शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी निविष्ठांच्या किमती वाढल्याने नियाेजन गडबडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:07 IST

राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : राेहिणी नक्षत्र सुरू झाले असून, पावसाचे आगमन झाले नसले तरी शेतकऱ्यांनी बियाणे ...

राहुल पेटकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : राेहिणी नक्षत्र सुरू झाले असून, पावसाचे आगमन झाले नसले तरी शेतकऱ्यांनी बियाणे व रासायनिक खते खरेदीसाठी धापपळ सुरू केली आहे. तत्पूर्वी, त्यांनी शेतीची खरीपपूर्व मशागतीची सर्व कामे पूर्ण केली आहेत. यावर्षी बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठांच्या किमतीत वाढ झाल्याने आर्थिक नियाेजन गडबडले आहे, अशी प्रतिक्रिया रामटेक तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

शेतीची खरीप हंगामपूर्व कामे पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा आहे. कृषी विभागाने चालू खरीप हंगामात रामटेक तालुक्यात २०,८०२ हेक्टरमध्ये धान, ३,५०० हेक्टरमध्ये कपाशी व २,१०० हेक्टरमध्ये तुरीच्या पिकाचे नियाेजन केले आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकरी धानाची राेवणी करीत असल्याने त्यांनी बांध्या साफ करून पऱ्हे टाकण्याचीही व्यवस्था केली आहे. सध्या पऱ्हे टाकण्याची याेग्य वेळ आहे. मात्र, दरवर्षी हवामान खात्याचा पावसाबाबतचा अंदाज चुकत असल्याने तसेच माेसमी वाऱ्याच्या पावसाचे आगमन न झाल्याने आपण पऱ्हे टाकण्याची हिंमत केली नाही, असेही धान उत्पादकांनी सांगितले.

सिंचनाच्या प्रभावी सुविधेचा अभाव व किडींमुळे हाेणारे धानाचे नुकसान लक्षात घेता, रामटेक तालुक्यात कपाशीचा पेरा वाढत असल्याचे तसेच तालुक्यात कापसाचे चांगले उत्पादन हाेत असल्याचेही मागील काही वर्षांपासून निदर्शनास आले आहे. यावर्षी केंद्र शासनाने कपाशीच्या बियाण्याच्या किमतीत वाढ केली आहे. साेबतच शासनाने अतिरिक्त सबसिडी जाहीर करून रासायनिक खतांच्या किमती नियंत्रित केल्या आहेत. मात्र, केवळ डीएपी १,२०० रुपये प्रति बॅग मिळत असून, इतर संयुक्त व मिश्र खतांच्या किमतीत साधारणत: ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

...

पीक कर्ज व बाेनसचा तिढा

पीक कर्जाचा नियमित भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांनी नवीन पीक कर्जासाठी बँकांकडे अर्ज केले असले तरी, मंजुरी प्रक्रिया संथ असल्याने पीक कर्जाची रक्कम मिळण्यास विलंब हाेणार आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील धान राज्य शासनाला किमान आधारभूत किमतीप्रमाणे विकला आहे. त्या धानाचा प्रति क्विंटल ७०० रुपये बाेनसही अनेकांच्या बँक खात्यात अद्याप जमा करण्यात आला नाही. काहींना धानाचे चुकारेही मिळाले नाही. प्राेत्सााहन निधीचे प्रत्येकी ५० हजार रुपयेही मिळाले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याबाबत बँका, प्रशासन व शासन काेणताही सकारात्मक निर्णय घ्यायला तयार नाही.

...

बियाण्यांच्या उगवणशक्तीवर प्रश्नचिन्ह

पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवणशक्ती तपासून घ्या, घरगुती बियाण्यांचा पेरणीसाठी वापर करा, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी माती परीक्षण करून रासायनिक खतांचे याेग्य नियाेजन करा, रासायनिक खतांना पर्याय म्हणून जैविक खतांचा वापर करा, पुरेसा पाऊस काेसळल्याशिवाय पेरणी अथवा राेवणी करू नका, यासाठी कृषी विभाग जनजागृती करीत आहे. दुसरीकडे, किडी, राेग व प्रतिकूल वातावरणामुळे घरगुती बियाण्यांच्या उगवणशक्ती व उत्पादनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कृषी निविष्ठांच्या वाढलेल्या किमती व प्रशासनाची उदासीनता यामुळे शेतकरी आर्थिक काेंडीत सापडले आहेत.