शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

कृषी निविष्ठांच्या किमती वाढल्याने नियाेजन गडबडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:07 IST

राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : राेहिणी नक्षत्र सुरू झाले असून, पावसाचे आगमन झाले नसले तरी शेतकऱ्यांनी बियाणे ...

राहुल पेटकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : राेहिणी नक्षत्र सुरू झाले असून, पावसाचे आगमन झाले नसले तरी शेतकऱ्यांनी बियाणे व रासायनिक खते खरेदीसाठी धापपळ सुरू केली आहे. तत्पूर्वी, त्यांनी शेतीची खरीपपूर्व मशागतीची सर्व कामे पूर्ण केली आहेत. यावर्षी बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठांच्या किमतीत वाढ झाल्याने आर्थिक नियाेजन गडबडले आहे, अशी प्रतिक्रिया रामटेक तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

शेतीची खरीप हंगामपूर्व कामे पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा आहे. कृषी विभागाने चालू खरीप हंगामात रामटेक तालुक्यात २०,८०२ हेक्टरमध्ये धान, ३,५०० हेक्टरमध्ये कपाशी व २,१०० हेक्टरमध्ये तुरीच्या पिकाचे नियाेजन केले आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकरी धानाची राेवणी करीत असल्याने त्यांनी बांध्या साफ करून पऱ्हे टाकण्याचीही व्यवस्था केली आहे. सध्या पऱ्हे टाकण्याची याेग्य वेळ आहे. मात्र, दरवर्षी हवामान खात्याचा पावसाबाबतचा अंदाज चुकत असल्याने तसेच माेसमी वाऱ्याच्या पावसाचे आगमन न झाल्याने आपण पऱ्हे टाकण्याची हिंमत केली नाही, असेही धान उत्पादकांनी सांगितले.

सिंचनाच्या प्रभावी सुविधेचा अभाव व किडींमुळे हाेणारे धानाचे नुकसान लक्षात घेता, रामटेक तालुक्यात कपाशीचा पेरा वाढत असल्याचे तसेच तालुक्यात कापसाचे चांगले उत्पादन हाेत असल्याचेही मागील काही वर्षांपासून निदर्शनास आले आहे. यावर्षी केंद्र शासनाने कपाशीच्या बियाण्याच्या किमतीत वाढ केली आहे. साेबतच शासनाने अतिरिक्त सबसिडी जाहीर करून रासायनिक खतांच्या किमती नियंत्रित केल्या आहेत. मात्र, केवळ डीएपी १,२०० रुपये प्रति बॅग मिळत असून, इतर संयुक्त व मिश्र खतांच्या किमतीत साधारणत: ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

...

पीक कर्ज व बाेनसचा तिढा

पीक कर्जाचा नियमित भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांनी नवीन पीक कर्जासाठी बँकांकडे अर्ज केले असले तरी, मंजुरी प्रक्रिया संथ असल्याने पीक कर्जाची रक्कम मिळण्यास विलंब हाेणार आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील धान राज्य शासनाला किमान आधारभूत किमतीप्रमाणे विकला आहे. त्या धानाचा प्रति क्विंटल ७०० रुपये बाेनसही अनेकांच्या बँक खात्यात अद्याप जमा करण्यात आला नाही. काहींना धानाचे चुकारेही मिळाले नाही. प्राेत्सााहन निधीचे प्रत्येकी ५० हजार रुपयेही मिळाले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याबाबत बँका, प्रशासन व शासन काेणताही सकारात्मक निर्णय घ्यायला तयार नाही.

...

बियाण्यांच्या उगवणशक्तीवर प्रश्नचिन्ह

पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवणशक्ती तपासून घ्या, घरगुती बियाण्यांचा पेरणीसाठी वापर करा, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी माती परीक्षण करून रासायनिक खतांचे याेग्य नियाेजन करा, रासायनिक खतांना पर्याय म्हणून जैविक खतांचा वापर करा, पुरेसा पाऊस काेसळल्याशिवाय पेरणी अथवा राेवणी करू नका, यासाठी कृषी विभाग जनजागृती करीत आहे. दुसरीकडे, किडी, राेग व प्रतिकूल वातावरणामुळे घरगुती बियाण्यांच्या उगवणशक्ती व उत्पादनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कृषी निविष्ठांच्या वाढलेल्या किमती व प्रशासनाची उदासीनता यामुळे शेतकरी आर्थिक काेंडीत सापडले आहेत.