शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या दिशेने संशोधन व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विज्ञान जगतात बदल हीच संकल्पना शाश्वत आहे. तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असून, चौथ्या औद्योगिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विज्ञान जगतात बदल हीच संकल्पना शाश्वत आहे. तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असून, चौथ्या औद्योगिक क्रांतीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. ‘सीएसआयआर-नीरी’ने या क्रांतीच्या दिशेने त्याची आव्हाने व संधी लक्षात घेऊन संशोधन केले पाहिजे, असे मत जवाहरलाल नेहरू ॲल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. अनुपम अग्निहोत्री यांनी व्यक्त केले. ‘नीरी’च्या ८०व्या स्थापनादिनानिमित्त रविवारी आयोजित ‘ऑनलाइन’ कार्यक्रमादरम्यान ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते.

यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. शरद निंबाळकर, वरिष्ठ संशोधक डॉ. अतुल वैद्य, मुख्य संशोधक डॉ.जी. एल. बोधे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. ‘नीरी’ने उद्योगक्षेत्रासोबत काम केल्याने देशाचा फायदा झाला आहे. अनेक उद्योगसमूह काळानुसार बदलले नाही व त्यामुळे ते बंद झाले. कुठल्याही संशोधन संस्थेत तंत्रज्ञान बदल व्हायलाच हवेत. भारताने बदल स्वीकारल्यामुळे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये देशाने सहा वर्षात ८१ वरून ४६व्या क्रमांकावर झेप घेतली, अशी माहिती डॉ.अग्निहोत्री यांनी दिली. नावीन्यपूर्ण संशोधनामुळे मागील दशकात शहरांमधील राहणीमानात बराच फरक पडला आहे. मात्र ग्रामीण भागातील लोकांच्या मूलभूत समस्या कायम आहे. वैज्ञानिकांनी ग्रामीण भारत डोळ्यासमोर ठेवून संशोधन करायला हवे. ‘नीरी’कडून यात मौलिक योगदान दिले जाऊ शकते, असे प्रतिपादन डॉ. निंबाळकर यांनी केले. डॉ.वैद्य यांनी ‘सीएसआयआर-नीरी’च्या कामगिरीवर प्रास्ताविकातून प्रकाश टाकला. ‘नीरी’ला ग्रीन क्रॅकर्ससाठी तंत्रज्ञान पुरस्कार मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. डॉ. बोधे यांनी मुख्य वक्त्यांचा परिचय करून दिला तर प्रकाश कुंभारे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. ‘नीरी’च्या वार्षिक अहवालाचेदेखील यावेळी प्रकाशन झाले.

विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रश्नमंजूषेचे आयोजन

‘नीरी’च्या स्थापना दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी देशपातळीवरील विज्ञान प्रश्नमंजूषेचे आयोजन करण्यात आले होते. ऑनलाइन माध्यमातून हे आयोजन झाले व यात ४१२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.