शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक पद्धतीने नद्या स्वच्छ हाेणार नाहीत ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:09 IST

श्रेयस हाेले नागपूर : नागनदी, पिवळी नदी आणि पाेहरा नदी या नागपूर जिल्ह्यातील प्रमुख तीन नद्यांची प्रदूषणाची स्थिती इतकी ...

श्रेयस हाेले

नागपूर : नागनदी, पिवळी नदी आणि पाेहरा नदी या नागपूर जिल्ह्यातील प्रमुख तीन नद्यांची प्रदूषणाची स्थिती इतकी दयनीय आहे की त्या नागरिकांनी पिण्याचे पाणीही देऊ शकत नाही. गेल्या काही वर्षात नागनदी पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न केले जात आहेत पण त्यात हवे तसे यश मिळाले नाही. पिवळी व पाेहरा नदीसाठी अशाप्रकारचे फारसे प्रयत्न झाले नाही. मात्र पारंपरिक पद्धतीने नद्या स्वच्छ हाेणार नाहीत, त्यासाठी अधिक वैज्ञानिक दृष्टिकाेन ठेवून काम करावे लागेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

इकाेसिटी फाऊंडेशनचे संचालक पर्यावरण अभ्यासक प्रद्युम्न सहस्रभाेजनी यांनी लाेकमतशी बाेलताना यावर सविस्तर प्रकाश टाकला. नागपूरच्या नद्या कधीपासून, कशा आणि का प्रदूषित झाल्या, ही बाब समजावी लागेल. कारण प्रदूषण हे त्यांच्यापुरते मर्यादित राहत नाही तर प्रवाहाबराेबर ते पाण्याच्या दुसऱ्या स्रोतात जाऊन मिसळते. त्यामुळे हा मुद्दा अतिशय गंभीर आहे. शहरातून वाहणाऱ्या नागनदीमुळे या भागातील कन्हान आणि पुढे वैनगंगासारखी माेठी नदीही प्रदूषित हाेत आहे. यावर गंभीरतेने लक्ष दिले नाही तर पुढे वेणा आणि वर्धा नदीही प्रदूषणाच्या विळख्यात सापडेल कारण शहर चारही बाजूने झपाट्याने वाढत आहे. सहस्रभाेजनी यांच्या मते, नागनदीला पारंपरिक पद्धतीने पुनरुज्जीवित करणे शक्य नाही. यापूर्वीही शुद्धीकरणाचे बरेच प्रयत्न झाले पण परिणाम काही झाले नाही. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकाेनातून यावर उपाय शाेधून त्याचा अवलंब करणे गरजेचे आहे. वरवर शुद्धीकरणाचे प्रयत्न केल्याने नदी शुद्ध हाेणार नाही. त्याऐवजी घरातून निघणारे सिवेज त्याच्या स्रोतांमधून शुद्ध केले तर नदी आपाेआप शुद्ध हाेईल.

ही गाेष्ट तीन टप्प्यात करता येईल. प्राथमिक टप्प्यात सांडपाण्याचे आपल्या घराच्या स्तरावर शुद्धीकरण हाेणे गरजेचे आहे. दुसऱ्या टप्प्यात वस्तीनुसार ॲनएराेबिक फिल्टर लावावे लागेल. तिसऱ्या टप्प्यात नद्यांच्या किनाऱ्यावर ग्रीन बेड तयार करावे लागेल. तंत्राला ‘डिसेंट्रलाइज वेस्टवाॅटर ट्रीटमेंट सिस्टिम’ (डिवॅट्स) असे संबाेधले आहे. सांडपाणी शुद्धीकरणाने या प्रक्रियेतील गुंतागुंत दूर करता येइल आणि पाण्यातील पीएच स्तरही नियंत्रणात ठेवता येइल. सांडपाण्याचे रिसायकल आणि रियुज करण्याला प्राथमिकता देण्याची गरज आहे. त्यामुळे नैसर्गिक स्रोतांवरील भार कमी हाेइल. नद्या स्वच्छ झाल्या तर भविष्यात शहर आपाेआप सुंदर हाेईल, असा विश्वास सहस्रभाेजनी यांनी व्यक्त केला.