शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

विना वाहकाची धावतेय एसटी बस

By admin | Updated: May 4, 2015 02:21 IST

प्रवासी सुविधांसोबत डिझेल आणि प्रवासात लागणाऱ्या वेळेची बचत करण्यासाठी एसटी महामंडळाने विना वाहक बस चालविण्यास सुरुवात केली आहे.

नागपूर : प्रवासी सुविधांसोबत डिझेल आणि प्रवासात लागणाऱ्या वेळेची बचत करण्यासाठी एसटी महामंडळाने विना वाहक बस चालविण्यास सुरुवात केली आहे. त्याची सुरुवात काटोल मार्गावरून करण्यात आली आहे. मार्गावर ये-जा करणाऱ्या ४८ फेऱ्यात वाहकाविना बसेस धावत आहेत. विना वाहक बस धावण्याची सुरुवात एक आठवडाभरापूर्वी करण्यात आली आहे. त्यानुसार काटोलसाठी सुटणाऱ्या गाडीत गणेशपेठ आगारातून एलआयसी चौकापर्यत वाहक उपलब्ध राहील. सर्व प्रवाशांना तिकीट दिल्यानंतर वाहक आगारात परत येतो. काटोलवरून येणाऱ्या गाडीत काही अंतरापर्यंत वाहक उपलब्ध असतो. त्यानंतर तो दुसऱ्या बसमध्ये चढून काटोलला परत जातो. नागपूरवरून काटोलचे अंतर ५९.७ किलोमीटर आहे. मार्गावर थोड्या अंतराने बसेस उपलब्ध असल्यामुळे एसटी महामंडळाने हा प्रयोग केला आहे. आगार व्यवस्थापक अनिल आमनेरकर यांनी सांगितले की, काटोलसाठी दररोज सकाळी ७ ते सायंकाळी ५.४५ पर्यंत ये-जा करण्यासाठी एकूण ४८ बसेस आहेत.पूर्वी नागपूर ते काटोल अंतर कापण्यासाठी १.४० तास लागत होते. वाहक नसल्यामुळे हे अंतर १.१५ तासात पूर्ण होत आहे. या निर्णयामुळे डिझेलची बचत होत आहे. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनुसार आगामी काही दिवसात रामटेक आणि अमरावतीसाठी विना वाहक बस चालविण्याची तयारी करण्यात येत आहे. ग्रामीण भागात एसटी थांबविण्यासाठी हात दाखविणाऱ्या प्रवाशांचे काय होणार हा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)