शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

जबरानजोतधारकांची जगण्याची लढाई

By admin | Updated: October 31, 2015 03:30 IST

जबरानजोतधारकांनी शासकीय जमिनींवर कोणतेही अतिक्रमण केलेले नाही. या गरीब लोकांकडील जमिनी त्यांच्या जगण्याचे साधन आहेत.

जमीन अधिकार परिषद : विजय पंड्या यांचे प्रतिपादननागपूर : जबरानजोतधारकांनी शासकीय जमिनींवर कोणतेही अतिक्रमण केलेले नाही. या गरीब लोकांकडील जमिनी त्यांच्या जगण्याचे साधन आहेत. परंतु आज सरकारकडून त्या जमिनींना धोका निर्माण झाला आहे. त्या सर्व जमिनी परत घेण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे शासनाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी सर्वांनी एकजूट होण्याची गरज आहे. हा केवळ जमिनीचा संघर्ष नसून जगण्याची लढाई असल्याचे प्रतिपादन विजय पांड्या यांनी केले. कष्टकरी जन आंदोलन समितीतर्फे शुक्रवारी जबरानजोतधारकांची जमीन अधिकार परिषद आयोजित करण्यात आली होती. धरमपेठ येथील सर्वोदय आश्रम येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अतिथी म्हणून माजी आमदार वामनराव चटप, अरुण केदार, प्रवीण मोते, रेखा पवार, कष्टकरी जन आंदोलनाचे संयोजक विलास भोंगाडे, वसंतराव वाघमारे व दिनेश म्हरसकोल्हे उपस्थित होते. या परिषदेत विदर्भातील शेकडो जबरानजोतधारकांनी भाग घेतला होता. पांड्या पुढे म्हणाले, ही लढाई फार मोठी आहे. त्यामुळे धरणे, आंदोलन व मोर्चांसह आपल्या ताब्यात असलेल्या जमिनीवर कायदेशीर हक्क कसा मिळविता येईल, याचाही विचार करावा, असे त्यांनी आवाहन केले. सरकार जबरानजोतधारकांच्याविरुद्ध असले, तरी प्रत्येक गावातील ग्रामसभा मात्र आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे आम्हाला कुणीही हटवू शकत नाही आणि उठवूही शकत नाही, असे त्यांनी सांगितले. वामनराव चटप यांनी सरकारने जबरानजोतधारकांना मालकी पट्टे देण्यासोबतच त्यांना भूस्वामी सुद्धा बनविले पाहिजे, अशी मागणी केली. जबरानजोतधारक हा जमिनीचा मालक झाल्याशिवाय त्याला कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. शिवाय कर्जही दिले जात नसल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरू वातीला विलास भोंगाडे यांनी प्रास्ताविकातून परिषदेची संक्षिप्त माहिती दिली. संचालन एकनाथ गजभिये यांनी केले. समीक्षा गणवीर यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)