शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अन् तिने प्रेमच स्वीकारले

By admin | Updated: October 29, 2015 03:15 IST

खामला येथील एका राजकीय नेत्याच्या मुलीने छत्तीसगडच्या मुलासोबत प्रेमसंबंधातून पळून जाऊन लग्न केले.

नागपूर : खामला येथील एका राजकीय नेत्याच्या मुलीने छत्तीसगडच्या मुलासोबत प्रेमसंबंधातून पळून जाऊन लग्न केले. आपल्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याचा दावा करून तिला न्यायालयात हजर करण्यासाठी नेत्याने रिट याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुलीला व तिच्या पतीला पोलीस संरक्षणात न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्या मुलीने न्यायालयातही नातेसंबंधाचा सर्व दबाव झुगारून केवळ स्वत:चे प्रेम म्हणजे तिच्या पतीलाच स्वीकारले. अशाप्रकारे नेत्याचा दावा फोल ठरून प्रेमीयुगुलाचे विवाहबंधन कायम राहिले.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल या प्रकरणाचा एक अंक बुधवारी संपला. न्यायालयाने मुलीचे बयान लक्षात घेता नेत्याची याचिका निकाली काढली. दुसरा अंक मुलाविरुद्धची एफआयआर रद्द करण्यासंदर्भात असून त्यावर चार आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे. कविता व सचिन (काल्पनिक नावे) अनेक दिवस एकमेकांच्या संपर्कात राहिल्यानंतर प्रेमात पडले. सचिन शिक्षणासाठी गेल्या सहा वर्षांपासून नागपुरात राहात होता. सचिन हा कविताच्या चुलतभावाचा मित्र होता. यामुळे त्याची कवितासोबत ओळख झाली होती. कविताचे कुटुंबीयही सचिनशी परिचित होते. २ जुलै २०१५ रोजी कविता कोणालाही न सांगता सचिनसोबत छत्तीसगडला निघून गेली. शोधाशोध करूनही काहीच माहिती न मिळाल्यामुळे कविताच्या वडिलाने ५ जुलै रोजी राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंदविली. त्यात सचिनवर अपहरणाचा आरोप केला. त्यावरून सचिनविरुद्ध भादंविच्या कलम ३६४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कविता व सचिनने २ जुलै रोजी दुर्ग येथील आर्य समाज मंदिरात लग्न केले आहे. पोलिसांकडून ही बाब कळल्यानंतर कविताच्या वडिलाचा यावर विश्वास बसला नव्हता. यामुळे त्यांनी कविताला न्यायालयात उपस्थित करण्यासाठी याचिका दाखल केली होती. सचिन व तिच्या कुटुंबीयांनी कविताला बळजबरीने स्वत:च्या ताब्यात ठेवले आहे. कविताच्या जीवाला धोका आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता.(प्रतिनिधी)वडिलांना दिला नाही प्रतिसादकविता व सचिनचे कुटुंबीय न्यायालयात उपस्थित होते. कविता ही सचिन व त्याच्या कुटुंबीयांसोबत होती. कविता न्यायालयाच्या कक्षात प्रवेश करीत असताना तिचे वडील, आई व इतर नातेवाईक पुढेच उभे होते. ते सर्व कविताकडे आपुलकीने पहात होते. वडिलांच्या डोळ्यात थोडा राग होता. परंतु, कविताने कुणालाही प्रतिसाद न देता थेट न्यायालयाच्या कक्षात प्रवेश केला. वडिलांनी कविताकडे पाहून ‘हे तुने चांगले केले नाही’ असे म्हणावे त्याप्रमाणे खाली-वर मान हलवली.सचिनच्या अर्जावर नोटीसकविताच्या वडिलांच्या तक्रारीवरून राणा प्रतापनगर पोलिसांनी नोंदविलेला अपहरणाचा एफआयआर रद्द करण्यासाठी सचिनने उच्च न्यायालयात अर्ज सादर केला आहे. न्यायालयाने बुधवारी पोलीस निरीक्षकाला नोटीस बजावून यावर चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. तसेच, या कालावधीत सचिनला अटक करण्यात येऊ नये, असा अंतरिम आदेश पोलिसांना दिला.