शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

नष्ट होत असलेल्या भाषा वाचवा : वक्त्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 20:36 IST

नष्ट होत असलेल्या भारतीय भाषांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने व त्या त्या भाषा बोलणाऱ्या नागरिकांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन ‘भारतीय भाषांचे भवितव्य’ विषयावरील परिसंवादात बोलणाऱ्या वक्त्यांनी केले.

ठळक मुद्देभारतीय भाषांच्या भवितव्यावर परिसंवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नष्ट होत असलेल्या भारतीय भाषांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने व त्या त्या भाषा बोलणाऱ्या नागरिकांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन ‘भारतीय भाषांचे भवितव्य’ विषयावरील परिसंवादात बोलणाऱ्या वक्त्यांनी केले. हा परिसंवाद बुधवारी धरमपेठ राजाराम वाचनालयाच्या सभागृहात पार पडला.महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी, भाषा भारती व धरमपेठ राजाराम वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी अध्यक्षस्थानी होते. परिसंवादात सुकुमार चौधरी यांनी बंगाली, डॉ. पी. शिवस्वरूप यांनी तेलुगू, डॉ. विनोद आसुदानी यांनी सिंधी, डॉ. अजहर हयात यांनी उर्दू, डॉ. मनोज पांडे यांनी हिंदी तर, नरेंद्र परिहार यांनी पंजाबी भाषेच्या भवितव्यावर विचार व्यक्त केले. त्यांनी संबंधित भाषांचा इतिहास व सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. सर्वांचा सूर भाषांचे संरक्षण करण्याकडे होता. देशातील सर्वच भाषा महत्त्वाच्या आहेत. परंतु, काळाच्या ओघात स्थलांतर, दुर्लक्ष, अन्य भाषांचा स्वीकार इत्यादी कारणांमुळे शेकडो भाषा नष्ट झाल्या आहेत. तसेच, अनेक भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आपापल्या मातृभाषेचे संरक्षण करण्यासाठी घरातूनच प्रयत्न होणे आवश्यक आहे. घरात केवळ मातृभाषेतच संवाद साधला गेला पाहिजे. याशिवाय पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत भाषा शिक्षण अनिवार्य केले गेले पाहिजे. साहित्य निर्मिती हे देखील भाषा वाचविण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्यातून पुढच्या पिढीपर्यंत भाषेचे वहन होते, असे वक्त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rajaram Library, Nagpurराजाराम वाचनालयliteratureसाहित्य