शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात ४० टक्के रुग्ण निघताहेत पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:08 IST

नागपूर : शहरापुरता मर्यादित असलेला कोरोना हळूहळू ग्रामीण भागात शिरला. आज या कोरोनाने ग्रामीण भागाला इतके झपाटले की ४० ...

नागपूर : शहरापुरता मर्यादित असलेला कोरोना हळूहळू ग्रामीण भागात शिरला. आज या कोरोनाने ग्रामीण भागाला इतके झपाटले की ४० टक्केवर पॉझिटिव्हचा दर गेला. ग्रामीण भागातील गावागावात आणि घराघरात आज कोरोना संक्रमित रुग्ण आहे. ग्रामीण भागात विशेष उपचाराची व्यवस्था नसल्याने घरांमध्येच मृत्यू होत आहे. ४० टक्केवर पोहचलेला पॉझिटिव्हचा दर, हा प्रशासनासाठी अलर्ट आहे. ग्रामीणची आरोग्य यंत्रणा हा भार पेलण्यास सक्षम नसल्याची खंत स्वत: जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी व्यक्त केली आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेचे कार्यक्षेत्र पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावापुरते मर्यादित आहे. नगरपरिषद व नगरपंचायत स्वतंत्र यंत्रणा आहे. परंतु यांच्याकडे आरोग्य यंत्रणा सक्षम नाही. त्यामुळे याचाही भार जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेवर आहे. प्रत्येक तालुक्यात ग्रामीण रुग्णालय आहे पण रुग्णालयाची यंत्रणाही कमकुवत आहे. आजच्या घडीला शहरापेक्षा जास्त कहर ग्रामीण भागात झाला आहे. जिल्ह्यात ७७० ग्रामपंचायती तर १८०० वर गावे आहेत. ४९ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३१६ उपकेंद्र ग्रामीण भागातील जनतेच्या दिमतीला आहे. अशातही मेडिकल स्टाफचा मोठा तुटवडा आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेचा अर्धा कणा कोरोनाने मोडला आहे. २० लाखावर लोकसंख्या असतानाही विशेष उपचाराच्या सोयी ग्रामीण भागात नाही. बहुतांश वर्ग सरकारी यंत्रणांवरच अवलंबून आहे. मोडकळीस आलेल्या आरोग्य यंत्रणेमुळे आज कोरोनाचा दर ४० टक्केवर गेला आहे.

लोकं ऐकत नाही, जनजागृती नाही. लसीकरणाबाबतचा मोठा गैरसमज आहे. वेळेवर टेस्टिंग आणि ट्रीटमेंट करीत नाही. विटॅमिनच्या गोळ्यांवर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कोरोनाशी लढत आहे. त्याचा परिणाम म्हणून पॉझिटिव्ह वाढतात आणि मृत्यूही.

- ग्रामीण भागातील गेल्या १० दिवसातील पॉझिटिव्ह

५ मे

टेस्टिंग - ६३१४ पॉझिटिव्ह - १८५३

४ मे

टेस्टिंग - ५६९६ पॉझिटिव्ह - १६७४

३ मे

टेस्टिंग - ३४५२ पॉझिटिव्ह - १८१४

२ मे

टेस्टिंग - ३३५७ पॉझिटिव्ह - २७२४

१ मे

टेस्टिंग - ५९६० पॉझिटिव्ह - २४७९

३० मार्च

टेस्टिंग - ४५०१ पॉझिटिव्ह - २८०२

२९ मार्च

टेस्टिंग - ७०८४ पॉझिटिव्ह - ३०६७

२८ मार्च

टेस्टिंग - ७२८३ पॉझिटिव्ह - २६९०

२७ मार्च

टेस्टिंग - ५७८५ पॉझिटिव्ह - २४६६

२६ मार्च

टेस्टिंग - ४२२७ पॉझिटिव्ह - २१८२

- प्रशासनाची ग्रामीण भागातील नोंदणीकृत आकडेवारी

आतापर्यंत तपासलेले नमुने - ६ लाख ८३ हजार ५०४

आतापर्यंत आलेले पॉझिटिव्ह - १ लाख २४ हजार ५०६

आतापर्यंत झालेले मृत्यू - २००१

- एकीकडे ग्रामीणमध्ये टेस्टिंग कमी होत आहे. टेस्टिंग झाल्यानंतर रुग्णाला वाऱ्यावर सोडतात. सरकारी यंत्रणेजवळ विटॅमिन गोळ्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कोणतेही मॉनिटरींग नाही. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नाही. रुग्णांना आयसोलेट करण्याची व्यवस्था नाही. लोकंही प्रकृती जास्त अत्यवस्थ झाल्यावर रुग्णालयात धाव घेतात. त्यामुळे २५ टक्के लोक गंभीर होत आहे. दर्जेदार आरोग्याची सुविधा नाही. लक्ष देणारे कोणी नाही. ग्रामीण भागातील संपूर्ण यंत्रणा रामभरोसे आहे.

डॉ. राजीव पोतदार

- लोक ऐकत नाही. भाजीपाल्यासाठी गर्दी करतात. सायंकाळी एकत्र येतात. मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे याबाबत जनजागृती नाही. टेस्टिंगसाठी गैरसमज आहे. त्यामुळे कोरोना झपाट्याने पसरतो आहे. जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन न केल्यास परिस्थिती आटोक्यात येऊच शकत नाही.

दिनेशचंद्र बंग, जि.प. सदस्य

- जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतीकडे आरोग्य यंत्रणा अपुरी आहे. तालुका रुग्णालये सक्षम नाहीत. संपूर्ण ग्रामीण भागाचा भार हा जिल्हा परिषदेवर आहे. त्यातही मनुष्यबळाचा अभाव आहे. जिल्हा परिषदेने वेळोवेळी नगरपरिषद व नगरपंचायतीला आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. पण दखल झाली नाही. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम करणार नाही, तोपर्यंत कंट्रोल करणे अवघड आहे.

शरद डोणेकर, माजी आरोग्य सभापती, जि .प.