शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

नष्ट होत असलेल्या भाषा वाचवा : वक्त्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 20:36 IST

नष्ट होत असलेल्या भारतीय भाषांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने व त्या त्या भाषा बोलणाऱ्या नागरिकांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन ‘भारतीय भाषांचे भवितव्य’ विषयावरील परिसंवादात बोलणाऱ्या वक्त्यांनी केले.

ठळक मुद्देभारतीय भाषांच्या भवितव्यावर परिसंवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नष्ट होत असलेल्या भारतीय भाषांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने व त्या त्या भाषा बोलणाऱ्या नागरिकांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन ‘भारतीय भाषांचे भवितव्य’ विषयावरील परिसंवादात बोलणाऱ्या वक्त्यांनी केले. हा परिसंवाद बुधवारी धरमपेठ राजाराम वाचनालयाच्या सभागृहात पार पडला.महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी, भाषा भारती व धरमपेठ राजाराम वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी अध्यक्षस्थानी होते. परिसंवादात सुकुमार चौधरी यांनी बंगाली, डॉ. पी. शिवस्वरूप यांनी तेलुगू, डॉ. विनोद आसुदानी यांनी सिंधी, डॉ. अजहर हयात यांनी उर्दू, डॉ. मनोज पांडे यांनी हिंदी तर, नरेंद्र परिहार यांनी पंजाबी भाषेच्या भवितव्यावर विचार व्यक्त केले. त्यांनी संबंधित भाषांचा इतिहास व सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. सर्वांचा सूर भाषांचे संरक्षण करण्याकडे होता. देशातील सर्वच भाषा महत्त्वाच्या आहेत. परंतु, काळाच्या ओघात स्थलांतर, दुर्लक्ष, अन्य भाषांचा स्वीकार इत्यादी कारणांमुळे शेकडो भाषा नष्ट झाल्या आहेत. तसेच, अनेक भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आपापल्या मातृभाषेचे संरक्षण करण्यासाठी घरातूनच प्रयत्न होणे आवश्यक आहे. घरात केवळ मातृभाषेतच संवाद साधला गेला पाहिजे. याशिवाय पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत भाषा शिक्षण अनिवार्य केले गेले पाहिजे. साहित्य निर्मिती हे देखील भाषा वाचविण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्यातून पुढच्या पिढीपर्यंत भाषेचे वहन होते, असे वक्त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rajaram Library, Nagpurराजाराम वाचनालयliteratureसाहित्य