शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

शेतकऱ्यांचा ‘पीक विमा योजने’ ला प्रतिसाद

By admin | Updated: July 30, 2016 02:30 IST

यावर्षीपासून राज्यात प्रथमच राबविण्यात येत असलेल्या ‘पंतप्रधान पीक विमा योजने’ला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शेवटचे दोन दिवस : अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा नागपूर : यावर्षीपासून राज्यात प्रथमच राबविण्यात येत असलेल्या ‘पंतप्रधान पीक विमा योजने’ला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ही योजना जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी यासाठी कृषी विभाग युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. यात शेतकऱ्यांना गावोगावी माहिती दिली जात आहे. तसेच मार्गदर्शन केले जात आहे. विशेष म्हणजे, केंद्र सरकारने पूर्वीची राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना रद्द करून त्या जागी आता ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या एकूण १५ पिकांना संरक्षण मिळणार आहे. यात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, धान, ज्वारी, बाजारी, तूर, मूंग, उडीद, नाचणी, मका, भुईमुंग, सूर्यफूल, तीळ व कांदा या पिकांचा समावेश आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता केवळ शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहे. ३१ जुलै ही या योजनेची अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे. तरी नागपूर जिल्हातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू यांनी केले आहे. विशेष म्हणजे, यातून शेतकऱ्यांच्या पिकांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण कवच मिळणार आहे. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी बंधनकारक आहे. मात्र बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ती ऐच्छिक आहे. या योजनेत शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी २ टक्के विमा हप्ता भरावयाचा असून, सर्व पिकांसाठी जोखिमस्तर हा ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. ही योजना रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून राबविली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्याच्या अर्जासोबत पेरा प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज मंजूर झाले आहे, मात्र ज्यांनी पीक लागवडीमध्ये काही बदल केला, आणि त्याची अजूनपर्यंत बँकेला माहिती दिली नाही, अशा शेतकऱ्यांनी ताबडतोब पीक बदलाची माहिती द्यावी.