शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या दिशेने संशोधन व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विज्ञान जगतात बदल हीच संकल्पना शाश्वत आहे. तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असून, चौथ्या औद्योगिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विज्ञान जगतात बदल हीच संकल्पना शाश्वत आहे. तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असून, चौथ्या औद्योगिक क्रांतीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. ‘सीएसआयआर-नीरी’ने या क्रांतीच्या दिशेने त्याची आव्हाने व संधी लक्षात घेऊन संशोधन केले पाहिजे, असे मत जवाहरलाल नेहरू ॲल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. अनुपम अग्निहोत्री यांनी व्यक्त केले. ‘नीरी’च्या ८०व्या स्थापनादिनानिमित्त रविवारी आयोजित ‘ऑनलाइन’ कार्यक्रमादरम्यान ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते.

यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. शरद निंबाळकर, वरिष्ठ संशोधक डॉ. अतुल वैद्य, मुख्य संशोधक डॉ.जी. एल. बोधे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. ‘नीरी’ने उद्योगक्षेत्रासोबत काम केल्याने देशाचा फायदा झाला आहे. अनेक उद्योगसमूह काळानुसार बदलले नाही व त्यामुळे ते बंद झाले. कुठल्याही संशोधन संस्थेत तंत्रज्ञान बदल व्हायलाच हवेत. भारताने बदल स्वीकारल्यामुळे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये देशाने सहा वर्षात ८१ वरून ४६व्या क्रमांकावर झेप घेतली, अशी माहिती डॉ.अग्निहोत्री यांनी दिली. नावीन्यपूर्ण संशोधनामुळे मागील दशकात शहरांमधील राहणीमानात बराच फरक पडला आहे. मात्र ग्रामीण भागातील लोकांच्या मूलभूत समस्या कायम आहे. वैज्ञानिकांनी ग्रामीण भारत डोळ्यासमोर ठेवून संशोधन करायला हवे. ‘नीरी’कडून यात मौलिक योगदान दिले जाऊ शकते, असे प्रतिपादन डॉ. निंबाळकर यांनी केले. डॉ.वैद्य यांनी ‘सीएसआयआर-नीरी’च्या कामगिरीवर प्रास्ताविकातून प्रकाश टाकला. ‘नीरी’ला ग्रीन क्रॅकर्ससाठी तंत्रज्ञान पुरस्कार मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. डॉ. बोधे यांनी मुख्य वक्त्यांचा परिचय करून दिला तर प्रकाश कुंभारे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. ‘नीरी’च्या वार्षिक अहवालाचेदेखील यावेळी प्रकाशन झाले.

विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रश्नमंजूषेचे आयोजन

‘नीरी’च्या स्थापना दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी देशपातळीवरील विज्ञान प्रश्नमंजूषेचे आयोजन करण्यात आले होते. ऑनलाइन माध्यमातून हे आयोजन झाले व यात ४१२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.