शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
3
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
4
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
5
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
6
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
7
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
8
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
9
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
10
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!
11
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
12
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
13
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
14
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
16
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
17
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
18
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
19
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
20
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त

ग्रामीण आरोग्य व्यवस्था सलाईनवर

By admin | Updated: November 23, 2014 00:36 IST

ग्रामीण भागातील सरकारी रु ग्णालयांमध्ये अनेक समस्या आहेत. यातच डॉक्टरांच्या ३४८ रिक्त पदांमुळे अनेक रु ग्ण आरोग्याच्या सुविधांपासून वंचित राहतात. रुग्णालयांमध्ये डॉक्टरच नसल्याने

डॉक्टरांची ३४८ पदे रिक्त : मेयो, मेडिकलमध्ये वाढली गर्दीनागपूर : ग्रामीण भागातील सरकारी रु ग्णालयांमध्ये अनेक समस्या आहेत. यातच डॉक्टरांच्या ३४८ रिक्त पदांमुळे अनेक रु ग्ण आरोग्याच्या सुविधांपासून वंचित राहतात. रुग्णालयांमध्ये डॉक्टरच नसल्याने आरोग्य व्यवस्था ‘सलाईन’वर असल्याचे चित्र आहे. परिणामी रु ग्णांना उपचारांकरिता शहराकडे धाव घ्यावी लागत असून मेयो, मेडिकल व डागा रुग्णालयांत गर्दी वाढली आहे. सार्वजनिक आरोग्य संस्थेमार्फत सहा जिल्ह्यांमध्ये आरोग्यसेवा पुरविली जाते. या जिल्ह्यांमध्ये नागपुरातील एका प्रादेशिक रुग्णालयासोबतच ५ जिल्हा रुग्णालये, २ महिला रुग्णालये, ५० खाटांचे १० उपजिल्हा रुग्णालये, १०० खाटांचे ३ उपजिल्हा रुग्णालये, ५१ ग्रामीण रुग्णालये, २५१ प्राथमिक आरोग्य केंद्रे व १६४३ उपकेंद्रे कार्यरत आहेत. विभागातील या रुग्णालयांमध्ये वर्ग १ च्या तज्ज्ञांची एकूण २४१ पदे मंजूर आहेत. परंतु, ८६ पदे भरण्यात आली असून, १५५ पदे रिक्त आहेत. वर्ग २ ची एकूण १०६३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ८७० पदे भरण्यात आली असून, १९३ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांची एकूण संख्या ६४ टक्के आहे. जेवढी पदे भरली नाहीत, त्यापेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. मागील अनेक वर्षांपासून हीच स्थिती आहे. शासनाच्या धोरणामुळे ग्रामीण भागात डॉक्टर काम करण्यास धजावत नाहीत. रिक्त पदे न भरणे हेच आरोग्याच्या सुविधा न मिळण्यास कारणीभूत आहे. मागील वर्षांमध्ये आघाडी शासनाने ग्रामीण आरोग्यासाठी अनेक घोषणा केल्या, परंतु अद्यापही काहीच झाले नाही. डॉक्टरांच्या नियुक्तीसंदर्भात यापूर्वीही शासनाला कळविण्यात आले, परंतु तिजोरी खाली असल्याचे कारण दाखवून शासनाने टाळाटाळ केली. शासनाने महिलांसाठी जननी सुरक्षा योजना सुरू केली पण डॉक्टरांच्या कमतरतेमुळे ग्रामीण रुग्णांना अजूनही नागपुरातच उपचारासाठी यावे लागत आहे. १३०४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ९५६ पदे भरण्यात आली असून, अजूनही १५५ विशेषज्ज्ञांची पदे रिक्त आहेत. (प्रतिनिधी)आरोग्य विभाग ‘रेफर’वर अवलंबूनशासनाचा सर्वात जास्त निधी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयापेक्षा (डीएमईआर) आरोग्य विभागावर खर्च होतो परंतु विदर्भाचा विचार केल्यास येथील ग्रामीण आरोग्य व्यवस्था फक्त ‘रेफर’वर अवलंबून आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची स्थिती खराब असल्याने डॉक्टर साधे औषध देऊन रुग्णांना मेडिकल, मेयो किंवा डागा रुग्णालयांमध्ये ‘रेफर’ करतात. साधारण ६० टक्के रुग्णांना शहरात ‘रेफर’ केले जात असल्याची माहिती आहे.