शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

वाहतूक सुरळीत करणार ज्येष्ठ नागरिक

By admin | Updated: May 10, 2014 01:29 IST

शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दूरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामूळे सर्व मोठय़ा चौकात वाहतुकीची..

जनआक्रोशचा पुढाकार : १९ जणांची नियुक्तीनागपूर : शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दूरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामूळे सर्व मोठय़ा चौकात वाहतुकीची कोंडी होणे हा नवीन प्रकार राहिला नाही. यावर उपाययोजना म्हणून जनआक्रोशच्या पुढाकाराने पोलीस आयुक्तांनी १९ अतिरिक्त वाहतूक अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. ५0 ते ७२ वयोगटातील हे अधिकारी विविध चौकांत वाहतूक सुरळीत करण्यासाठी आपला वेळ देणार आहेत.काही वर्षांपूर्वी काही चौकांमध्ये ज्येष्ठ नागरिक वाहतूक सुरळीत करताना दिसून यायचे. त्यांच्या शिटीवर चौकातील वाहतूक चालायची. अनेक वाहनधारकांचे ते तर मित्र झाले होते. अशा चौकांमध्ये वाहतूक सिग्नल तोडण्याचे प्रकार बंद झाले होते. परंतु दरम्यानच्या काळात पोलीस मित्र म्हणून संबोधले जाणारे काही युवक चौकात कमी आणि रस्त्याच्या आडोशाला जास्त दिसत होते. पोलिसांना मदत म्हणून वाहन पकडण्याचेच काम ते करीत होते. यांच्या कार्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. आता पुन्हा जनआक्रोशच्या पुढाकाराने चौकात ज्येष्ठ नागरिक आपली सेवा देताना दिसणार आहेत. आज गुरुवारी धरमपेठ येथील ट्रॅफिक पार्कमध्ये आयोजित छोटेखानी कार्यक्रमात उपपोलीस आयुक्त भारत तांगडे यांनी १९ ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त वाहतूक पोलीस अधिकार्‍याचे प्रमाणपत्र दिले. हे अधिकारी आपल्या सोयीनुसार चौकातील पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्याचे कार्य करणार आहेत. कार्यक्रमाला जनआक्रोशचे अध्यक्ष डॉ. अनिल लद्धड, सचिव रवींद्र कासखेडीकर उपस्थित होते. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. या ज्येष्ठांमध्ये कोणी नवृत्त डॉक्टर, नायब तहसीलदार, अभियंता, कर्मचारी, अधिकारी आदींचाही सहभाग आहे. (प्रतिनिधी)