शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

-तर शाळांवर शिमगा!

By admin | Updated: March 24, 2016 02:31 IST

आरटीई प्रतिपूर्तीची रक्कम न मिळाल्यामुळे खासगी शाळांनी आरटीईच्या प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय

नागपूर : आरटीई प्रतिपूर्तीची रक्कम न मिळाल्यामुळे खासगी शाळांनी आरटीईच्या प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. सध्या आरटीईअंतर्गत शाळांची नोंदणी सुरू आहे. २६ मार्चपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. अद्यापही ज्या शाळा आरटीईच्या प्रक्रियेत सहभागी झाल्या नाही, ज्या शाळांनी प्रवेशासाठी आॅनलाईन नोंदणी केली नाही, अशा शाळांची मान्यता व सी.बी.एस.ई.चे नाहरकत प्रमाणपत्र तत्काळ रद्द करावे, अशा लेखी सूचना शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. विशेष म्हणजे पहिल्यांदा आरटीईच्या संपूर्ण प्रक्रियेवर विभागीय शिक्षण उपसंचालकांचे नियंत्रण राहणार आहे. शिक्षण विभागाने २९ फेब्रुवारीपासून राज्यात आरटीईचा कार्यक्रम जाहीर केला होता. परंतु तांत्रिक कारणाने ही प्रक्रिया यशस्वी होऊ शकली नाही. आरटीईच्या प्रतीक्षेत असलेल्या पालकांनी आरटीईच्या प्रक्रियेवर संताप व्यक्त केला होता. शहरातील युवक काँग्रेस व आरटीई अ‍ॅक्शन कमिटीने उपसंचालक व शिक्षण अधिकाऱ्यांना घेरावही घातला होता. शिक्षण विभागाने १८ मार्चपासून आरटीई अंतर्गत शाळांची नोंदणी सुरू केली आहे. २६ मार्चपर्यंत शाळांना नोंदणी करायची आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला सुरुवात होणार आहे. परंतु खासगी शिक्षण संस्थांनी २०१२ पासून आरटीईची प्रतिपूर्तीची रक्कम न मिळाल्यामुळे या प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. शासनाने आरटीईची प्रक्रिया विभागीय उपसंचालकाच्या नियंत्रणात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण विभागात ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी विभागीय उपसंचालक अनिल पारधी यांनी बहिष्कार टाकणाऱ्या शाळांना दणकाच दिला आहे. त्यांनी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांच्या नावाने पत्र काढून ज्या शाळा नोंदणी करण्यास सहभागी होत नसतील, अशा शाळांची मान्यता रद्द करण्याचे प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहेत. दरम्यान, २३ मार्चपर्यंत जिल्ह्यात १५० वर शाळांनी नोंदणी केली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रा. शिक्षण अधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी दिली. आरटीईसाठी महापालिक ास्तरावर प्रत्येक झोनमध्ये एक व प्रत्येक तालुक्यात एक तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वात शिक्षण विभागाची सुद्धा तक्रार निवारण समिती राहणार आहे. सर्व्हरमुळे सुरुवातीला प्रक्रियेत अडथळा आला होता. सध्या सरल व शालेय शिक्षणाची अन्य आॅनलाईन कामे सुरू असल्यामुळे शिक्षण विभागाचे सर्व्हर व्यस्त आहे. त्यामुळे आरटीईच्या प्रक्रियेसाठी तीन अतिरिक्त सर्व्हर उपलब्ध होणार आहे.त्यामुळे लवकरच आरटीईची प्रक्रिया सुरळीत होईल. एप्रिलमध्ये विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन प्रवेशासही सुरुवात होईल, अशी अपेक्षा शिक्षण अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)‘रेन्ट अ‍ॅग्रीमेंट’ चालणार नाहीविद्यार्थ्यांची नोंदणी करताना किरायाने राहणारे पालक भाडेकरूचे शपथपत्र ‘रेन्ट अ‍ॅग्रिमेंट ’ जोडत होते. परंतु यावर्षीपासून अशा पालकांना स्थानिक इलेक्शन कार्ड व आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. त्याशिवाय आरटीईच्या प्रक्रियेत नोंद होणार नाही.