शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

शेतकऱ्यांचा ‘पीक विमा योजने’ ला प्रतिसाद

By admin | Updated: July 30, 2016 02:30 IST

यावर्षीपासून राज्यात प्रथमच राबविण्यात येत असलेल्या ‘पंतप्रधान पीक विमा योजने’ला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शेवटचे दोन दिवस : अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा नागपूर : यावर्षीपासून राज्यात प्रथमच राबविण्यात येत असलेल्या ‘पंतप्रधान पीक विमा योजने’ला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ही योजना जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी यासाठी कृषी विभाग युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. यात शेतकऱ्यांना गावोगावी माहिती दिली जात आहे. तसेच मार्गदर्शन केले जात आहे. विशेष म्हणजे, केंद्र सरकारने पूर्वीची राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना रद्द करून त्या जागी आता ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या एकूण १५ पिकांना संरक्षण मिळणार आहे. यात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, धान, ज्वारी, बाजारी, तूर, मूंग, उडीद, नाचणी, मका, भुईमुंग, सूर्यफूल, तीळ व कांदा या पिकांचा समावेश आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता केवळ शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहे. ३१ जुलै ही या योजनेची अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे. तरी नागपूर जिल्हातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू यांनी केले आहे. विशेष म्हणजे, यातून शेतकऱ्यांच्या पिकांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण कवच मिळणार आहे. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी बंधनकारक आहे. मात्र बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ती ऐच्छिक आहे. या योजनेत शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी २ टक्के विमा हप्ता भरावयाचा असून, सर्व पिकांसाठी जोखिमस्तर हा ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. ही योजना रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून राबविली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्याच्या अर्जासोबत पेरा प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज मंजूर झाले आहे, मात्र ज्यांनी पीक लागवडीमध्ये काही बदल केला, आणि त्याची अजूनपर्यंत बँकेला माहिती दिली नाही, अशा शेतकऱ्यांनी ताबडतोब पीक बदलाची माहिती द्यावी.