शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

तोकड्या मनुष्यबळावर गुन्हेगारांच्या वस्तीची जबाबदारी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:07 IST

नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - गुन्हेगारांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमधील अंतर्गत वाद धुमसत ...

नरेश डोंगरे ।

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - गुन्हेगारांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमधील अंतर्गत वाद धुमसत आहे. जीव धोक्यात घालून कारागृहाचे अधिकारी, कर्मचारी आतमधील सुरक्षा व्यवस्था सांभाळत आहेत. मात्र, एकापेक्षा एक असे अनेक खतरनाक गुन्हेगार आतमध्ये एकमेकांशी खुन्नस ठेवून वागत असल्याने कोणत्याही क्षणी आतमध्ये मोठा धोका होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शनिवारी सायंकाळी घडलेल्या खुनी हल्ल्याच्या घटनेतून पुन्हा एकदा हा धोका अधोरेखित झाला आहे.

ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेले येथील मध्यवर्ती कारागृह सात वर्षांपूर्वीपर्यंत देशातील सर्वात सुरक्षित कारागृह म्हणून ओळखले जायचे. मात्र, २०१४ मध्ये कारागृहाची सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याने ‘पैशासाठी वाट्टेल ते’ करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे कैद्यांना चिकन, मटन, दारू, गांजा, चरस, मिठाई, बर्थ डे केक, मोबाईल फोन उपलब्ध करून दिले जाऊ लागले. कारागृहातच जुगारही भरू लागला. लोकमतने कारागृहात स्टींग ऑपरेशन करून हा गैरप्रकार उघड केला. त्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. काही अधिकाऱ्यांवर निलंबनाचीही कारवाई झाली. मात्र, प्रमुख असलेल्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई न झाल्यामुळे पुन्हा काही दिवसांनी जैसे थेच सुरू झाले. बोकाळलेल्या कैद्यांनी २०१५ मध्ये ‘जेल ब्रेक’ केला. देशातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या कारागृहाच्या सुरक्षेची पुरती वाट लागल्याने सरकारने त्यावेळी तत्कालीन अधीक्षकांसह डझनभर अधिकाऱ्यांवर निलंबनाचा आसूड ओढला. त्यानंतर येथे कारागृह अधीक्षक म्हणून योगेश देसाई आले. त्यांनी कारागृहाला खऱ्या अर्थाने शिस्त लावली. त्यानंतर मनीषा भोसले आल्या. आता दोन वर्षांपासून येथे अनुपकुमार कुमरे अत्यंत चांगल्या आणि कर्तव्यकठोर उपाययोजना राबवित आहे. मात्र, खरी समस्या मनुष्यबळाची आहे.

१७०० ची क्षमता, प्रत्यक्षात २५०० कैदी

- १७०० कैद्यांची क्षमता असलेल्या मध्यवर्ती कारागृहात २३०० ते २५०० कैदी आहेत. त्यात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तसेच मुंबई अंडरवर्ल्डमधील अनेक खतरनाक गुंड, बॉम्बस्फोटाचे दहशतवादी, नक्षलवादी आणि राज्यात ठिकठिकाणी टोळ्या चालविणारे गँगस्टर आदींचा समावेश आहे. त्यात रोज २० ते २५ कैद्यांची भर पडते.

- कैद्यांची कोर्टाची पेशी, कुणाची मुलाखत, अनेकांची नातेवाईकांसोबत भेट, फोनवर बोलणी, त्यांची आवकजावक आणि रात्रंदिवस कारागृहाच्या आतबाहेरची रात्री आणि दिवसाची (दोन पाळीत) सुरक्षा सांभाळण्यासाठी केवळ २३ अधिकाऱ्यांसह एकूण २५० जणांचे मनुष्यबळ आहे.

- अर्थात एका पाळीत केवळ १२५ जणांचेच संख्याबळ. त्यापैकी साप्ताहिक सुटी, आजारी, नैमित्तिक रजा अन् बाहेरची काम लक्षात घेतल्यास प्रत्यक्षात फक्त १०० जणच कर्तव्य बजावू शकतात.

--------------

२५ गुन्हेगारांना एक जण कसा सांभाळणार?

सरासरी हिशेब काढला तर एकापेक्षा एक खतरनाक असलेल्या २५ गुन्हेगारांना सांभाळण्याची जबाबदारी केवळ एका कर्मचाऱ्यावर येते. येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मंजूर संख्याबळ ३६० जणांचे आहे. मात्र, त्यातील सुमारे १०० पदे रिक्तच आहेत. सुरक्षेचे हे तोकडे मनुष्यबळ असेच राहिल्यास मध्यवर्ती कारागृहात कधीही मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

------------------५ वर्षांमधील बहुचर्चित घडामोडी

मार्च २०१५ - जेल ब्रेक, सुरक्षा व्यवस्था भेदून ५ कैदी पळाले

जुलै २०१५ - दहशतवादी याकूब मेमनला फाशी

सप्टेंबर २०१७ - आयुष पुगलिया नामक गुन्हेगाराची हत्या

२०२० - आबू खान नामक कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

एप्रिल २०२१ - कैद्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी

जून - २०२१ - गुन्हेगार रोशन शेखचा आत्महत्येचा प्रयत्न

१९ जून २०२१ - तिघांवर खुनी हल्ला

---