शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘ती’ झाली सावली

By admin | Updated: May 11, 2014 01:32 IST

रस्त्यावर जगण्याचा संघर्ष करणार्‍या मुलांची प्रगती शिक्षणामध्ये आहे, हे त्या माऊलीने हेरले. गरीब वस्त्यांमध्ये जाऊन पालकांना समजाविले.

 सुमेध वाघमारे - नागपूर

रस्त्यावर जगण्याचा संघर्ष करणार्‍या मुलांची प्रगती शिक्षणामध्ये आहे, हे त्या माऊलीने हेरले. गरीब वस्त्यांमध्ये जाऊन पालकांना समजाविले. मुलांना एकत्र आणले. कधी चर्चच्या हॉलमधून, कधी झाडाच्या सावलीत, भाड्याच्या फ्लॅटमधून हा प्रवास सुरू झाला. मुलांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून मुलांच्या दोन वेळच्या जेवण्याचा आणि राहण्याचा प्रश्नही सोडविला. मागील दहा वर्षांपासून ही अविरत सेवा सुरू आहे. आई म्हणून प्रत्येक मुलांच्या उज्ज्वल भविष्याची ती स्वप्न बघते आहे. तोच त्यांच्या जीवनाचा ध्यासही आहे. ८० वर्षीय आयरिस विल्किन्सन त्या माऊलीचे नाव. झाडाखालील या शाळेला आज स्वत:ची इमारत आहे. नवजीवन संस्थेंतर्गत गोधनी येथील टी.एस. विल्किन्सन नावाने ही शाळा दानदात्यांच्या मदतीने सुरू आहे. येथील शिक्षकही या सामाजिक कार्याचा एक भाग आहेत. आयरिस विल्किन्सनसारखेच तेही मुलांच्या भविष्यासाठी सर्व सामर्थ्यानिशी झुंज देत आहेत. मुलांच्या वाटेतील अंधार दूर करण्याचा त्यांचा हा संघर्ष आहे. त्यांनाही स्वत:ची चिंता नाही, चिंता आहे फक्त या गरीब मुलांच्या शिक्षणाची. आयरिस विल्किन्सन या एका खासगी शाळेमध्ये शिक्षक म्हणून कामाला होत्या. त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले, तिथे सर्वच श्रीमंतांच्या घरची मुले होती. त्यांना शिकविताना खिडकीतून बाहेर उन्हातान्हात रस्त्यावर फिरणारी, खेळणारी गरिबांची मुले दिसायची. त्यांच्यासाठी काहीतरी करायचे, असे नेहमीच वाटायचे. परंतु परिस्थिती नव्हती. कुटुंबाची जबाबदारीही माझ्यावरच होती. २००३ मध्ये सेवानिवृत्त झाले. एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने अशा मुलांना गोळा करू लागले. गरीब वसाहतीत जाऊन त्यांच्या पालकांना शिक्षणाविषयी माहिती देऊ लागले. साधारण १५-२० मुले शिक्षणासाठी तयार झाली. सदरमधील एका चर्चच्या अधिकार्‍याला विनंती केली. त्यांनी या मुलांना शिकविण्यासाठी हॉल दिला. परंतु महिनाभरातच हा हॉल रिकामा करून द्यावा लागला; नंतर झाडाच्या सावलीत शाळा सुरू झाली. ऊन-वार्‍यामुळे येथे शिकविणे कठीण झाले होते, म्हणून बैरामजी टाऊन येथील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने फ्लॅट घेतला. मुले चार भिंतीत शिकायला आली. याची माहिती एका विदेशी महिलेला मिळाली. तिने गोधनी येथे जागा विकत घेऊन थोडेफार बांधकाम करून दिले. नवजीवन संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या अंतर्गत शाळा सुरू झाली. नेहमी प्रेरणा देणारे माझे मिस्टर टी. एस. विलकिन्सन त्यांचेच नाव या शाळेला दिले. शाळा सुरू तर केली, पण मुलांच्या गैरहजरीचे प्रमाण मोठे होते. त्यामागे मुलांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न होता. म्हणून समाजातील दानदात्यांकडे गेली. काहींनी मदत केली. त्या मदतीमुळेच मुलांच्या दोन वेळच्या जेवणाची आणि राहण्याची सोय उपलब्ध करून देता आली. शाळेत आजच्या घडीला २५० विद्यार्थी आहेत. भिकारी, रिक्षेवाले, कचरा वेचणार्‍यांची ही सर्वच मुले हुशार आहेत. त्यांना चांगल्यात चांगले शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे करण्याचा आमच्या प्रयत्न आहे. हे समाजकार्य नाही. माझी, सर्वांची जबाबदारी आहे. ज्या समाजाने मला मोठे केले, शिकवले, माझी काळजी घेतली आणि खूप आशा जागृत केल्या, त्या समाजाचे ऋण मी एक आई म्हणून फेडत आहे.’