शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वन विभागात रोपवन घोटाळा!

By admin | Updated: August 19, 2015 03:04 IST

वन विभागातील दक्षिण उमरेड वन परिक्षेत्रात लागवड करण्यात आलेल्या रोपवनात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचा

नागपूर : वन विभागातील दक्षिण उमरेड वन परिक्षेत्रात लागवड करण्यात आलेल्या रोपवनात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचा महाराष्ट्र वनसेवानिवृत्त (पेन्शनर्स) असोसिएशनच्यावतीने आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यासंबंधी संघटनेने मुख्य वन संरक्षक (प्रादेशिक) बी. एस. के. रेड्डी व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. पी. एन. मुंडे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. त्या तक्रारीनुसार दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्रातील चनोडा येथील १७२ हेक्टर व मसाळा, बिडमोहना व चारगाव बिटातील ५८ हेक्टर क्षेत्रात रोपवन करण्यात आले आहे. मात्र सध्या त्यापैकी ५ लाख रोपे मेली आहेत. यासंबंधी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी १ आॅगस्ट २०१५ रोजी दक्षिण उमरेड वन परिक्षेत्रातील कक्ष क्र. ३६४ येथील संरक्षित वन मौजा चनोडा मिश्र रोपवन आराजी १७२ हेक्टरमधील रोपांची पाहणी केली. दरम्यान त्यांना रोपवनाच्या नावाखाली कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आले. शिवाय पावसाळा सुरू असताना येथे केवळ १० टक्के रोपे जिवंत आढळून आली. तसेच रोपे लावण्यासाठी किमान १ फूट खोलीचे खड्डे आवश्यक असताना केवळ ३ ते ४ इंच खोलीचे खड्डयात झाडे लावण्यात आल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे, तर खड्डे खोदण्यासाठी प्रति खड्डा ९.५० पैसे दर असताना मजुरांना केवळ ४.२५ पैसे दराने मोबदला देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. शिवाय टीसीएम मजुरांकडून खोदायचे असताना जेसीबीच्या मदतीने ते खोदण्यात आले. रोपवनासाठी स्वत: नर्सरी तयार न करता, नागपूर, भंडारा, अमरावती व हिंगणघाट येथून रोपे आयात करण्यात आली. यानंतर अर्धमेलेली रोपे लावण्यात आले, असे सांगण्यात आले आहे. संघटनेने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. परंतु वरिष्ठांनी अजूनपर्यंत कोणतीही चौकशी सुरू केलेली नाही. असेही संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत चिमोटे म्हणाले. (प्रतिनिधी)