शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

धक्कादायक - विसर्जन करताना ‘सेल्फी’ तिघांच्या जीवावर बेतली

By admin | Updated: September 15, 2016 17:54 IST

आष्टी (शहीद) तालुक्यातील माणिकवाडा येथील युवक गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी तारासावंगा येथील कड नदीच्या पात्रात गेले. विसर्जन करताना त्यांना सेल्फीचा मोह झाला

ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 15 - आष्टी (शहीद) तालुक्यातील माणिकवाडा येथील युवक गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी तारासावंगा येथील कड नदीच्या पात्रात गेले. विसर्जन करताना त्यांना सेल्फीचा मोह झाला. अशातच तोल जावून चारजण पाण्यात बुडाले. यात तिघांचा बुडून मृत्यू झाला, तर एकाचा वाचविण्यात यश आले. ही घटना  गुरूवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
हंसराज रमेश सोमकुंवर (२६), केवल सुरेश मसराम (२०) व चेतन गेंदराज नेहारे (१९) अशी मृतकांची नावे आहेत.  या घटनेने माणिकवाडा गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेतून पंकज खवशी हा सुदैवाने बचावला. तिघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. बचावलेल्या पंकज खवशी याने लगेच घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली.  तिघांनाही वाचविण्यासाठी कसोशीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र पाणी जास्त खोल असल्यामुळे यात यश आले नाही. यामध्ये त्या तिघांचाची करुण अंत झाला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विलास कानडे, ठाणेदार दिलीप ठाकूर, तारासावंगाचे सरपंच रत्नपाल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. मासेमारी करणारे वघाळ जि. अमरावती येथील पट्टीच्या पोहणाऱ्यांना बोलविले होते. दुपारी ४ वाजता तिघांचेही मृतदेह गवसले. यानंतर पंचनामा करून मृतदेह आर्वी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी परीसरातील शेकडो नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या घटनेमुळे माणिकवाडा गावावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण गावकरी एकत्र जमले आहे. तारसावंगा येथील कड नदीवर असलेल्या पुलावरुनच अनेकांनी गणेश मूर्तीचे विसर्जन केले. माणिकवाडा येथील गावकऱ्यांनीही पुलावरूनच गणेश विसर्जन केले. मात्र  हंसराज सोमकुंवर, केवल मसराम, चेतन नेहारे व पंकज खवशी यांनी नदीच्या पात्रात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. ही मंडळी मूर्ती घेऊन खोल पाण्यात गेलीे. मूर्तीच्या विसर्जनाचा प्रसंग आला तेव्हा त्यांना गणेशमूर्तीसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. सेल्फी घेतानाच त्यांचा तोल गेला. यामध्ये तिघांना आपल्या प्राणास मुकावे लागले.