शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
3
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
4
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
5
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
6
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
7
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
8
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
9
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
11
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
12
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
13
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
14
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
15
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
16
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
17
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
18
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
19
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
20
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा

नागपूर विभागात आरटीईचा फज्जा

By admin | Updated: September 2, 2016 02:49 IST

गरीब व वंचित कुटुंबातील मुलांना चांगल्या शाळांमध्ये शिक्षणाची संधी मिळावी यासाठी शिक्षण हक्क कायदा २००९ (आरटीई) राबविण्यात आला.

४५ टक्के जागा रिक्त : गडचिरोलीत फक्त ९७ जागा भरल्यानागपूर : गरीब व वंचित कुटुंबातील मुलांना चांगल्या शाळांमध्ये शिक्षणाची संधी मिळावी यासाठी शिक्षण हक्क कायदा २००९ (आरटीई) राबविण्यात आला. २०१२ मध्ये कायद्याची राज्यभर अंमलबजावणी करण्यात आली. परंतु गेल्या काही वर्षात आरटीईच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहत आहे. २०१६-१७ या वर्षाकरिता राबविण्यात आलेल्या प्रक्रियेतही पाचव्या फेरीनंतरही नागपूर विभागात ४५ टक्के जागा रिक्त आहेत. मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहत असल्या तरी, आरटीईसाठी अर्जाची संख्या दरवर्षी वाढते आहे. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात आरटीईसाठी नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यात १२३९० जागा आरक्षित करण्यात आल्या. यापैकी आतापर्यंत ६९८४ जागेवर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहे. तर ५४०६ जागा अद्यापही रिक्त आहेत. नागपूर जिल्ह्याचा विचार केल्यास, जिल्ह्यात ६७०४ जागांसाठी १५ हजारावर अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते. ४८८० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. १ सप्टेंबर २०१६ पर्यंत १८२४ जागा आरटीईच्या रिक्त आहेत. अर्जाची संख्या विचारात घेता, मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहण्याला सर्वात महत्वाचे कारण म्हणजे ही प्रकि या उशिराने सुरू झाली. त्यामुळे काही पालकांनी पूर्वीच प्रवेश निश्चित केले. दुसरी बाब म्हणजे पालकांना अपेक्षित शाळेत प्रवेश न मिळाल्यामुळे अनेकांनी आरटीईचे प्रवेश नाकारले. नागपुर जिल्ह्याचे हे चित्र असले तरी, इतर जिल्ह्यात आरटीईला अपेक्षित प्रतिसादच मिळाला नाही. गडचिरोलीमध्ये शिक्षण विभागाने आरक्षित केलेल्या जागेइतकेही अर्ज प्राप्त झाले नाही. त्यामुळे फक्त ९७ जागेवरच प्रवेश झाले. (प्रतिनिधी)