शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

सुनियोजित पद्धतीने शाहरुखचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गुन्हेगारांच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या शाहरुख खानचा खून हा सुनियोजित पद्धतीने करण्यात आला असल्याचा आरोप ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गुन्हेगारांच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या शाहरुख खानचा खून हा सुनियोजित पद्धतीने करण्यात आला असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला असून याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

गेल्या २३ मे रोजी २६ वर्षीय शाहरुखचा गणेशनगरात खून करण्यात आला. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी बाबल्या ऊर्फ लक्ष्मण हिवराळे, विनायक इस्पाके, बंटी जैस आणि आर. के. पटेल यांना अटक केली होती. बाबल्या वस्तीत भरधाव वेगाने बाईक चालवित होता. शाहरुखचा मित्र आदर्श समुंद्रे याने त्याला बाईक हळू चालवण्याची समज दिली. यावरून तो संतापला. त्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने हल्ला करून शाहरुखचा खून केला होता. या भांडणात शाहरुखचा काहीही संबंध नव्हता. त्यामुळे त्याचे कुटुंबीय शाहरुखची हत्या एक सुनियोजित षडयंत्र असल्याची शंका व्यक्त करीत आहेत. त्यांच्यानुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींनी कुणाच्यातरी इशाऱ्यावर खून केला आहे. त्याचप्रकारे खुनानंतर शाहरुखचा मोबाईलही गायब आहे. शाहरुखच्या व्हाॅट्सॲपवर खुनानंतरही मेसेज येत जात होते. याबााबत विचारणा केली असता पोलीसही समाधानकारक उत्तर देत नाहीत.

असे सांगितले जाते की, दुपारपासूनच बाबल्या व त्याचे साथीदार वस्तीत धुमाकूळ घालत होते. त्यांनी दुपारी गणेशपेठ परिसरात मारहाणही केली. यानंतर त्यांनी एसडी हॉस्पिटल चौक आणि लंकेशच्या पानठेल्याजवळ गोंधळ घातला. रात्री ९ वाजता बाबल्याचा आदर्शसोबत वाद झाला. बाबल्याने बाईक चालवण्यावरून झालेल्या वादात आदर्शला जखमी केले. त्याचवेळी शाहरुख बहिणीच्या साक्षगंधासाठी आलेल्या पाहुण्यांसोबत व्यस्त होता. घरातील आवश्यक कामे आटोपून तो घरून बाहेर पडला आणि आरोपींनी विनाकारण त्याचा जीव घेतला. शाहरुख जेव्हा आईच्या पोटात होता, त्याचवेळी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. तो मावशीच्या कुटुंबासोबत राहत होता. तो नागनदीच्या पुलाजवळ भाजीपाल्याचे दुकान चालवायचा. या दुकानावरूनही त्याचा खून केल्याची शंका वर्तविण्यात आली आहे.