शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

शेतकऱ्यांचा ‘पीक विमा योजने’ ला प्रतिसाद

By admin | Updated: July 30, 2016 02:30 IST

यावर्षीपासून राज्यात प्रथमच राबविण्यात येत असलेल्या ‘पंतप्रधान पीक विमा योजने’ला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शेवटचे दोन दिवस : अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा नागपूर : यावर्षीपासून राज्यात प्रथमच राबविण्यात येत असलेल्या ‘पंतप्रधान पीक विमा योजने’ला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ही योजना जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी यासाठी कृषी विभाग युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. यात शेतकऱ्यांना गावोगावी माहिती दिली जात आहे. तसेच मार्गदर्शन केले जात आहे. विशेष म्हणजे, केंद्र सरकारने पूर्वीची राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना रद्द करून त्या जागी आता ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या एकूण १५ पिकांना संरक्षण मिळणार आहे. यात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, धान, ज्वारी, बाजारी, तूर, मूंग, उडीद, नाचणी, मका, भुईमुंग, सूर्यफूल, तीळ व कांदा या पिकांचा समावेश आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता केवळ शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहे. ३१ जुलै ही या योजनेची अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे. तरी नागपूर जिल्हातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू यांनी केले आहे. विशेष म्हणजे, यातून शेतकऱ्यांच्या पिकांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण कवच मिळणार आहे. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी बंधनकारक आहे. मात्र बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ती ऐच्छिक आहे. या योजनेत शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी २ टक्के विमा हप्ता भरावयाचा असून, सर्व पिकांसाठी जोखिमस्तर हा ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. ही योजना रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून राबविली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्याच्या अर्जासोबत पेरा प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज मंजूर झाले आहे, मात्र ज्यांनी पीक लागवडीमध्ये काही बदल केला, आणि त्याची अजूनपर्यंत बँकेला माहिती दिली नाही, अशा शेतकऱ्यांनी ताबडतोब पीक बदलाची माहिती द्यावी.