शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

नष्ट होत असलेल्या भाषा वाचवा : वक्त्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 20:36 IST

नष्ट होत असलेल्या भारतीय भाषांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने व त्या त्या भाषा बोलणाऱ्या नागरिकांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन ‘भारतीय भाषांचे भवितव्य’ विषयावरील परिसंवादात बोलणाऱ्या वक्त्यांनी केले.

ठळक मुद्देभारतीय भाषांच्या भवितव्यावर परिसंवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नष्ट होत असलेल्या भारतीय भाषांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने व त्या त्या भाषा बोलणाऱ्या नागरिकांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन ‘भारतीय भाषांचे भवितव्य’ विषयावरील परिसंवादात बोलणाऱ्या वक्त्यांनी केले. हा परिसंवाद बुधवारी धरमपेठ राजाराम वाचनालयाच्या सभागृहात पार पडला.महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी, भाषा भारती व धरमपेठ राजाराम वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी अध्यक्षस्थानी होते. परिसंवादात सुकुमार चौधरी यांनी बंगाली, डॉ. पी. शिवस्वरूप यांनी तेलुगू, डॉ. विनोद आसुदानी यांनी सिंधी, डॉ. अजहर हयात यांनी उर्दू, डॉ. मनोज पांडे यांनी हिंदी तर, नरेंद्र परिहार यांनी पंजाबी भाषेच्या भवितव्यावर विचार व्यक्त केले. त्यांनी संबंधित भाषांचा इतिहास व सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. सर्वांचा सूर भाषांचे संरक्षण करण्याकडे होता. देशातील सर्वच भाषा महत्त्वाच्या आहेत. परंतु, काळाच्या ओघात स्थलांतर, दुर्लक्ष, अन्य भाषांचा स्वीकार इत्यादी कारणांमुळे शेकडो भाषा नष्ट झाल्या आहेत. तसेच, अनेक भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आपापल्या मातृभाषेचे संरक्षण करण्यासाठी घरातूनच प्रयत्न होणे आवश्यक आहे. घरात केवळ मातृभाषेतच संवाद साधला गेला पाहिजे. याशिवाय पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत भाषा शिक्षण अनिवार्य केले गेले पाहिजे. साहित्य निर्मिती हे देखील भाषा वाचविण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्यातून पुढच्या पिढीपर्यंत भाषेचे वहन होते, असे वक्त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rajaram Library, Nagpurराजाराम वाचनालयliteratureसाहित्य