शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

‘एसडीओ’ला जातवैधता तपासण्याचे अधिकार नाहीत

By admin | Updated: December 27, 2014 03:00 IST

कायद्यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी अर्जदाराकडून किमान आवश्यकता पूर्ण केल्या जात आहेत किंवा नाही हे पाहणे व समाधान झाल्यानंतर जात प्रमाणपत्र देणे अपेक्षित आहे.

कायद्यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी अर्जदाराकडून किमान आवश्यकता पूर्ण केल्या जात आहेत किंवा नाही हे पाहणे व समाधान झाल्यानंतर जात प्रमाणपत्र देणे अपेक्षित आहे. जात प्रमाणपत्राच्या दाव्याची प्रामाणिकता तपासताना ते जात पडताळणी समितीच्या अधिकारक्षेत्रात प्रवेश करू शकत नाही. कायद्याच्या कलम २ (के) अनुसार जात प्रमाणपत्राची सत्यता तपासण्याचे अधिकार जात पडताळणी समितीला आहेत. उपविभागीय अधिकारी केवळ जात प्रमाणपत्र देऊ शकतात. उपविभागीय अधिकाऱ्याने जात प्रमाणपत्र दिल्याशिवाय जातीची वैधता तपासण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे प्रमाणपत्र जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्येही फरक आहे, असे निरीक्षण न्यायालयाने निर्णयात नोंदविले आहे. दासरखेड (ता. मलकापूर) येथील नामदेव इंगळे यांच्यासह एकूण सहा जणांनी दाखल केलेली रिट याचिका निकाली काढताना न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व पुखराज बोरा यांनी हा निर्णय दिला. मलकापूर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक याचिकाकर्त्यासंदर्भात लांबलचक आदेश करून ठाकूर जातीचे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता. समितीचे वादग्रस्त आदेश रद्द नागपूर : उच्च न्यायालयाचे निर्णय व चालीरीती चाचणीच्या आवश्यकतेवरही आदेशात प्रकाश टाकण्यात आला होता. याविरुद्ध याचिकाकर्त्यांनी अमरावती विभागीय अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केलेले अपीलसुद्धा फेटाळण्यात आले होते. यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने त्यांची याचिका स्वीकारताना वरीलप्रमाणे निर्णय देऊन उपविभागीय अधिकारी व जात पडताळणी समितीचे वादग्रस्त आदेश रद्द केलेत. अ‍ॅड. अमित बालपांडे यांनी याचिकाकर्त्यांतर्फे बाजू मांडली....तर पडताळणी समितीची स्थापना व्यर्थउपविभागीय अधिकाऱ्यांनी जातीच्या वैधतेवर निर्णय देणे सुरू केल्यास जात पडताळणी समितीची स्थापना व समितीचे जात प्रमाणपत्राची वैधता तपासण्याचे अधिकार व्यर्थ आहेत असे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत. जात प्रमाणपत्राची वैधता तपासण्यासाठी कायद्याच्या कलम ६ अंतर्गत जात पडताळणी समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीमध्ये विविध सदस्य व तज्ज्ञांचा समावेश असतो. समितीचा व्हिजिलन्स सेल चालीरीती व इतर चौकशीचे कार्य करतो. समितीने विविध तपशील व सर्व प्रकारचे कांगोरे तपासून जात वैधता प्रमाणपत्र देणे कायद्याला अपेक्षित आहे. समितीचा निर्णय अंतिम स्वरुपाचा असतो. निर्णयाला दिवाणी न्यायालयात आव्हान देता येत नाही. कायद्याच्या कलम ४ मध्ये उपविभागीय अधिकारी हे जात प्रमाणपत्र देताना दाव्याच्या प्रामाणिकतेबाबत स्वत: समाधानी होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, उपविभागीय अधिकारी प्रामाणिकतेच्या नावाखाली जात वैधतेवरही निर्णय देत असतील तर ही कृती कायद्याच्या विरोधात होईल, असे न्यायालयाने नमूद केले आहे. (प्रतिनिधी)