शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

शाळा ऑनलाईन, फी मात्र १०० टक्के !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:06 IST

नागपूर : सध्या शिक्षणासाठी पालक आणि शाळा व्यवस्थापनात वाद होत आहे. गेल्या सत्रात शाळेने ऑनलाईन शिक्षण दिले. मात्र ...

नागपूर : सध्या शिक्षणासाठी पालक आणि शाळा व्यवस्थापनात वाद होत आहे. गेल्या सत्रात शाळेने ऑनलाईन शिक्षण दिले. मात्र शाळांनी वर्षभराच्या पूर्ण फी वसूलीसाठी पालकांना तगादा लावला. शहरातील काही नामांकित शाळांनी फी न भरल्याने विद्यार्थ्यांच्या टीसी घरी पाठविल्या. पालकांचे संघटन तयार झाले, प्रशासनाविरुद्ध मोर्चे निघाले. अखेर न्याय न मिळाल्याने हे वाद न्यायालयात गेले.

यंदाही कोरोनाच्या संसर्गामुळे शाळेतील किलबिलाट ऐकायला मिळणार नाही. जिल्ह्यातील शैक्षणिक सत्र २८ जूनपासून सुरू होत आहे. खाजगी शाळांमध्ये दरवर्षी शैक्षणिक शुल्क भरावे लागते. गेल्यावर्षी शाळा ऑनलाईन झाल्यामुळे यंदा अनेक पालकांनी फी भरलेली नाही. पण आता पुढच्या वर्गात प्रवेश घेण्याची वेळ आली आहे. शाळा गेल्या वर्षीच्या फीसाठी अडवून ठेवत आहे. बहुतांश पालकांनी ५० टक्के फी भरण्यास सकारात्मकता दर्शविली आहे. पण शाळा व्यवस्थापन तडजोड करायला तयार नाही.

- दृष्टिक्षेपात

अनुदानित शाळा - १२०२ एकूण विद्यार्थी ४,३४,४९२

विना अनुदानित शाळा - ११५५ एकूण विद्यार्थी ३,३४,९१०

- कोरोनामुळे आमच्याही रोजगारावर परिणाम झाला. गेल्यावर्षी शाळा फक्त ऑनलाईन झाल्या. अभ्यासक्रम पूर्ण झाला आणि ऑनलाईन परीक्षाही शाळांनी घेतल्या. आमचा फी भरायला नकार नाही. पण मुलगा शाळेतच गेला नाही तर १०० टक्के फी कशासाठी. पुढच्या वर्गात मुलाचा प्रवेश करायचा आहे. शाळा पूर्ण फी मागत आहे. काय करावे प्रश्नच आहे.

प्रणाली चव्हाण, पालक

- हो सध्या पालक चांगलेच संभ्रमात आहे. पण शालेय फी आणि शिक्षणाच्या एकूणच विषयासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे. पालकांनी न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास ठेवावा. शाळेची फी भरण्याची, प्रवेश घेण्याची पालकांनी घाई करू नये.

योगेश पाथरे, राष्ट्रीय संयोजक, राष्ट्रीय शिक्षक पालक संघटन

- शाळा ऑनलाईन आहे म्हणून खर्च नाही, असे नाही. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन, वीज बिल, शाळेचे मेंन्टेनन्स, शाळेची मान्यता यावरही खर्च होतच आहे. सर्वच शाळा १०० टक्के फी मागत नाही. आम्हालाही पालकांची जाणिव आहे. आम्ही तडजोड करीत आहोत. पण पालक फीच भरणार नसेल तर योग्य नाही.

कपिल उमाळे, विभागीय सचिव, मेस्टा

- काय म्हणतो शिक्षण विभाग

फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांचे शिक्षण शाळांनी थांबवू नये, या संदर्भात शिक्षण विभागाने सर्व शाळांना पत्र पाठविले आहे.