शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

विभागातील पेरण्या खोळंबल्या!

By admin | Updated: July 3, 2016 02:50 IST

जून महिना उलटूनसुद्धा नागपूर विभागात अजूनपर्यंत समाधानकारक पाऊस पडलेला नाही.

चिंता वाढली : केवळ १५.१४ टक्के पेरण्या नागपूर : जून महिना उलटूनसुद्धा नागपूर विभागात अजूनपर्यंत समाधानकारक पाऊस पडलेला नाही. यामुळे संपूर्ण विभागातील पेरण्या खोळंबल्या असून, आतापर्यंत केवळ १५.१४ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांसह कृषी विभागाची चिंता वाढली आहे. यातच मागील आठवडाभरापासून पुन्हा पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली, त्यांचाही जीव टांगणीला लागला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार नागपूर विभागातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात लागवडीखाली एकूण १९ लाख १० हजार ३०० हेक्टर क्षेत्र आहे. मात्र त्यापैकी केवळ २ लाख ८९ हजार २०० हेक्टरवरच पेरणी पूर्ण झाली आहे. शिवाय यात नागपूर जिल्ह्यातील १७ टक्के पेरणीचा वाटा आहे. हवामान विभागाच्या मते, जून महिन्यात नागपूर विभागात सरासरी १६०.६ मिमी. पाऊस पडतो. मात्र यावर्षी केवळ १३२.६ मिमी. (७०.७ टक्के) पाऊस पडला आहे. पावसाची ही टक्केवारी जिल्हानिहाय पाहता नागपूर जिल्ह्यात ५६.३ टक्के, वर्धा जिल्ह्यात ८३.३ टक्के, भंडारा ४१.४ टक्के, गोंदिया ४७.६ टक्के, चंद्रपूर ८८.९ टक्के व गडचिरोली जिल्ह्यात ८७ टक्के पाऊस पडला आहे. यामुळे विभागातील वर्धा येथे २७ टक्के आणि चंद्रपूर जिल्ह्यातील १८ टक्के पेरण्या आटोपल्या असून, नागपूर जिल्ह्या हा १७ टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय भंडारा येथे १ टक्का, गोंदिया ३ टक्के व गडचिरोली जिल्ह्यात ४ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने जिल्ह्यासाठी ४ लाख ८४ हजार ५०६ हेक्टर क्षेत्रावरील पीक लागवडीचे नियोजन केले आहे. त्यापैकी आतापर्यंत ८३ हजार ५९८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. याचा तालुकानिहाय विचार करता, नागपूर ग्रामीणमध्ये १८.५० टक्के, कामठी ०.५७ टक्के, हिंगणा २८.५७ टक्के, रामटेक ०० टक्के, पारशिवनी १९.९३ टक्के, मौदा ०.९३ टक्के, काटोल १९.५८ टक्के, नरखेड ५.९१ टक्के, सावनेर ७०.७४ टक्के, कळमेश्वर ३४.७६ टक्के, उमरेड १४.४४ टक्के, भिवापूर १.०५ टक्के व कुही येथे ०.२ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. तसेच जिल्ह्यात कापसाचे १ लाख ९६ हजार ९७० हेक्टर अपेक्षित लागवड क्षेत्र असून आतापार्यंत त्यापैकी ६१ हजार ४२८ हेक्टर कापसाची लागवड झाली आहे. शिवाय ८ हजार ४५९ हेक्टरवर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. (प्रतिनिधी)