शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

प्रादेशिक विभागाच्या ताब्यातील सात अभयारण्य उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:11 IST

नागपूर : ‘ज्याचे माकड ताेच नाचवेल’, ही म्हण काही चुकीची नाही. राज्यातील उपेक्षित राहिलेल्या अभयारण्याबाबत तरी तसेच म्हणावे लागेल. ...

नागपूर : ‘ज्याचे माकड ताेच नाचवेल’, ही म्हण काही चुकीची नाही. राज्यातील उपेक्षित राहिलेल्या अभयारण्याबाबत तरी तसेच म्हणावे लागेल. व्याघ्र प्रकल्प व अभयारण्य विकासाबाबत अग्रणी असलेल्या महाराष्ट्रातील सात अभयारण्य मात्र विकासापासून दुर्लक्षित राहिली आहेत. व्यवस्थापनाची जबाबदारी वनविभागाच्या प्रादेशिक विभागाकडे असल्याकारणाने ते उपेक्षित राहिले आहेत. वन्यजीव विभागाकडे व्यवस्थापन असते तर चित्र काही वेगळे असते, असा ठाम विश्वास वन्यजीव अभ्यासकांना वाटताे.

महाराष्ट्रात ६ व्याघ्र प्रकल्प व ५० वन्यजीव अभयारण्य अस्तित्वात आहेत. यातील बहुतेक अभयारण्याचे व्यवस्थापन वन्यजीव विभागाकडे आहे. त्यामुळे ते बऱ्यापैकी विकसित आहेत. मात्र सात अभयारण्य विकासापासून वंचित, दुर्लक्षित व उपेक्षित राहिले आहेत. विशेष म्हणजे त्यांचे नावही अनेकांना माहीत नाही. यामध्ये विदर्भातील यवतमाळचे इसापूर, गडचिराेलीचे प्राणहिता, चंद्रपूरचे घाेडाझरी तसेच ताम्हीणी, सुधागड हे पुण्याचे, काेल्हापूरचे मालवण सागरी अभयारण्य व ठाणे येथील अभयारण्याचा समावेश आहे. यांना अभयारण्याची मान्यता देऊन बरीच वर्षे झाली आहेत, पण त्याप्रमाणे विकास हाेऊ शकला नाही.

राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी जानेवारी २०२१ मध्ये या सातही अभयारण्यांचे व्यवस्थापन वन्यजीव विभागाकडे सुपूर्द करण्याची मागणी तत्कालीन वनमंत्री तसेच मुख्य वन्यजीव संरक्षक यांना निवेदन सादर करून अभयारण्य वन्यजीव विभागाकडे हस्तांतरित करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची विनंती केली हाेती. त्यांच्या मते, प्रादेशिक विभागाचे प्राधान्य हे वनव्यवस्थापन आणि त्यातून महसूल गाेळा करण्यात जास्त असते. त्यामुळे वन्यजीव अधिवासांचे व्यवस्थापन, त्यांचे संवर्धन व संरक्षण कायम दुर्लक्षित राहिले आहे. हे सातही अभयारण्य कित्येक वर्षांपासून जाहीर हाेऊनही उपेक्षित राहिले आहेत. त्यापेक्षा वन्यजीव विभागाकडे असलेल्या अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पांचा चांगला विकास झाला आहे व त्यांचे पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्व वाढले आहे. याचा गांभीर्याने विचार करून सात अभयारण्यांचे हस्तांतरण ताबडताेब वन्यजीव विभागाकडे करण्यात यावे, अशी मागणी पाटील यांनी केली.

अभयारण्य प्रादेशिक विभाग प्रस्तावित वन्यजीव विभाग

इसापूर पुसद पांढरकवडा

प्राणहिता सिराेंचा आलापल्ली

घाेडाझरी ब्रह्मपुरी ताडाेबा

मालवण सागरी सावंतवाडी काेल्हापूर

ताम्हिणी पुणे पुणे

सुधागड पुणे पुणे

ठाणे क्रिक फ्लेमिंगाे ठाणे

वन्यजीव विभागाकडे असलेल्या सर्वच अभयारण्याचा चांगला विकास झाला आहे. हे सात अभयारण्य वन्यजीव विभागाकडे हस्तांतरित केल्यास वन्यजीव अधिवासाचे व्यवस्थापन, त्यांचे संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टीने मदत हाेईल आणि पर्यटन वाढीलाही चालना मिळेल.

- यादव तरटे पाटील, सदस्य, महाराष्ट्र वन्यजीव मंडळ