शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

गणवेशासाठी शाळकरी मुलीची आत्महत्या

By admin | Updated: July 14, 2016 02:50 IST

वर्गातील इतर मुलींजवळ नेटका गणवेश आहे, मात्र आपल्याजवळ गणवेश नसल्याची खंत सातत्याने असल्याने...

परिस्थितीने घेतला बळी : शिक्षणापेक्षा गणवेश महत्त्वाचा का? नागपूर : वर्गातील इतर मुलींजवळ नेटका गणवेश आहे, मात्र आपल्याजवळ गणवेश नसल्याची खंत सातत्याने असल्याने नागपुरातील रविनगर येथील सी.पी.अ‍ॅण्ड बेरार शाळेच्या आठव्या वर्गातील विद्यार्थिनीने मंगळवारी सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केली. रितू गजानन ढाकुलकर असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. रितूच्या आत्महत्येने समाजमन मात्र सुन्न झाले आहे. रितूच्या वडिलांचा रविनगर चौकात पानठेला आहे. आई धुणीभांडी करते. दिवसभर घरात मोठी बहीण कांचन व लहान भाऊ चेतन असतो. शाळेचा आठव्या वर्गापासून गणवेश बदलतो. त्यामुळे नवीन गणवेश घेणे गरजेचे होते. शाळेतून तिला गणवेशासाठी विचारणा झाली. चार दिवसापूर्वी रितूने वडिलांकडे मागणी केली. परिस्थिती नसल्याने वडीलही तिला दोन-चार दिवसात गणवेश घेऊन देणार होते. वडिलांनी शिक्षकांची भेट घेऊन त्यांना कारण सांगितले होते. शिक्षकांनीच तिला आम्हीच गणवेश देऊ, असे सांगितले होते. आईला तिने शाळेतूनच गणवेश मिळणार आहे, असेही सांगितले होते. -तर रितूने आत्महत्याच केली नसती रितू हट्टी होती. टीव्ही बघण्यावरून बहिणीशी तू-तू-मै-मै करायची. शाळेतून आल्यावर आईच्या मागेच रहायची. तिची आई धुणीभांडी करण्यासाठी मंगळवारी सकाळी ७ वाजता घराबाहेर पडली. दररोज दुपारी आई घरी यायची. परंतु मंगळवारी काम जास्त असल्याने ती घरी परतलीच नाही. मी दुपारी घरी आले असते, तर रितूने आत्महत्या केली नसती, पोरगी हातची गेली, आता ती कधीच बोलणार नाही, असा टाहो तिच्या आईने फोडला.