शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

घरकुलधारकांना रस्ता ना पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:06 IST

मौजा नारी येथील ५०० घरकुलधारक त्रस्त : तीन वर्षांपासून महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेद्वारे ...

मौजा नारी येथील ५०० घरकुलधारक त्रस्त : तीन वर्षांपासून महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेद्वारे घरकुल योजनेअंतर्गत मौजा नारी येथे चार वर्षांपूर्वी निवासी संकुल उभारण्यात आले. उत्तर नागपुरातील रेल्वेलाईन येथील झोपडपट्टीधारकांचे येथे पुनर्वसन करण्यात आले; परंतु ये-जा करण्यासाठी पक्का रस्ता नाही. पिण्याचे पाणी, गटार लाईन, पथदिवे अशा सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत; यामुळे येथील हजारांहून अधिक रहिवाशांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे.

घरकुल योजनेसाठी २४ मीटर आणि १८ मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी एक कोटीचा निधी मंजूर आहे; परंतु महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटलेली नाही. महापालिकेतील पदाधिकारी पाहणी करतात, आश्वासन देतात; परंतु पुढे काहीच होत नाही, अशी व्यथा येथील नागरिकांनी मांडली.

या संकुलामध्ये मल्टिपर्पज हॉल, शाळा, आरोग्य केंद्र, ११ दुकाने, खेळांचे मैदान, बगीचा, आदी सुविधा उपलब्ध करण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले. परंतु या सुविधा तर दूरच; अजूनही सिव्हरेज लाईन टाकलेली नाही. पथदिवे नसल्याने रात्रीच्या सुमारास सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असते. यामुळे महिला व मुलांना रात्री घराबाहेर पडता येत नाही.

घरकुल योजनेअंतर्गत मौजा नारी येथे ५४४ सदनिका उभारण्यात आलेल्या आहे. यांतील ४१४ सदनिकांत झोपडपट्टीधारक वास्तव्यास आहेत. यात प्रामुख्याने मजूर आहेत. कामासाठी त्यांना जावे लागते. पक्का रस्ता नसल्याने पावसाळ्यात चिखलातून ये-जा करावी लागते.

.....

नगरसेवकांनी दिले आयुक्तांना पत्र

‘एसआरए’अंतर्गत उभारण्यात आलेल्या घरकुलधारकांना रस्ता, पाणी, गटार लाईन, पथदिवे, आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात, अशी मागणी नगरसेवक मनोज सांगोळे यांनी महापालिकेच्या आयुक्तांना दिलेल्या पत्रातून केली आहे. आजवर पालकमंत्री, महापालिका अधिकारी, नासुप्र अधिकारी यांना आठ ते दहा वेळा निवेदन दिले; परंतु नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत.

.....

रस्त्याच्या प्रस्तावित जागेवर भूखंड

घरकुल योजनेचा प्रस्तावित रस्ता हा काही खासगी शेतातून जातो. जमीनमालकांनी या जागेवर लेआऊट टाकून भूखंड विकले. यामुळे या रस्त्याला विरोध होत आहे. प्रकल्प राबवितानाच रस्त्याचे काम करणे गरजेचे होते; परंतु घरकुल योजना उभारल्यानंतर प्रशासनाला याची जाग आली. यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

....

विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

घरकुल योजनेसाठी चांगला रस्ता नसल्याने पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यावर चिखल होत असल्याने विद्यार्थ्यांना ये-जा करता येत नाही. अन्य सुविधांचाही अभाव असल्याने येथील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आहे. महापालिका प्रशासनाने विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे.