शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

जबरानजोतधारकांची जगण्याची लढाई

By admin | Updated: October 31, 2015 03:30 IST

जबरानजोतधारकांनी शासकीय जमिनींवर कोणतेही अतिक्रमण केलेले नाही. या गरीब लोकांकडील जमिनी त्यांच्या जगण्याचे साधन आहेत.

जमीन अधिकार परिषद : विजय पंड्या यांचे प्रतिपादननागपूर : जबरानजोतधारकांनी शासकीय जमिनींवर कोणतेही अतिक्रमण केलेले नाही. या गरीब लोकांकडील जमिनी त्यांच्या जगण्याचे साधन आहेत. परंतु आज सरकारकडून त्या जमिनींना धोका निर्माण झाला आहे. त्या सर्व जमिनी परत घेण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे शासनाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी सर्वांनी एकजूट होण्याची गरज आहे. हा केवळ जमिनीचा संघर्ष नसून जगण्याची लढाई असल्याचे प्रतिपादन विजय पांड्या यांनी केले. कष्टकरी जन आंदोलन समितीतर्फे शुक्रवारी जबरानजोतधारकांची जमीन अधिकार परिषद आयोजित करण्यात आली होती. धरमपेठ येथील सर्वोदय आश्रम येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अतिथी म्हणून माजी आमदार वामनराव चटप, अरुण केदार, प्रवीण मोते, रेखा पवार, कष्टकरी जन आंदोलनाचे संयोजक विलास भोंगाडे, वसंतराव वाघमारे व दिनेश म्हरसकोल्हे उपस्थित होते. या परिषदेत विदर्भातील शेकडो जबरानजोतधारकांनी भाग घेतला होता. पांड्या पुढे म्हणाले, ही लढाई फार मोठी आहे. त्यामुळे धरणे, आंदोलन व मोर्चांसह आपल्या ताब्यात असलेल्या जमिनीवर कायदेशीर हक्क कसा मिळविता येईल, याचाही विचार करावा, असे त्यांनी आवाहन केले. सरकार जबरानजोतधारकांच्याविरुद्ध असले, तरी प्रत्येक गावातील ग्रामसभा मात्र आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे आम्हाला कुणीही हटवू शकत नाही आणि उठवूही शकत नाही, असे त्यांनी सांगितले. वामनराव चटप यांनी सरकारने जबरानजोतधारकांना मालकी पट्टे देण्यासोबतच त्यांना भूस्वामी सुद्धा बनविले पाहिजे, अशी मागणी केली. जबरानजोतधारक हा जमिनीचा मालक झाल्याशिवाय त्याला कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. शिवाय कर्जही दिले जात नसल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरू वातीला विलास भोंगाडे यांनी प्रास्ताविकातून परिषदेची संक्षिप्त माहिती दिली. संचालन एकनाथ गजभिये यांनी केले. समीक्षा गणवीर यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)