शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक पद्धतीने नद्या स्वच्छ हाेणार नाहीत ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:09 IST

श्रेयस हाेले नागपूर : नागनदी, पिवळी नदी आणि पाेहरा नदी या नागपूर जिल्ह्यातील प्रमुख तीन नद्यांची प्रदूषणाची स्थिती इतकी ...

श्रेयस हाेले

नागपूर : नागनदी, पिवळी नदी आणि पाेहरा नदी या नागपूर जिल्ह्यातील प्रमुख तीन नद्यांची प्रदूषणाची स्थिती इतकी दयनीय आहे की त्या नागरिकांनी पिण्याचे पाणीही देऊ शकत नाही. गेल्या काही वर्षात नागनदी पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न केले जात आहेत पण त्यात हवे तसे यश मिळाले नाही. पिवळी व पाेहरा नदीसाठी अशाप्रकारचे फारसे प्रयत्न झाले नाही. मात्र पारंपरिक पद्धतीने नद्या स्वच्छ हाेणार नाहीत, त्यासाठी अधिक वैज्ञानिक दृष्टिकाेन ठेवून काम करावे लागेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

इकाेसिटी फाऊंडेशनचे संचालक पर्यावरण अभ्यासक प्रद्युम्न सहस्रभाेजनी यांनी लाेकमतशी बाेलताना यावर सविस्तर प्रकाश टाकला. नागपूरच्या नद्या कधीपासून, कशा आणि का प्रदूषित झाल्या, ही बाब समजावी लागेल. कारण प्रदूषण हे त्यांच्यापुरते मर्यादित राहत नाही तर प्रवाहाबराेबर ते पाण्याच्या दुसऱ्या स्रोतात जाऊन मिसळते. त्यामुळे हा मुद्दा अतिशय गंभीर आहे. शहरातून वाहणाऱ्या नागनदीमुळे या भागातील कन्हान आणि पुढे वैनगंगासारखी माेठी नदीही प्रदूषित हाेत आहे. यावर गंभीरतेने लक्ष दिले नाही तर पुढे वेणा आणि वर्धा नदीही प्रदूषणाच्या विळख्यात सापडेल कारण शहर चारही बाजूने झपाट्याने वाढत आहे. सहस्रभाेजनी यांच्या मते, नागनदीला पारंपरिक पद्धतीने पुनरुज्जीवित करणे शक्य नाही. यापूर्वीही शुद्धीकरणाचे बरेच प्रयत्न झाले पण परिणाम काही झाले नाही. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकाेनातून यावर उपाय शाेधून त्याचा अवलंब करणे गरजेचे आहे. वरवर शुद्धीकरणाचे प्रयत्न केल्याने नदी शुद्ध हाेणार नाही. त्याऐवजी घरातून निघणारे सिवेज त्याच्या स्रोतांमधून शुद्ध केले तर नदी आपाेआप शुद्ध हाेईल.

ही गाेष्ट तीन टप्प्यात करता येईल. प्राथमिक टप्प्यात सांडपाण्याचे आपल्या घराच्या स्तरावर शुद्धीकरण हाेणे गरजेचे आहे. दुसऱ्या टप्प्यात वस्तीनुसार ॲनएराेबिक फिल्टर लावावे लागेल. तिसऱ्या टप्प्यात नद्यांच्या किनाऱ्यावर ग्रीन बेड तयार करावे लागेल. तंत्राला ‘डिसेंट्रलाइज वेस्टवाॅटर ट्रीटमेंट सिस्टिम’ (डिवॅट्स) असे संबाेधले आहे. सांडपाणी शुद्धीकरणाने या प्रक्रियेतील गुंतागुंत दूर करता येइल आणि पाण्यातील पीएच स्तरही नियंत्रणात ठेवता येइल. सांडपाण्याचे रिसायकल आणि रियुज करण्याला प्राथमिकता देण्याची गरज आहे. त्यामुळे नैसर्गिक स्रोतांवरील भार कमी हाेइल. नद्या स्वच्छ झाल्या तर भविष्यात शहर आपाेआप सुंदर हाेईल, असा विश्वास सहस्रभाेजनी यांनी व्यक्त केला.