शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलधारकांना रस्ता ना पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:06 IST

मौजा नारी येथील ५०० घरकुलधारक त्रस्त : तीन वर्षांपासून महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेद्वारे ...

मौजा नारी येथील ५०० घरकुलधारक त्रस्त : तीन वर्षांपासून महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेद्वारे घरकुल योजनेअंतर्गत मौजा नारी येथे चार वर्षांपूर्वी निवासी संकुल उभारण्यात आले. उत्तर नागपुरातील रेल्वेलाईन येथील झोपडपट्टीधारकांचे येथे पुनर्वसन करण्यात आले; परंतु ये-जा करण्यासाठी पक्का रस्ता नाही. पिण्याचे पाणी, गटार लाईन, पथदिवे अशा सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत; यामुळे येथील हजारांहून अधिक रहिवाशांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे.

घरकुल योजनेसाठी २४ मीटर आणि १८ मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी एक कोटीचा निधी मंजूर आहे; परंतु महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटलेली नाही. महापालिकेतील पदाधिकारी पाहणी करतात, आश्वासन देतात; परंतु पुढे काहीच होत नाही, अशी व्यथा येथील नागरिकांनी मांडली.

या संकुलामध्ये मल्टिपर्पज हॉल, शाळा, आरोग्य केंद्र, ११ दुकाने, खेळांचे मैदान, बगीचा, आदी सुविधा उपलब्ध करण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले. परंतु या सुविधा तर दूरच; अजूनही सिव्हरेज लाईन टाकलेली नाही. पथदिवे नसल्याने रात्रीच्या सुमारास सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असते. यामुळे महिला व मुलांना रात्री घराबाहेर पडता येत नाही.

घरकुल योजनेअंतर्गत मौजा नारी येथे ५४४ सदनिका उभारण्यात आलेल्या आहे. यांतील ४१४ सदनिकांत झोपडपट्टीधारक वास्तव्यास आहेत. यात प्रामुख्याने मजूर आहेत. कामासाठी त्यांना जावे लागते. पक्का रस्ता नसल्याने पावसाळ्यात चिखलातून ये-जा करावी लागते.

.....

नगरसेवकांनी दिले आयुक्तांना पत्र

‘एसआरए’अंतर्गत उभारण्यात आलेल्या घरकुलधारकांना रस्ता, पाणी, गटार लाईन, पथदिवे, आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात, अशी मागणी नगरसेवक मनोज सांगोळे यांनी महापालिकेच्या आयुक्तांना दिलेल्या पत्रातून केली आहे. आजवर पालकमंत्री, महापालिका अधिकारी, नासुप्र अधिकारी यांना आठ ते दहा वेळा निवेदन दिले; परंतु नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत.

.....

रस्त्याच्या प्रस्तावित जागेवर भूखंड

घरकुल योजनेचा प्रस्तावित रस्ता हा काही खासगी शेतातून जातो. जमीनमालकांनी या जागेवर लेआऊट टाकून भूखंड विकले. यामुळे या रस्त्याला विरोध होत आहे. प्रकल्प राबवितानाच रस्त्याचे काम करणे गरजेचे होते; परंतु घरकुल योजना उभारल्यानंतर प्रशासनाला याची जाग आली. यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

....

विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

घरकुल योजनेसाठी चांगला रस्ता नसल्याने पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यावर चिखल होत असल्याने विद्यार्थ्यांना ये-जा करता येत नाही. अन्य सुविधांचाही अभाव असल्याने येथील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आहे. महापालिका प्रशासनाने विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे.