शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

सुनियोजित पद्धतीने शाहरुखचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गुन्हेगारांच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या शाहरुख खानचा खून हा सुनियोजित पद्धतीने करण्यात आला असल्याचा आरोप ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गुन्हेगारांच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या शाहरुख खानचा खून हा सुनियोजित पद्धतीने करण्यात आला असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला असून याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

गेल्या २३ मे रोजी २६ वर्षीय शाहरुखचा गणेशनगरात खून करण्यात आला. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी बाबल्या ऊर्फ लक्ष्मण हिवराळे, विनायक इस्पाके, बंटी जैस आणि आर. के. पटेल यांना अटक केली होती. बाबल्या वस्तीत भरधाव वेगाने बाईक चालवित होता. शाहरुखचा मित्र आदर्श समुंद्रे याने त्याला बाईक हळू चालवण्याची समज दिली. यावरून तो संतापला. त्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने हल्ला करून शाहरुखचा खून केला होता. या भांडणात शाहरुखचा काहीही संबंध नव्हता. त्यामुळे त्याचे कुटुंबीय शाहरुखची हत्या एक सुनियोजित षडयंत्र असल्याची शंका व्यक्त करीत आहेत. त्यांच्यानुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींनी कुणाच्यातरी इशाऱ्यावर खून केला आहे. त्याचप्रकारे खुनानंतर शाहरुखचा मोबाईलही गायब आहे. शाहरुखच्या व्हाॅट्सॲपवर खुनानंतरही मेसेज येत जात होते. याबााबत विचारणा केली असता पोलीसही समाधानकारक उत्तर देत नाहीत.

असे सांगितले जाते की, दुपारपासूनच बाबल्या व त्याचे साथीदार वस्तीत धुमाकूळ घालत होते. त्यांनी दुपारी गणेशपेठ परिसरात मारहाणही केली. यानंतर त्यांनी एसडी हॉस्पिटल चौक आणि लंकेशच्या पानठेल्याजवळ गोंधळ घातला. रात्री ९ वाजता बाबल्याचा आदर्शसोबत वाद झाला. बाबल्याने बाईक चालवण्यावरून झालेल्या वादात आदर्शला जखमी केले. त्याचवेळी शाहरुख बहिणीच्या साक्षगंधासाठी आलेल्या पाहुण्यांसोबत व्यस्त होता. घरातील आवश्यक कामे आटोपून तो घरून बाहेर पडला आणि आरोपींनी विनाकारण त्याचा जीव घेतला. शाहरुख जेव्हा आईच्या पोटात होता, त्याचवेळी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. तो मावशीच्या कुटुंबासोबत राहत होता. तो नागनदीच्या पुलाजवळ भाजीपाल्याचे दुकान चालवायचा. या दुकानावरूनही त्याचा खून केल्याची शंका वर्तविण्यात आली आहे.