शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

कृषी निविष्ठांच्या किमती वाढल्याने नियाेजन गडबडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:07 IST

राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : राेहिणी नक्षत्र सुरू झाले असून, पावसाचे आगमन झाले नसले तरी शेतकऱ्यांनी बियाणे ...

राहुल पेटकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : राेहिणी नक्षत्र सुरू झाले असून, पावसाचे आगमन झाले नसले तरी शेतकऱ्यांनी बियाणे व रासायनिक खते खरेदीसाठी धापपळ सुरू केली आहे. तत्पूर्वी, त्यांनी शेतीची खरीपपूर्व मशागतीची सर्व कामे पूर्ण केली आहेत. यावर्षी बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठांच्या किमतीत वाढ झाल्याने आर्थिक नियाेजन गडबडले आहे, अशी प्रतिक्रिया रामटेक तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

शेतीची खरीप हंगामपूर्व कामे पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा आहे. कृषी विभागाने चालू खरीप हंगामात रामटेक तालुक्यात २०,८०२ हेक्टरमध्ये धान, ३,५०० हेक्टरमध्ये कपाशी व २,१०० हेक्टरमध्ये तुरीच्या पिकाचे नियाेजन केले आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकरी धानाची राेवणी करीत असल्याने त्यांनी बांध्या साफ करून पऱ्हे टाकण्याचीही व्यवस्था केली आहे. सध्या पऱ्हे टाकण्याची याेग्य वेळ आहे. मात्र, दरवर्षी हवामान खात्याचा पावसाबाबतचा अंदाज चुकत असल्याने तसेच माेसमी वाऱ्याच्या पावसाचे आगमन न झाल्याने आपण पऱ्हे टाकण्याची हिंमत केली नाही, असेही धान उत्पादकांनी सांगितले.

सिंचनाच्या प्रभावी सुविधेचा अभाव व किडींमुळे हाेणारे धानाचे नुकसान लक्षात घेता, रामटेक तालुक्यात कपाशीचा पेरा वाढत असल्याचे तसेच तालुक्यात कापसाचे चांगले उत्पादन हाेत असल्याचेही मागील काही वर्षांपासून निदर्शनास आले आहे. यावर्षी केंद्र शासनाने कपाशीच्या बियाण्याच्या किमतीत वाढ केली आहे. साेबतच शासनाने अतिरिक्त सबसिडी जाहीर करून रासायनिक खतांच्या किमती नियंत्रित केल्या आहेत. मात्र, केवळ डीएपी १,२०० रुपये प्रति बॅग मिळत असून, इतर संयुक्त व मिश्र खतांच्या किमतीत साधारणत: ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

...

पीक कर्ज व बाेनसचा तिढा

पीक कर्जाचा नियमित भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांनी नवीन पीक कर्जासाठी बँकांकडे अर्ज केले असले तरी, मंजुरी प्रक्रिया संथ असल्याने पीक कर्जाची रक्कम मिळण्यास विलंब हाेणार आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील धान राज्य शासनाला किमान आधारभूत किमतीप्रमाणे विकला आहे. त्या धानाचा प्रति क्विंटल ७०० रुपये बाेनसही अनेकांच्या बँक खात्यात अद्याप जमा करण्यात आला नाही. काहींना धानाचे चुकारेही मिळाले नाही. प्राेत्सााहन निधीचे प्रत्येकी ५० हजार रुपयेही मिळाले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याबाबत बँका, प्रशासन व शासन काेणताही सकारात्मक निर्णय घ्यायला तयार नाही.

...

बियाण्यांच्या उगवणशक्तीवर प्रश्नचिन्ह

पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवणशक्ती तपासून घ्या, घरगुती बियाण्यांचा पेरणीसाठी वापर करा, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी माती परीक्षण करून रासायनिक खतांचे याेग्य नियाेजन करा, रासायनिक खतांना पर्याय म्हणून जैविक खतांचा वापर करा, पुरेसा पाऊस काेसळल्याशिवाय पेरणी अथवा राेवणी करू नका, यासाठी कृषी विभाग जनजागृती करीत आहे. दुसरीकडे, किडी, राेग व प्रतिकूल वातावरणामुळे घरगुती बियाण्यांच्या उगवणशक्ती व उत्पादनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कृषी निविष्ठांच्या वाढलेल्या किमती व प्रशासनाची उदासीनता यामुळे शेतकरी आर्थिक काेंडीत सापडले आहेत.