यडॉ. सुशील वैरागडे म्हणाले, गोविंदच्या मानेच्या कुठल्या भागात बंदुकीची गोळी आहे हे पाहण्यासाठी एक्स-रे व साध्या सिटी स्कॅन शिवाय पर्याय नव्हता. धातूची गोळी असल्याने एमआरआय करणे शक्य नव्हते. यामुळे शस्त्रक्रिया करणे आणखी गुंतागुंतीचे झाले होते. आम्ही हे आव्हान स्वीकारले. १५ आॅगस्ट रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे निश्चित केले.धमणीला इजा पोहचण्याची होती शक्यतामानेत बंदुकीची जिथे गोळी होती त्याच्या जवळून मेंदूला रक्तपुरवठा करणारी धमणी गेली होती. शस्त्रक्रियेवेळी धमणीला थोडी जरी ईजा झाली असती तर गोविंदाच्या जीवाला धोका होणार होता. बधीरीकरण तज्ज्ञ डॉ. देशमुख यांनी गोविंदाचा रक्तदाब कमी करण्यास मदत केली. तब्बल साडेतीन तास त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू होती. अखेर तीन सेंटीमीटरची गोळी मानेतून बाहेर काढण्यात यश आले.पाच महिन्यात तो चालू शकेलशस्त्रक्रियेनंतर गोविंदाच्या कंबरेखालच्या अवयवांमध्ये चेतना यायला सुरुवात झाली. पाच दिवसांनी गोविंदाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. साधारण चार-पाच महिन्यात त्याच्या पायात ताकद येऊन तो पुन्हा चालू शकेल, असेही डॉ. वैरागडे म्हणाले.