शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ओबीसीचे राजकीय भवितव्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्यास रास्ता रोको आणि निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 16:27 IST

ओबीसींचे राजकीय भवितव्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याविरोधात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात रस्ता रोको आणि निदर्शने करण्यात येतील, असा इशारा नागपुरात सोमवारी झालेल्या ओबीसी जनमोर्चाच्या बैठकीत देण्यात आला.

ठळक मुद्देओबीसी जनमोर्चाच्या बैठकीत इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ओबीसींच्या आरक्षित जागा जागा खुल्या प्रवर्गातून भरणे हा ओबीसींवर घोर अन्याय आहे. ओबीसींचे राजकीय भवितव्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याविरोधात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात रस्ता रोको आणि निदर्शने करण्यात येतील, असा इशारा नागपुरात सोमवारी झालेल्या ओबीसी जनमोर्चाच्या बैठकीत देण्यात आला.

सक्करदरा येथील सेवादल महिला महाविद्यालयाच्या सभागृहात ओबीसी जन मोर्चाचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी आरक्षण बचाव परिषद झाली. यावेळी आ. ऍड. अभिजित वंजारी, ओबीसी जनमोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर गोरे, माजी पोलिस उपायुक्त ऍड. धनराज वंजारी, ओबीसी जनमोर्चाचे उपाध्यक्ष जे.डी. तांडेल, विलास काळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

या आरक्षण बचाव परिषदेमध्ये 13 ठराव पारित करण्यात आले. ओबीसींचे आरक्षण हा हक्क आहे, तो कुणीही अडवू शकत नाही. त्यासाठी सर्वांनी एकसंघ व्हावे आणि सर्व मातृसंघटनांनी एकत्रित येऊन लढा पुकारावा, असे आवाहन या बचाव परिषदेत वक्त्यांनी केले.

टॅग्स :Politicsराजकारण