शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
4
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
5
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
6
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
7
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
8
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
9
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
10
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
11
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
12
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
13
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
14
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
15
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
16
Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?
17
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
18
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
19
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
20
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

पारंपरिक पद्धतीने नद्या स्वच्छ हाेणार नाहीत ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:09 IST

श्रेयस हाेले नागपूर : नागनदी, पिवळी नदी आणि पाेहरा नदी या नागपूर जिल्ह्यातील प्रमुख तीन नद्यांची प्रदूषणाची स्थिती इतकी ...

श्रेयस हाेले

नागपूर : नागनदी, पिवळी नदी आणि पाेहरा नदी या नागपूर जिल्ह्यातील प्रमुख तीन नद्यांची प्रदूषणाची स्थिती इतकी दयनीय आहे की त्या नागरिकांनी पिण्याचे पाणीही देऊ शकत नाही. गेल्या काही वर्षात नागनदी पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न केले जात आहेत पण त्यात हवे तसे यश मिळाले नाही. पिवळी व पाेहरा नदीसाठी अशाप्रकारचे फारसे प्रयत्न झाले नाही. मात्र पारंपरिक पद्धतीने नद्या स्वच्छ हाेणार नाहीत, त्यासाठी अधिक वैज्ञानिक दृष्टिकाेन ठेवून काम करावे लागेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

इकाेसिटी फाऊंडेशनचे संचालक पर्यावरण अभ्यासक प्रद्युम्न सहस्रभाेजनी यांनी लाेकमतशी बाेलताना यावर सविस्तर प्रकाश टाकला. नागपूरच्या नद्या कधीपासून, कशा आणि का प्रदूषित झाल्या, ही बाब समजावी लागेल. कारण प्रदूषण हे त्यांच्यापुरते मर्यादित राहत नाही तर प्रवाहाबराेबर ते पाण्याच्या दुसऱ्या स्रोतात जाऊन मिसळते. त्यामुळे हा मुद्दा अतिशय गंभीर आहे. शहरातून वाहणाऱ्या नागनदीमुळे या भागातील कन्हान आणि पुढे वैनगंगासारखी माेठी नदीही प्रदूषित हाेत आहे. यावर गंभीरतेने लक्ष दिले नाही तर पुढे वेणा आणि वर्धा नदीही प्रदूषणाच्या विळख्यात सापडेल कारण शहर चारही बाजूने झपाट्याने वाढत आहे. सहस्रभाेजनी यांच्या मते, नागनदीला पारंपरिक पद्धतीने पुनरुज्जीवित करणे शक्य नाही. यापूर्वीही शुद्धीकरणाचे बरेच प्रयत्न झाले पण परिणाम काही झाले नाही. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकाेनातून यावर उपाय शाेधून त्याचा अवलंब करणे गरजेचे आहे. वरवर शुद्धीकरणाचे प्रयत्न केल्याने नदी शुद्ध हाेणार नाही. त्याऐवजी घरातून निघणारे सिवेज त्याच्या स्रोतांमधून शुद्ध केले तर नदी आपाेआप शुद्ध हाेईल.

ही गाेष्ट तीन टप्प्यात करता येईल. प्राथमिक टप्प्यात सांडपाण्याचे आपल्या घराच्या स्तरावर शुद्धीकरण हाेणे गरजेचे आहे. दुसऱ्या टप्प्यात वस्तीनुसार ॲनएराेबिक फिल्टर लावावे लागेल. तिसऱ्या टप्प्यात नद्यांच्या किनाऱ्यावर ग्रीन बेड तयार करावे लागेल. तंत्राला ‘डिसेंट्रलाइज वेस्टवाॅटर ट्रीटमेंट सिस्टिम’ (डिवॅट्स) असे संबाेधले आहे. सांडपाणी शुद्धीकरणाने या प्रक्रियेतील गुंतागुंत दूर करता येइल आणि पाण्यातील पीएच स्तरही नियंत्रणात ठेवता येइल. सांडपाण्याचे रिसायकल आणि रियुज करण्याला प्राथमिकता देण्याची गरज आहे. त्यामुळे नैसर्गिक स्रोतांवरील भार कमी हाेइल. नद्या स्वच्छ झाल्या तर भविष्यात शहर आपाेआप सुंदर हाेईल, असा विश्वास सहस्रभाेजनी यांनी व्यक्त केला.